शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कापूस वेचणीकरिता सापडेना शेतमजूर

By admin | Updated: November 27, 2015 02:20 IST

सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे.

ग्रामीण भागातील वास्तव : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढवर्धा : सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे. जिल्ह्यातील मजूर अधिक पैसे मिळत असल्याने बाहेर जिल्ह्यात जात आहे. यामुळे या शेतकऱ्यांना बाहेर जिल्ह्यातील मजूर आणावे लागत आहे. हा प्रकार जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात अधिक दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी जेरीस आले आहेत.जिल्ह्यातील सेलू, आर्वी, आष्टी, देवळी, कारंजा, पुलगाव, हिंगणघाट, समुद्रपूर या आठही तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यास शेतात कापूस मोठ्या प्रमाणावर असल्याने शेत पांढरी दिसत आहेत. मात्र गत काही दिवसांपासून मजुरांअभावी कापूस वेचणीचे कामच होत नसल्याचे दिसून येत आहे. आधीच शतीमालाला योगय तो भाव मिळत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना आता शेतात माल येऊनही केवळ मजुरांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मजुरीचे दर वाढूनदेखील आणि गावासह परिसरतील गावांमध्ये फिरूनदेखील मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत.सध्या कापूस वेचणी सहा ते सात रुपये प्रतिकिलो सुरू आहे. मात्र तरीही मजूर मिळत नसल्याने शेतकरी आपला माल वेचणीसाठी मजुरांकडे चकरा घालताना आढळून येतात. सहा ते सात रुपये प्रतिकिलोप्रमाणे कापूस वेचणी व बाहेरगावाहून मजूर ने-आणचा खर्च पाचशे ते हजार रुपयांच्या जवळपास येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक परवडेनासे झाले आहे. मजूर मिळणे अवघड होऊन बसल्याने शेतकऱ्यांची वेचणी रखडली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या शेतात असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. बाजारात कापूस व अन्य शेतमालाला कमी भाव आहे. यामुळे शेतात उगविलेले उत्पन्न गोळा करून बाजारात पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात दिसत आहेत.