शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

पीक कर्जात पाच बँकांची माघारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2015 02:50 IST

चार वर्षांपासून सुरू असलेली दुष्काळी स्थिती लक्षात घेत यंदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचा आधार देणे गरजेचे होते.

जिल्ह्याने गाठले ९४ टक्के उद्दिष्ट : सहा बँकांनी ‘क्रॉस’ केले ‘टार्गेट’वर्धा : चार वर्षांपासून सुरू असलेली दुष्काळी स्थिती लक्षात घेत यंदा शेतकऱ्यांना पीक कर्जाचा आधार देणे गरजेचे होते. यामुळेच शासनाच्या आदेशावरून बँकांनी १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याचे प्रयत्न चालविले आहेत. प्रारंभी रखडलेली पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया मध्यंतरी वेगात पुढे सरकली. यामुळे पीक कर्ज वाटपामध्ये जिल्ह्याला ३१ आॅगस्टपर्यंत ९४ टक्के उद्दीष्ट गाठता आले आहे. यात सहा बँकांनी उद्दिष्टापेक्षाही अधिक कर्ज दिले तर पाच बँकांना ६० टक्केही कर्ज वाटप करता आलेले नाही.गतवर्षी कोरडा दुष्काळ व त्यापूर्वी अतिवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. २०१३-१४ मध्ये दुष्काळ जाहीर झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे व्याज माफ करून कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. परिणामी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला; पण एक लाखाच्या वर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना जटील प्रक्रियांचा सामना करावा लागला. यानंतर बँकांना प्रत्येक शेतकऱ्याला कर्जाचा पुरवठा झालाच पाहिजे, असे निर्देश देण्यात आले. यामुळे जिल्हाधिकारी व अग्रणी बँकेने सर्व बँकांना सूचना देत कर्ज पुरवठ्याचा पाठपुरावा केला. ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्याला ९४ टक्के कर्ज वाटपाचे उद्दीष्ट गाठता आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ५६ हजार १०९ शेतकऱ्यांना ५०८ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. खरीप व रबी हंगामातील एकूण कर्जदार शेतकरी ६० हजार ५०९ आहे. उर्वरित सहा टक्के शेतकऱ्यांनाही येत्या काही दिवसांत कर्ज पुरवठा करून १०० टक्के उद्दीष्ट गाठण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बँक आॅफ इंडिया, अलाहाबाद बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, कार्पोरेशन बँक आणि आयसीआयसीआय या सहा बँकांनी कर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दीष्ट गाठले आहे. शिवाय अतिरिक्त शेतकऱ्यांनाही कर्ज वितरित केले आहे. असे असले तरी सहा बँकांना कर्ज वाटपाचे ६० टक्केही उद्दीष्ट गाठता आलेले नाही. यात स्टेट बँक आॅफ हैद्राबाद १२.८४ टक्के, आंध्रा बँक २०.४७ टक्के, अ‍ॅक्सीस बँक ३६.८६ टक्के, सिंडीकेट बँक ३८.५२ टक्के तर बँक आॅफ बडोदाने ५४.५१ टक्के यांचा समावेश आहे. या बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्याला कर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दीष्ट गाठताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून मुदतवाढ देण्यात आली; पण बँका कर्ज गंभीर नसल्याचे दिसते. ६० टक्केच्या आत कर्ज वाटप असलेल्या बँकांना प्रशासनाने वठणीवर आणणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)पुनर्गठण व नूतनीकरण प्रक्रियाही सुरूचगतवर्षी दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश शासनाने दिले. यावरून जिल्ह्यातील १० हजार ७६ शेतकऱ्यांच्या १३९ कोटी ९३ लाख रुपये कर्जाचे बँकांकडून पुनर्गठण करण्यात आले. २४ हजार ८९३ खातेदारांना २२७ कोटी २१ लाख रुपयांचे नवीन कर्ज दिले. शिवाय ३१ हजार २१६ शेतकऱ्यांच्या २८१ कोटी २५ लाख रुपयांच्या कर्जाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. सर्वाधिक व सर्वात कमी कर्ज वाटप जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्ज वाटप बँक आॅफ इंडियाने केले. या बँकेने २१ हजार ११४ शेतकऱ्यांना १५१ कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. यातून बँकेचे १०१.३१ टक्के उद्दीष्ट साध्य करण्यात आले. पुनर्गठण व नुतनीकरणातही बँकेचे ९०.५६ टक्के उद्दीष्ट गाठले. सर्वात कमी ५२ शेतकऱ्यांना ४३ लाख ६४ हजार रुपये स्टेट बँक आॅफ हैद्राबादने वितरित केले.