शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कारंजात आजी-माजी आमदारांचा कस

By admin | Updated: October 28, 2015 02:22 IST

कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे.

नगर पंचायत निवडणूक : शिवसेना व अपक्षांमुळे नव्या समीकरणाचे संकेतअरुण फाळके कारंजा (घाडगे)कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे. खर्डीपूरा पॅनल समर्थित भाजप परत सत्ता मिळविण्यासाठी तर बाजार पार्टी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्ता कायम राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. आ. अमर काळे यांनी प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली असून ते येथे तळ ठोकून आहे. पक्षांंतर्गत नाराजी आणि उमेदवारी न मिळाल्याने हिरमोड झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी त्यांच्याकडून सुरु आहे. तसेच ते ‘डोअर टु डोअर’ प्रचारावर अधिक भर देत असून ते विकासाचा अजेंडा मतदारांना पटवून देताना दिसून येत आहे. भाजपानेही प्रचारात आघाडी घेतली आहे. माजी आमदार दादाराव केचे यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा आहे. स्थानिक नेते, गटबाजी आणि रूसवे फुगवे विसरून कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचाही सूर आहे. तर काहींनी पक्षादेश झुगारुन बंडखोरीचा झेंडा हातात घेतला आहे. कारंजा ४ हजार ९३० पुरूष व ४ हजार ७१४ अशा एकूण ९ हजार ६४४ मतदारांवर उमेदवारांची भिस्त आहे. संपूर्ण शहरांचे विभाजन १७ प्रभागात झाले आहे. प्रत्येक प्रभागात सुमारे ५०० ते ५५० मतदार आहेत. सर्वाधिक मतदार वॉर्ड ब ७ (६९९ मतदार) व वॉर्ड ८ मध्ये (७०२ मतदार) आहेत. वॉर्ड लहान व मतदार संख्या कमी असल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना कस लागणार आहे. माजी सरपंच शिरीष भांगे, माजी सरपंच नितीन दर्यापूरकर, माजी सरपंच अरविंद चरडे, माजी उपसभापती प्रेम महिले, शिवसेना नेते संदीप टिपले, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पालीवाल या सर्वांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नसून यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा हिशेब मतदारांना द्यावा लागणार आहे. गत ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले काही उमेदवार पुन्हा आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. त्यांना फक्त सात महिन्यांचा सत्ता कालावधी उपभोगता आला. त्यांना या कालावधीत काही करता आले नाही. यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांत सहानूभुती दिसून येत आहेत.भाजपा व काँग्रेसचे १७ उमेदवार तर शिवसेनेने १४ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त पाच उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. आप आणि माकपानेही उमेदवारी नोंदविली आहे. खरी लढत जरी काँग्रेस आणि भाजपात होणार असली तर शिवसेनेचे काही उमेदवार आणि अपक्ष उमेदवार वरील दोन्ही पक्षाचे राजकीय समीकरण बिघडवून विजयांची अनिश्चितता वाढवित आहे. विजय कुणाचा हे आज तरी सामने कठीण आहे.