शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

तंत्रज्ञानामुळे चारा संकट

By admin | Updated: February 22, 2015 01:55 IST

शेतातील माल काढण्यासाठी यंत्राचा उपयोग होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होत आहे. यंत्रांद्वारे पिकांची काढणी होत असल्याने ...

वर्धा : शेतातील माल काढण्यासाठी यंत्राचा उपयोग होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होत आहे. यंत्रांद्वारे पिकांची काढणी होत असल्याने गुरांकरिता चाराच शिल्लक राहत नसल्याची स्थिती आहे़ यामुळे गुरांच्या चाऱ्यासाठी गोपालक व शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत असल्याचे दिसते़शेतकरी आपला माल लवकर निघावा म्हणून सोयाबीन हायवेस्टर या यंत्राने काढताना दिसते़ या यंत्रामुळे काढणी झाल्यावर जे कुटार निघत होते, ते सर्व शेतात पसरते. शिवाय गव्हाचा गव्हांडा काही प्रमाणात सोयाबीनच्या कुटारात मिसळून ते जनावरांच्या खाण्यासाठी उपयोगात येत होते़ आता तो सुद्धा शेतातच पसरविला जातो़ जनावरांसाठी तुरीचे कुटार हे महत्त्वाचे असते. यात गव्हाचा गव्हांडा मिसळून तो पावसाळ्यात गाई, बैलांना चारण्यासाठी साठवून ठेवला जातो; पण अलिकडे शेतकरी यंत्रानेच थोड्या बचतीसाठी पिकांची काढणी करताना दिसतात़ यामुळे तुरीचे कुटारही उपलब्ध होत नाही. हेडंम्बा या मशिनने तुरी काढल्यास त्या मशिनमध्ये संपूर्ण तुरीची बांधलेली पेटी टाकली जाते़ यातून बाहेर येणारे कुटार एकदम बारिक होऊन त्यात जाड तुरीच्या झाडाचे तुकडे धारदार असतात. एकदम बारिक झालेले कुटार जनावरे खात नाहीत़ जे धारदार तुकडे असतात, ते खाताना जनावरांना इजा होऊन जनावरे दगावण्याची शक्यता असते. थ्रेशर मशिनने शेतातील माल काढल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत नाही; पण मजुरांचा अभाव व वेळेची बचत करण्यासाठी शेतकरी या यंत्राकडे वळला आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी चारा वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)