शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आली गोविंदपूर गावात बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील गोविंदपूर हे साधारण ७०० लोकवस्तीचे गाव आहे. येथील नागरिकांना आरोग्य सेवा, प्रशासकीय काम तथा शिक्षणासाठी दररोज तरोडा, हिंगणघाट, वर्धा येथे जावे लागते; पण ये-जा करण्यासाठी परिवहन महामंडळाची बसफेरी नसल्याने पायपीट करावी लागत होती. वारंवार मागणी केल्यानंतर परिवहन महामंडळाने बसफेरी सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बुधवारी गावात ...

ठळक मुद्देआनंदोत्सव : गावकऱ्यांनी केले बसचे जोरदार स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील गोविंदपूर हे साधारण ७०० लोकवस्तीचे गाव आहे. येथील नागरिकांना आरोग्य सेवा, प्रशासकीय काम तथा शिक्षणासाठी दररोज तरोडा, हिंगणघाट, वर्धा येथे जावे लागते; पण ये-जा करण्यासाठी परिवहन महामंडळाची बसफेरी नसल्याने पायपीट करावी लागत होती. वारंवार मागणी केल्यानंतर परिवहन महामंडळाने बसफेरी सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बुधवारी गावात बस पोहोचल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.बसफेरी सुरू करण्याकरिता बस येथील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. लोकप्रतिनिधींना निवेदने दिली; पण लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित धोरणामुळे येथे बस सुविधा सुरू होऊ शकली नाही. स्वातंत्र्याची ७० वर्षे लोटली तरी गोविंदपूर येथील ग्रामस्थांना लालपरीचे दर्शन झाले नव्हते. अखेर ती प्रतीक्षा बुधवारी संपुष्टात आली. हिंगणघाट ते बेला, वाघोली मार्गे बसफेरी सुरू करण्यात आली. या बसने शहर गाठणे आता सोयीचे होणार आहे. ही बस हिंगणघाट येथून बेला, वाघोली, गोेविंदपूर, नुरापूर, सास्ताबाद, सावली, तरोडा मार्गे वर्धेला येणार आहे. ग्रामस्थांनी बसला हार वाहून नारळ फोडले. चालक व वाहक टिपले यांचा सत्कार केला. बसफेरीसाठी नुरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते कवडू गजभिये यांनी आटोकाट प्रयत्न केले. ग्रामस्थांनी त्यांचाही गौरव केला. यावेळी राहुल चौधरी, मनोहर राऊत, राहुल दालवणकर, बालू खोब्रागडे, अमोल रंगारी, दुर्योधन, रूपचंद खोब्र्रागडे, सुनील धोबे, प्रवीण देवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.