शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात महामार्गावर उड्डाणपूल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:23 IST

जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा .......

ठळक मुद्देनितीन गडकरींशी खासदार रामदास तडस यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लेखी निवेदनातून केली. खासदार रामदास तडस यांनी ना.नितीन गडकरी यांना सांगितले की, कारंजा घाडगे हे तहसील मुख्यालयाचे नगरपंचायत असलेले महत्वाचे शहर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती आहे. शाळा, दवाखाना, न्यायालय, बसस्टँड, बाजारपेठ, सरकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, महाविद्यालय अश्या महत्वाच्या ठिकाणी नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडांवा लागतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उड्डाण पूल नसल्यामुळे अनेक भीषण अपघात देखील झालेले आहे. या सर्व बाबीचा गंभीरतेने विचार करुन २९ जून २०१६ रोजी कारंजा घाडगे येथे उडाणपुल निर्माण करण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग नागपूर कार्यालयाने सविस्तर प्रस्ताव दिल्ली मुख्यालयी पाठविला होता. या प्रलंबीत प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन कारंजा घाडगे जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी केली. निर्माण होत असलेल्या बुट्टीबोरी-वर्धा-यवतमाळ महामार्ग निर्माण कार्य सर्व प्रमुख शहर केळझर, सेलू, वर्धा, सालोड, देवळी, व कळंब येथे बाह्यवळण रस्ते तयार करण्यात येत आहे. यामुळे सर्व जड वाहणे शहरातील बाहेरुण प्रवास करतील अशी रचना आहे. परंतु कॉग्रेंस शासनाच्या कार्यकाळात निर्माण करण्यात आलेल्या महामार्गामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षेचे उपाय व सामान्य नागरिकांच्या मागणीची दखल घेतली गेली नव्हती असे ही खा. तडस यांनी त्यांना सांगितले.वर्धा लोकसभा मतदार संघातील जांब चौरस्ता, हिंगणघाट शहरातील नांदगांव चौरस्ता येथील उड्डाण कार्याला नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून मान्यता मिळालेली आहे.सदर कामे लवकरच प्रारंभ होणार आहे. अशी प्रतिक्रीया खासदार रामदास तडस यांनी दिली. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सुचनेनुसार कारंजा घाडगे उड्डाणपुलाकरिता लवकरच बैठकीचे आयोजन करुन हा प्रश्न देखील भारत सरकार नक्कीच मार्गी लावेल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केला.महिना भरात दोघांचे गेले जीवकारंजा धाडगे येथे महामार्ग ओलांडताना गेल्या महिना भरात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मुलगा रूग्णालयात होता त्या जेवनाचा डबा देण्यासाठी जाणाऱ्या वडीलाला अपघात झाला व ते मरण पावले. तर कारंजा येथील एका हॉटेल मध्ये काम करणाऱ्या एका नोकराला महामार्गावर वाहनाची वाट पाहत असताना अपघात झाला यात त्यांचा मृत्यू झाला.तो परप्रांतीय युवक होता. याशिवाय अनेक किरकोळ अपघात येथे पुलाअभावी झाले आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRamdas Tadasरामदास तडस