शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

वाई पुलावरून पुराचे पाणी; रहदारी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:28 IST

नजीकच्या वाई येथील नाल्यावरून असलेल्या मोडक्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहण्यावरून वाई-पिंपळधरी येथे व वाई-पिंपळधरीवरून बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची रहदारी ठप्प आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : नजीकच्या वाई येथील नाल्यावरून असलेल्या मोडक्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोहण्यावरून वाई-पिंपळधरी येथे व वाई-पिंपळधरीवरून बाहेरगावी जाणारे प्रवासी विद्यार्थी, शेतकरी व शेतमजुरांची रहदारी ठप्प आहे. पूल मागील पाच वर्षांपासून मोडकळीस आला असून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. बांधकाम विभागाने गावकऱ्यांच्या या मागणीकडे कायम दुर्लक्ष केल्याने वाई-पिंपळधरी येथील जनजीवन ठप्प झाले आहे.वाई-पिंपळधरी ही दोन्ही गावे आदिवासीबहुल असून गावातून बाहेर वळताना गावाला वळसा घेत वाहणाºया नाल्यावरील पुलावरून येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या नाल्यावरील पूल खोल असून पुलावर मोठ-मोठे खड्डे आहेत. सलाखी उभ्या पडल्या आहेत. थोड्या पावसाने सदर पुलावरून पाणी वाहते, पूल दुरुस्त व्हावा, तो उंच करून दोन्ही बाजूला कठडे बसवा, अशी मागणी मागील पाच वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत. चार वर्षांपूर्वी वसंत पुनवटकर पूल ओलांडताना वाहून गेला. दोन गावातील विद्यार्थी पुलावरून जीव मुठीत घेऊनच ये-जा करताना करतात. दोन वर्षांपासून मोठा पाऊस न झाल्याने समस्येची तीव्रता जाणवली नाही; आता सुरू असलेल्या संततधार पावसाने पूल पाण्याखाली आला. परिणामी, रोहण्यातील ज्यांची शेती वाई-पिंपळधरी शिवारात आहे, ते शेतात जाऊ शकत नाही, तर वाई-पिंपळधरी येथील विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही.गावातील नागरिक, आवश्यक गरजा भागविण्यासाठी गावाबाहेर जाऊ शकले नाहीत. पूल दुरुस्तीला आणखी एखाद्या नागरिक वाहून जाण्याची प्रतीक्षा आहे की काय, अशी नाराजीची प्रतिक्रिया माजी सरपंच गणेश गजकेश्वर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर