शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अग्नितांडव; पाच दुकानांची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:15 IST

शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. एका पाठोपाठ पाच दुकानांना आगीने कवेत घेत नजीकच्या दोन घरांनाही झळ पोहचली.

ठळक मुद्देदीपोत्सवाच्या आनंदावर विरजन : दोन घरांना आगीची झळ; कोट्यवधीच्या नुकसानीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला. एका पाठोपाठ पाच दुकानांना आगीने कवेत घेत नजीकच्या दोन घरांनाही झळ पोहचली. आगीचे लोळ पाहून नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत बचावकार्य सुरु केले. बुधवारी रात्री ९.४० वाजता घडलेल्या या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधीच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे.मुख्य बाजार चौकातील बोहरा समाजाच्या व्यापाऱ्यांची मोठी प्रतिष्ठाने असून यातील पाच हार्डवेअरला रात्री ९.४० वाजता अनाचक आग लागली. आगीमुळे शहरात पडलेला लख्ख प्रकाश पाहून सर्वत्र खळबळ उडाली होती. तब्बल तीनतास चाललेल्या या अग्नितांडवामध्ये पाचही दुकानाची राखरांगोळी झाली तर दोन घरांचेही नुकसान झाले आहे. या बाजारपेठेतील दुकानांमध्ये असलेले फटाके तसेच दुकानांमागील घरातील गॅस सिलिंडर व महिलांना सुरक्षीतपणे बाहेर काढण्यासाठी पोलिसांसह समाजसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली. या भीषण आगीत सैफी हार्डवेअर्स हकीमी हार्डवेअर्स, सैफी मशनरीज, भामल ट्रेडर्स, मोईजुद्दीन फकु्रद्दीन या प्रतिष्ठांमधील साहित्य जळून राख झाले. आगीचे कारण अद्यापही कळू शकले नाही.तीन तासानंतर आगीवर नियंत्रणस्थानिक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत बोहरा समाजातील व्यापाºयांच्या प्रतिष्ठानाला बुधवारी ९.४० वाजता अचानक आग लागली. आगीचे लोळ उठताना दिसताच नागरिकांनी दीपोत्सवाचा आनंद बाजुला ठेऊन आगीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी पाच दुकाने आगीत धुमसत होती. तसेच या आगीने बोहरा गल्लीतील दोन घरांनाही लक्ष केले होते. पोलिसांसह, समाजसेवक व नागरिकांनी आपापल्यापरीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे पुलगाव कॅम्प, नगर परिषद वर्धा, नगर परिषद आर्वी व नगर परिषद चांदुर (रेल्वे) येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सर्वांच्या परिश्रमांती तीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. पण, तोपर्यंत पाचही दुकानातील साहित्य जळून राख झाले होते.पोलिसांवर दगडफेकआगीने बोहरागल्लीतील दोन घरांना लक्ष केले होते. त्यामुळे जीवितहानी होवू नये म्हणून पोलिसांनी सर्व दुकानाच्या मागील बोहरागल्लीत धाव घेतली. त्यानंतर पोलीस रेल्वे स्टेशन चौकात आले. परंतु काही युवकांचा गैरसमज झाल्याने त्यांनी पोलिसावर दगडफेक करून गाडी उलटविण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :fireआग