शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कारंजात आजी-माजी आमदारांचा कस

By admin | Updated: October 28, 2015 02:22 IST

कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे.

नगर पंचायत निवडणूक : शिवसेना व अपक्षांमुळे नव्या समीकरणाचे संकेतअरुण फाळके कारंजा (घाडगे)कारंजा नगर पंचायतीची निवडणूक आता काहीच दिवसांवर येवून ठेपली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपाकडून जोरदार प्रचार युद्ध सुरू आहे. खर्डीपूरा पॅनल समर्थित भाजप परत सत्ता मिळविण्यासाठी तर बाजार पार्टी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्ता कायम राखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. आ. अमर काळे यांनी प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली असून ते येथे तळ ठोकून आहे. पक्षांंतर्गत नाराजी आणि उमेदवारी न मिळाल्याने हिरमोड झालेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी त्यांच्याकडून सुरु आहे. तसेच ते ‘डोअर टु डोअर’ प्रचारावर अधिक भर देत असून ते विकासाचा अजेंडा मतदारांना पटवून देताना दिसून येत आहे. भाजपानेही प्रचारात आघाडी घेतली आहे. माजी आमदार दादाराव केचे यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा आहे. स्थानिक नेते, गटबाजी आणि रूसवे फुगवे विसरून कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचाही सूर आहे. तर काहींनी पक्षादेश झुगारुन बंडखोरीचा झेंडा हातात घेतला आहे. कारंजा ४ हजार ९३० पुरूष व ४ हजार ७१४ अशा एकूण ९ हजार ६४४ मतदारांवर उमेदवारांची भिस्त आहे. संपूर्ण शहरांचे विभाजन १७ प्रभागात झाले आहे. प्रत्येक प्रभागात सुमारे ५०० ते ५५० मतदार आहेत. सर्वाधिक मतदार वॉर्ड ब ७ (६९९ मतदार) व वॉर्ड ८ मध्ये (७०२ मतदार) आहेत. वॉर्ड लहान व मतदार संख्या कमी असल्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना कस लागणार आहे. माजी सरपंच शिरीष भांगे, माजी सरपंच नितीन दर्यापूरकर, माजी सरपंच अरविंद चरडे, माजी उपसभापती प्रेम महिले, शिवसेना नेते संदीप टिपले, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पालीवाल या सर्वांना ही निवडणूक वाटते तितकी सोपी नसून यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा हिशेब मतदारांना द्यावा लागणार आहे. गत ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले काही उमेदवार पुन्हा आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. त्यांना फक्त सात महिन्यांचा सत्ता कालावधी उपभोगता आला. त्यांना या कालावधीत काही करता आले नाही. यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांत सहानूभुती दिसून येत आहेत.भाजपा व काँग्रेसचे १७ उमेदवार तर शिवसेनेने १४ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त पाच उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. आप आणि माकपानेही उमेदवारी नोंदविली आहे. खरी लढत जरी काँग्रेस आणि भाजपात होणार असली तर शिवसेनेचे काही उमेदवार आणि अपक्ष उमेदवार वरील दोन्ही पक्षाचे राजकीय समीकरण बिघडवून विजयांची अनिश्चितता वाढवित आहे. विजय कुणाचा हे आज तरी सामने कठीण आहे.