शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कापूस वेचणीकरिता सापडेना शेतमजूर

By admin | Updated: November 27, 2015 02:20 IST

सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे.

ग्रामीण भागातील वास्तव : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढवर्धा : सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे. जिल्ह्यातील मजूर अधिक पैसे मिळत असल्याने बाहेर जिल्ह्यात जात आहे. यामुळे या शेतकऱ्यांना बाहेर जिल्ह्यातील मजूर आणावे लागत आहे. हा प्रकार जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात अधिक दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी जेरीस आले आहेत.जिल्ह्यातील सेलू, आर्वी, आष्टी, देवळी, कारंजा, पुलगाव, हिंगणघाट, समुद्रपूर या आठही तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यास शेतात कापूस मोठ्या प्रमाणावर असल्याने शेत पांढरी दिसत आहेत. मात्र गत काही दिवसांपासून मजुरांअभावी कापूस वेचणीचे कामच होत नसल्याचे दिसून येत आहे. आधीच शतीमालाला योगय तो भाव मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना आता शेतात माल येऊनही केवळ मजुरांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मजुरीचे दर वाढूनदेखील आणि गावासह परिसरतील गावांमध्ये फिरूनदेखील मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत.सध्या कापूस वेचणी सहा ते सात रुपये प्रतिकिलो सुरू आहे. मात्र तरीही मजूर मिळत नसल्याने शेतकरी आपला माल वेचणीसाठी मजुरांकडे चकरा घालताना आढळून येतात. सहा ते सात रुपये प्रतिकिलोप्रमाणे कापूस वेचणी व बाहेरगावाहून मजूर ने-आणचा खर्च पाचशे ते हजार रुपयांच्या जवळपास येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक परवडेनासे झाले आहे. मजूर मिळणे अवघड होऊन बसल्याने शेतकऱ्यांची वेचणी रखडली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या शेतात असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. बाजारात कापूस व अन्य शेतमालाला कमी भाव आहे. यामुळे शेतात उगविलेले उत्पन्न गोळा करून बाजारात पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात दिसत आहेत.