शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

आराखडा मंजुरीनंतरच पाच कोटींची कामे

By admin | Updated: March 6, 2016 02:26 IST

शहीदभूमीच्या विकासासाठी शासनाकडून मंजूर पाच कोटी रुपयांची शहर आराखड्यातील सर्व कामे नगर पंचायतच्या सभेत चर्चेतून ठरविल्यानंतर सभागृहात ठराव मंजूर होईल.

नगराध्यक्षांची माहिती : शहीदभूमी विकास निधी प्रकरणआष्टी (श.) : शहीदभूमीच्या विकासासाठी शासनाकडून मंजूर पाच कोटी रुपयांची शहर आराखड्यातील सर्व कामे नगर पंचायतच्या सभेत चर्चेतून ठरविल्यानंतर सभागृहात ठराव मंजूर होईल. त्यानंतरच कामे मार्गी लागतील, अशी माहिती नगराध्यक्ष मिरा येनुरकर यांनी दिली. भाजपच्या सहा नगरसेवकांनी आपल्या सोयीनुसार स्व-लिखीत आराखडा तयार करून त्यालाच मंजुरी मिळाली, अशी धूळफेक करणारी माहिती पुढे आणल्याचा आरोप त्यांनी केला.पाच कोटी रुपयांच्या निधीतून कामे मंजुरीचा ठराव जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी नगरविकास शाखा यांनी नगर पंचायतला मागितला होता. यासाठी नगर पंचायतमध्ये १८ फेब्रुवारी २०१६ रोजी विशेष सभा झाली. या सभेत भाजपाच्या सहा नगरसेवकांनी स्वत:च लिहिलेला आराखडा वाचून दाखविला. सभागृहात यावर चर्चाही झाली नाही. कार्यवृत्तसुद्धा लिहिण्यात आले नाही. असे असताना अध्यक्ष सही करीत नाही, असा भाजपच्या सहा नगरसेवकांनी कांगावा सुरू केला.शासकीय मापदंडाप्रमाणे विकास कामांचे नियोजन करण्यासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी ज्याठिकाणी कामे करावयाची आहे, त्याची पाहणीही अद्याप झाली नाही. हे वास्तव असताना भाजपाचे सहाही नगरसेवक शहर विकासाच्या दृष्टीने उलट्या प्रवाहाकडे धाव घेत नगर पंचायत प्रशासन बदनाम करण्याचा खटाटोप करीत असल्याचा आरोपही येणूरकर यांनी केला. ठरावाच्या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर विकास कामे मार्गी लागणार असून शहराच्या विकासाकरिता काँग्रेसचे बाराही नगरसेवक कटीबद्ध आहेत.वीज बिलासंबंधी महावितरणला यापूर्वीच कळविण्यात आले आहे. त्यानुसार बिल भरण्यासाठी कार्यवाही सुरू आहे; पण या विषयाबाबतचे राजकारण करून बनावट श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजप नगरसेवक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.(प्रतिनिधी)बुधवारी होणार ठराव मंजूरपाच कोटीच्या विकास आराखड्यात कोणती कामे घ्यायची यासाठी ४ मार्च रोजी आमदार अमर काळे, नगराध्यक्ष मीरा येनुरकर, सर्व नगरसेवक, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली. गरजेनुसार कामे करण्यासाठी बुधवारी (दि.९) सभा घेऊन त्यात ठराव मंजूर करणार आहे, असे नगराध्यक्ष येणूरकर यांनी सांगितले. शहीद स्मारक विकासासाठी दोन कोटी रुपये देण्याचे पत्र राज्य शासनाकडून आले; पण हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय व महाविद्यालय येथे सुरू आहे. शिवाय हुतात्मा स्मारक समितीने १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र तेव्हाचे पोलीस ठाणे नगरपंचायतला हस्तांतरित केले तरच दोन कोटी रुपये देता येईल. अन्यथा निधी देणे शक्य नाही. यासाठी शासनाचे मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.