शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

रूरल मॉलमुळे बचत गटांना आर्थिक स्थैर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:01 IST

महात्मा गांधींची ग्राम विकासाची संकल्पना साकार करण्यासाठी गृह व कुटीर उद्योगांना बळकटी मिळणे गरजेचे आहे. बचत गटाच्या माध्यमातून उभे राहिलेल्या गृह व कुटीर उद्योगांमार्फत उत्पादित वस्तूंना ....

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : खासदारांच्या हस्ते शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींची ग्राम विकासाची संकल्पना साकार करण्यासाठी गृह व कुटीर उद्योगांना बळकटी मिळणे गरजेचे आहे. बचत गटाच्या माध्यमातून उभे राहिलेल्या गृह व कुटीर उद्योगांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून वर्धा जिल्ह्यात ‘दी रूरल मॉल’ सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता महिला व शेतकरी बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन झाल्याचे घोषित केले. या मॉलचे प्रत्यक्ष फीत कापून उद्घाटन खा. रामदास तडस यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, न.प. अध्यक्ष अतुल तराळे, कृषी समृद्धी समन्वयित विकास प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक निलेश वावरे, माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी ललिता दारोकर उपस्थित होत्या.दी रूरल मॉल हे बचत गटाच्या व्यवसायाला मिळालेली सुवर्ण संधी आहे. महिला व शेतकºयांनी याचा उपयोग करून घ्यावा. उत्पादित मालाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन खा. तडस यांनी केले.शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत यांनी उत्पादित व प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांना विक्रीचे ठिकाण उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने दी रुरल मॉल सुरू केला. मुख्य रेल्वे स्टेशन समोरील पुरवठा विभागाच्या बंद गोदामाला मॉलचे रूप दिले आहे. या मॉलद्वारे ग्राहकांना चांगल्या प्रतीची उत्पादने वाजवी दरात मिळतील. शेतकºयांना विपनन प्रक्रियेशी जोडण्यास्तव राबविलेला महत्वाकांक्षी उपक्रम आहे. ग्राहकांनी या मॉलला भेट देत खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.यावेळी जि.प. सीईओ नयना गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कल्पना जुईकर उपस्थित होते. हा रथ जिल्ह्यातील सेवाग्राम, कान्हापूर, पडेगाव, इसापूर व भिडी या ग्रा.पं.मध्ये कला पथकाच्या माध्यमातून ग्राम विकासाच्या योजनांचा प्रचार करेल. रथाचा पूढील प्रवास यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, हिंगोली जिल्ह्यांत होणार आहे. यावेळी देवकुमार कांबळे, मनीष कावडे, गजानन ताजने, अमोल पाटील, अमोल भागवत, रोटोले आदी उपस्थित होते.ग्राम विकासासाठी लोकांचा सहभाग व भागीदारी वाढविण्याकरिता मिशन अंत्योदय अंतर्गत १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान ग्राम समृद्धी व स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. राज्यात ग्रामविकासाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी कौशल्य रथ प्रत्येक जिल्ह्यात फिरविण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात गुरूवारी आगमन झालेल्या या रथाला महात्मा गांधी चौक येथून खा. रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.