शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

कापूस वेचणीकरिता सापडेना शेतमजूर

By admin | Updated: November 27, 2015 02:20 IST

सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे.

ग्रामीण भागातील वास्तव : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढवर्धा : सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे. जिल्ह्यातील मजूर अधिक पैसे मिळत असल्याने बाहेर जिल्ह्यात जात आहे. यामुळे या शेतकऱ्यांना बाहेर जिल्ह्यातील मजूर आणावे लागत आहे. हा प्रकार जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात अधिक दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी जेरीस आले आहेत.जिल्ह्यातील सेलू, आर्वी, आष्टी, देवळी, कारंजा, पुलगाव, हिंगणघाट, समुद्रपूर या आठही तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यास शेतात कापूस मोठ्या प्रमाणावर असल्याने शेत पांढरी दिसत आहेत. मात्र गत काही दिवसांपासून मजुरांअभावी कापूस वेचणीचे कामच होत नसल्याचे दिसून येत आहे. आधीच शतीमालाला योगय तो भाव मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना आता शेतात माल येऊनही केवळ मजुरांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मजुरीचे दर वाढूनदेखील आणि गावासह परिसरतील गावांमध्ये फिरूनदेखील मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत.सध्या कापूस वेचणी सहा ते सात रुपये प्रतिकिलो सुरू आहे. मात्र तरीही मजूर मिळत नसल्याने शेतकरी आपला माल वेचणीसाठी मजुरांकडे चकरा घालताना आढळून येतात. सहा ते सात रुपये प्रतिकिलोप्रमाणे कापूस वेचणी व बाहेरगावाहून मजूर ने-आणचा खर्च पाचशे ते हजार रुपयांच्या जवळपास येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक परवडेनासे झाले आहे. मजूर मिळणे अवघड होऊन बसल्याने शेतकऱ्यांची वेचणी रखडली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या शेतात असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. बाजारात कापूस व अन्य शेतमालाला कमी भाव आहे. यामुळे शेतात उगविलेले उत्पन्न गोळा करून बाजारात पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात दिसत आहेत.