शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणीकरिता सापडेना शेतमजूर

By admin | Updated: November 27, 2015 02:20 IST

सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे.

ग्रामीण भागातील वास्तव : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढवर्धा : सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे. जिल्ह्यातील मजूर अधिक पैसे मिळत असल्याने बाहेर जिल्ह्यात जात आहे. यामुळे या शेतकऱ्यांना बाहेर जिल्ह्यातील मजूर आणावे लागत आहे. हा प्रकार जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात अधिक दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी जेरीस आले आहेत.जिल्ह्यातील सेलू, आर्वी, आष्टी, देवळी, कारंजा, पुलगाव, हिंगणघाट, समुद्रपूर या आठही तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यास शेतात कापूस मोठ्या प्रमाणावर असल्याने शेत पांढरी दिसत आहेत. मात्र गत काही दिवसांपासून मजुरांअभावी कापूस वेचणीचे कामच होत नसल्याचे दिसून येत आहे. आधीच शतीमालाला योगय तो भाव मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना आता शेतात माल येऊनही केवळ मजुरांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मजुरीचे दर वाढूनदेखील आणि गावासह परिसरतील गावांमध्ये फिरूनदेखील मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत.सध्या कापूस वेचणी सहा ते सात रुपये प्रतिकिलो सुरू आहे. मात्र तरीही मजूर मिळत नसल्याने शेतकरी आपला माल वेचणीसाठी मजुरांकडे चकरा घालताना आढळून येतात. सहा ते सात रुपये प्रतिकिलोप्रमाणे कापूस वेचणी व बाहेरगावाहून मजूर ने-आणचा खर्च पाचशे ते हजार रुपयांच्या जवळपास येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक परवडेनासे झाले आहे. मजूर मिळणे अवघड होऊन बसल्याने शेतकऱ्यांची वेचणी रखडली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या शेतात असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. बाजारात कापूस व अन्य शेतमालाला कमी भाव आहे. यामुळे शेतात उगविलेले उत्पन्न गोळा करून बाजारात पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात दिसत आहेत.