शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

प्रवाहित तारा ४५ दिवस जमिनीवर

By admin | Updated: November 8, 2014 22:42 IST

विजेचे खांब तुटल्याने गत ४५ दिवसांपासून वीज प्रवाहित तारा जमिनीवर लोळत आहेत़ तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने ग्रामस्थांनीच लाकडी खांबाच्या साह्याने वीज प्रवाह सुरू केला़ हा प्रकार

अमोल सोटे - आष्टी (शहीद)विजेचे खांब तुटल्याने गत ४५ दिवसांपासून वीज प्रवाहित तारा जमिनीवर लोळत आहेत़ तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने ग्रामस्थांनीच लाकडी खांबाच्या साह्याने वीज प्रवाह सुरू केला़ हा प्रकार माणिकनगर येथे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर उघड झाला़ ४५ दिवसांतही विद्युत खांब आणि तारांची दुरूस्ती होत नसल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे़ माणिकनगर ग्रामपंचायतमधील १५ कुटुंबाला गत ४५ दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ व अनागोंदी कारभाराचा फटका बसत आहे. निकृष्ट दर्जाच्या सिमेंट खांबावर असलेली वीजवाहिनी दोन्ही खांब तुटल्याने जमिनीवर लोळत आहे़ यामुळे नागरिकांच्या घरात अंधार झाला. विद्युत प्रवाहित तारा जमिनीवर पडून असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली़ यास ४५ दिवसांचा कालावधी लोटला; पण अद्याप दुरूस्ती करण्याचे सौजन्य कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखविले नाही. शेवटी गावकऱ्यांनीच एका लाकडी खांबाच्या साह्याने दुसऱ्या ठिकाणाहून वीजप्रवाह सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अशी घटना माहिती नाही म्हणत तात्काळ दुरूस्तीसाठी आदेश देणार असल्याचे सांगितले.आष्टी-मोर्शी रोडवर माणिकनगर वसाहत आहे. पुनर्वसीत ग्रामपंचायत हद्दीतील कामे करताना शासकीय अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले आहे़ विजेसाठी जमिनीत गाडलेले सिमेंट काँक्रीटचे खांब निकृष्ट दर्जाचे बसविण्यात आले़ रस्त्याच्या एका बाजूला वस्ती आणि दुसऱ्या बाजूला गुरांचा दवाखाना आहे. वस्तीच्या बाजूने प्रवीण बेलखेडे, नामदेव अमदरे, किसना कुरवाडे, तुळशीराम भालेराव, श्रीकृष्ण नांदणे, गजानन कुरवाडे, मारोती नांदणे यांची घरे आहेत़ या घरांचा प्रवीण बेलखेडे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या खांबावरून वीजपुरवठा सुरू होता. पावसाळ्यात दि. २३ सप्टेंबर रोजी वादळामध्ये दोन्ही खांब तुटून पडले़ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जवळ असलेला खांब तर भिंतीवरच कोसळला़दोन्ही खांब तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांनी याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता कार्यालय माणिकनगर येथे माहिती दिली़ येथे कार्यरत अभियंता एम.एम. पेठे यांनी ग्रामस्थांना आवठडाभरात वीजवाहिनी दुरूस्त करण्यात येईल, असे सांगितले़ गावात सर्वत्र काळोख पसरला होता व नागरिकही अंधारात होते. यामुहे त्यांनी लाकडी खांबावर तात्पुरता वीज पुरवठा सुरू केला. ज्या मुख्य वीजतारा जमिनीवर पडल्या, त्या उचलून अथवा कापून सुरक्षित ठेवण्याचे सौजन्य वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखविले नाही़ ग्रामस्थ कनिष्ठ अभियंता कार्यालयात चकरा मारत आहेत; पण कार्यरत अभियंता पेठे यांचे तुघलकी धोरण व सतत गैरहजर राहण्यामुळे अद्यापही दुरूस्ती झालेली नाही, असा आरोप प्रवीण बेलखेडे, नामदेव अमदरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला़गावात प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली असता अत्यंत घातक व जीवघेणी अवस्था दिसून आली़ दुसऱ्या खांबावरील वीज पुरवठा भलतीकडेच वळता करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे याबाबत आष्टी येथील कार्यालयात कळविले नाही़ सहायक अभियंता एस.पी. बारई यांना याबाबत विचारणा केली असता अद्याप असला प्रकार माझ्याकडे आला नसल्याचे त्यांनी सांगितले़ एरव्ही वीज कंपनी दुरूस्तीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढून निधीची उधळपट्टी करते; पण माणिकनगर येथे गरजू लोकांना मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार पाहावयास मिळाला़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देत ग्रामस्थांची धोक्यातून सुटका करणे गरजेचे झाले आहे़