शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती...
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
5
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
6
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
7
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
8
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
9
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
10
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
11
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
12
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
13
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
14
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
15
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
16
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
17
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
18
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
19
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
20
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी

आर्वी तालुक्यात पुराचा हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

बाकळी नदीचे पाणी नांदपूर आणि शिरपूर गावात शिरल्याने घरामध्येही पाणी साचले होते. नांदपुरातील १४ घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने सुमारे तीनशे एकर शेती वर्धा नदीच्या पाण्याखाली आल्याने शेतात जाण्यास मार्गच राहिला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा/आर्वी : वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने या पूर परिस्थितीचा अनेक गावांना फटका बसला आहे. तालुक्यातील ३० ते ४० घरांची पडझड झाली असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. बुधवारी तालुक्यात ११४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत तालुक्यात ६९९.१९ मिमी पाऊस झाला आहे. वर्धा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गुरुवारी सकाळपासून आर्वी-अमरावती मार्ग बंद झाला आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या. बुधवारी रात्री तळेगाव (श्याम.पंत) ते आर्वी मार्ग हा वर्धमनेरी येथील पुलावरून पाणी असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या पुरामध्ये चार बस अडकल्याने त्या बसमधील प्रवाशांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था वर्धमनेरी येथील आश्रमात करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता या बस तळेगाव, कारंजा व ढगा या मार्गाने काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाकळी नदीचे पाणी नांदपूर आणि शिरपूर गावात शिरल्याने घरामध्येही पाणी साचले होते. नांदपुरातील १४ घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने सुमारे तीनशे एकर शेती वर्धा नदीच्या पाण्याखाली आल्याने शेतात जाण्यास मार्गच राहिला नाही. तसेच या शेतातील पिकेही पाण्याखाली आल्याने धोका निर्माण झाला. आर्वी नगरपालिकेच्या हद्दीतील मायबाई वॉर्डातील दगडी पूल आणि अवघड वॉर्ड परिसरात मुख्याधिकारी आणि नगरपालिकेच्या पथकाने पाहणी केली. यावेळी सर्व घरे सुरक्षित होती; परंतु आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. श्रीराम शाळा व गुरुनानक धर्मशाळा या ठिकाणी तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

बाकळी नदीसह गावालगतच्या नाल्याला पूर आल्याने शिरपूर, जळगाव व नांदपूर या गावात पाणी शिरले. त्यामुळे बाधित होण्याची शक्यता असलेल्या लोकांना गावातील शाळेत स्थलांतरित करण्यात येत आहे. अप्पर वर्धा व निम्न वर्धा प्रकल्पातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत प्रभावित होणाऱ्या गावातील सर्व सरपंच, पोलीस पाटील यांना अवगत करून गावातील शाळा उघडून देण्याबाबतच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आल्या. तसेच या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग लक्षात घेत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.विद्यासागर चव्हाण, तहसीलदार आवी.  

टॅग्स :floodपूरRainपाऊस