शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आर्थिक साक्षरता कार्यशाळा ही आजच्या काळाची गरज

By admin | Updated: January 14, 2016 02:50 IST

केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागातील सर्व साधारण लोकांना माहिती होणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ नये ..

जुथिया जिवाणी : शासनाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन कार्यशाळावर्धा : केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागातील सर्व साधारण लोकांना माहिती होणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ नये त्याकरिता ‘आर्थिक साक्षरता’ यासारखी कार्यशाळा राबविणे ही काळाची गरज आहे. मत भारतीय रिजर्व बँकेच्या क्षेत्रीय निदेशक जूथिया जिवाणी यांनी व्यक्त केले.भारतीय रिजर्व बँकद्वारे हिंदी विद्यापीठात आर्थिक साक्षरता कार्यशाळेचे आयोजन केले होते. कमलनयन बजाज फाऊंडेशनद्वारे संचालित बचत गट, बँक आॅफ इंडिया द्वारे संचालित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानचे प्रशिक्षणार्थी, हिंदी विद्यापीठाचे शिक्षक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत सदर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून जिवाणी बोलत होत्या. आरबीआयचे उपमहाप्रबंधक कामेश्वरराव, विदर्भ क्षेत्राचे प्रबंधक रमेश कदम, उप महाप्रबंधक एस.व्ही. सातपुते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा, जन-धन, जीवन ज्योती सुरक्षा, अटल पेंशन, मुद्रा आदी योजनांविषयी सविस्तर माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक विजय जांगडा यांनी दिली. शेती विषयक विविध योजनांची सविस्तर माहिती नाबार्डच्या डीडीएम डॉ. स्रेहल बंसोड, स्वरोजगार प्रशिक्षण कार्याची माहिती निदेशक अनिल पाटील, वित्तीय समावेशन समुपदेशन केंद्र वर्धा (अभय) च्या कार्याची माहिती अशोक गवई, तसेच आर्थिक व्यवहारात नकली नोटा कशा ओळखाव्यात याची माहिती रिजर्व बँकेचे एल.एस. भाटी यांनी दिली. याप्रसंगी सिव्हील रोड, वर्धा येथे निसर्ग सेवा समितीच्या सहयोगाने मुख्य अथितींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालन व आभार भारतीय रिजर्व बँकेचे सहायक महाप्रबंधक नीता गेडाम यांनी केले. कार्यशाळेला भारतीय रिजर्व बँकेचे पदाधिकारी, अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी बुद्धदास मिरगे, मुरलीधर बेलखोडे, अमोल वैद्य, रिजर्व बँकेचे कर्मचारी आदींंनी सहकार्य केले. युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)