शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कारंजात आजी-माजी आमदारांचा कस

By admin | Updated: October 28, 2015 02:22 IST

कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे.

नगर पंचायत निवडणूक : शिवसेना व अपक्षांमुळे नव्या समीकरणाचे संकेतअरुण फाळके कारंजा (घाडगे)कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे. खर्डीपूरा पॅनल समर्थित भाजप परत सत्ता मिळविण्यासाठी तर बाजार पार्टी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्ता कायम राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. आ. अमर काळे यांनी प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली असून ते येथे तळ ठोकून आहे. पक्षांंतर्गत नाराजी आणि उमेदवारी न मिळाल्याने हिरमोड झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी त्यांच्याकडून सुरु आहे. तसेच ते ‘डोअर टु डोअर’ प्रचारावर अधिक भर देत असून ते विकासाचा अजेंडा मतदारांना पटवून देताना दिसून येत आहे. भाजपानेही प्रचारात आघाडी घेतली आहे. माजी आमदार दादाराव केचे यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा आहे. स्थानिक नेते, गटबाजी आणि रूसवे फुगवे विसरून कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचाही सूर आहे. तर काहींनी पक्षादेश झुगारुन बंडखोरीचा झेंडा हातात घेतला आहे. कारंजा ४ हजार ९३० पुरूष व ४ हजार ७१४ अशा एकूण ९ हजार ६४४ मतदारांवर उमेदवारांची भिस्त आहे. संपूर्ण शहरांचे विभाजन १७ प्रभागात झाले आहे. प्रत्येक प्रभागात सुमारे ५०० ते ५५० मतदार आहेत. सर्वाधिक मतदार वॉर्ड ब ७ (६९९ मतदार) व वॉर्ड ८ मध्ये (७०२ मतदार) आहेत. वॉर्ड लहान व मतदार संख्या कमी असल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना कस लागणार आहे. माजी सरपंच शिरीष भांगे, माजी सरपंच नितीन दर्यापूरकर, माजी सरपंच अरविंद चरडे, माजी उपसभापती प्रेम महिले, शिवसेना नेते संदीप टिपले, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पालीवाल या सर्वांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नसून यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा हिशेब मतदारांना द्यावा लागणार आहे. गत ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले काही उमेदवार पुन्हा आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. त्यांना फक्त सात महिन्यांचा सत्ता कालावधी उपभोगता आला. त्यांना या कालावधीत काही करता आले नाही. यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांत सहानूभुती दिसून येत आहेत.भाजपा व काँग्रेसचे १७ उमेदवार तर शिवसेनेने १४ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त पाच उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. आप आणि माकपानेही उमेदवारी नोंदविली आहे. खरी लढत जरी काँग्रेस आणि भाजपात होणार असली तर शिवसेनेचे काही उमेदवार आणि अपक्ष उमेदवार वरील दोन्ही पक्षाचे राजकीय समीकरण बिघडवून विजयांची अनिश्चितता वाढवित आहे. विजय कुणाचा हे आज तरी सामने कठीण आहे.