शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीत जिल्हाधिकाऱ्यांची पहिली नोंद

By admin | Updated: October 11, 2015 00:23 IST

सामान्य नागरिकांच्या तपशिलाची सत्यता पडताळण्याबरोबरच एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर) डेटाबेस अद्यावत करण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे.

नोंदवही अद्ययावतीकरण मोहिमेला प्रारंभ : नवीन कुटुंबांचा समावेश, घरोघरी भेट देत माहितीचे संकलनवर्धा: सामान्य नागरिकांच्या तपशिलाची सत्यता पडताळण्याबरोबरच एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर) डेटाबेस अद्यावत करण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी स्वत: एनपीआरमध्ये आधार क्रमांकाचे शनिवारी समयोजन करून झाला. ही विशेष मोहीम ९ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून प्रत्येक नागरिकाने एनपीआरमध्ये आधार क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी एनपीआर डेटाबेसमध्ये जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी अद्यावत करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी जी.सी. टेंभुर्णे, सहायक शिक्षक निलेश गुल्हाने, ए.एम. तुरक्याल, ए.पी. वाशिमकर, पी.एच. वाघ, भारती चांदेकर, वंदना दांडेकर यांची उपस्थिती होती.घरोघरी भेटी देऊन गणनेच्या माध्यमातून डेटाबेसमध्ये आधार कार्डाचे समायोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन निवासी अथवा कुटुंबांचाही यात समावेश करण्यात येणार आहे. डेटाबेस अद्यावतीकरणासाठी ९ नोव्हेंबर २०१५ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. डेटाबेस अद्यावत करताना सरकारी अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन एनपीआर डेटाबेससाठी आधार क्रमांकाचे समायोजन करणार असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यावेळी केले.रजिस्टरमध्ये अद्यावतीकरण करताना जर आधार क्रमांक उपलब्ध असेल तर विहित जागेत सर्व सामान्य निवासीकरिता आधारकार्डावरून एकदम डाव्या बाजूने सुरुवात करून काळजीपूर्वक १२ अंकी आधार क्रमांक नोंदवावा. उपलब्ध नसेल तर पोचपावतीवरून २८ अंकी इआयडी क्रमांक नोंदवावा. नाव नोेंदविलेले आहे, परंतु आधार क्रमांक उपलब्ध नाही अशांच्या बाबतीत उपलब्ध नाही या चौकोनात नोंद करावी. आधारकरिता नाव नोंदविलेले नसेल तर नोंदणी केलेली नाही, अशी खूण करावी. उपलब्ध असल्यास प्रत्येक सामान्य निवासींचा १० अंकी मोबाईल क्रमांकाचीही नोंद घ्यावी. क्षेत्र कार्यादरम्यान प्रगणकाला नवीन सामान्य निवासी अथवा नवीन कुटुंबे आढळल्यास त्यांची माहितीही एनपीआर पुस्तिकेतील कोऱ्या नवीन एनपीआर पत्रकामध्ये भरावी, अशा सूचनाही केल्या. क्षेत्रीय कार्य संपल्यानंतर अद्यावत केलेली माहिती एनपीआर पुस्तिका आणि इतर साम्रगी चार्ज अधिकाऱ्यांकडे वेळेत सूपूर्द करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) १२ अंकी आधार क्रमांक महत्त्वाचा जिस्टरमध्ये अद्यावतीकरण करताना जर आधार क्रमांक उपलब्ध असेल तर विहित जागेत आधारकार्डावरून एकदम डाव्या बाजूने सुरुवात करून काळजीपूर्वक १२ अंकी आधार क्रमांक नोंदवावा. कार्ड उपलब्ध नसल्यास पोचपावतीवरून २८ अंकी इआयडी क्रमांक नोंदवावा.