शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

तंत्रज्ञानामुळे चारा संकट

By admin | Updated: February 22, 2015 01:55 IST

शेतातील माल काढण्यासाठी यंत्राचा उपयोग होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होत आहे. यंत्रांद्वारे पिकांची काढणी होत असल्याने ...

वर्धा : शेतातील माल काढण्यासाठी यंत्राचा उपयोग होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होत आहे. यंत्रांद्वारे पिकांची काढणी होत असल्याने गुरांकरिता चाराच शिल्लक राहत नसल्याची स्थिती आहे़ यामुळे गुरांच्या चाऱ्यासाठी गोपालक व शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत असल्याचे दिसते़शेतकरी आपला माल लवकर निघावा म्हणून सोयाबीन हायवेस्टर या यंत्राने काढताना दिसते़ या यंत्रामुळे काढणी झाल्यावर जे कुटार निघत होते, ते सर्व शेतात पसरते. शिवाय गव्हाचा गव्हांडा काही प्रमाणात सोयाबीनच्या कुटारात मिसळून ते जनावरांच्या खाण्यासाठी उपयोगात येत होते़ आता तो सुद्धा शेतातच पसरविला जातो़ जनावरांसाठी तुरीचे कुटार हे महत्त्वाचे असते. यात गव्हाचा गव्हांडा मिसळून तो पावसाळ्यात गाई, बैलांना चारण्यासाठी साठवून ठेवला जातो; पण अलिकडे शेतकरी यंत्रानेच थोड्या बचतीसाठी पिकांची काढणी करताना दिसतात़ यामुळे तुरीचे कुटारही उपलब्ध होत नाही. हेडंम्बा या मशिनने तुरी काढल्यास त्या मशिनमध्ये संपूर्ण तुरीची बांधलेली पेटी टाकली जाते़ यातून बाहेर येणारे कुटार एकदम बारिक होऊन त्यात जाड तुरीच्या झाडाचे तुकडे धारदार असतात. एकदम बारिक झालेले कुटार जनावरे खात नाहीत़ जे धारदार तुकडे असतात, ते खाताना जनावरांना इजा होऊन जनावरे दगावण्याची शक्यता असते. थ्रेशर मशिनने शेतातील माल काढल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत नाही; पण मजुरांचा अभाव व वेळेची बचत करण्यासाठी शेतकरी या यंत्राकडे वळला आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी चारा वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)