शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

अखेर ‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळाला शाळेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:51 IST

उमेदच्या संकल्प प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळा, रोठा येथे दोन वर्षापूर्वी पारधी समाजातील ३० मुलांना दाखल करण्यात आले होते. यावर्षी या मुलांना दाखले देऊन शाळाबाह्य करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मून यांच्या प्रयत्नाने त्यांना वर्ध्यातील दोन शाळेत प्रवेश देण्यात आला.

ठळक मुद्देवर्ध्यातील दोन शाळांनी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उमेदच्या संकल्प प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळा, रोठा येथे दोन वर्षापूर्वी पारधी समाजातील ३० मुलांना दाखल करण्यात आले होते. यावर्षी या मुलांना दाखले देऊन शाळाबाह्य करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मून यांच्या प्रयत्नाने त्यांना वर्ध्यातील दोन शाळेत प्रवेश देण्यात आला.जिल्हा परिषद शाळा, रोठा येथे पारधी समाजाच्या या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात असल्याने ते शिक्षणापासून कोसो दूर होते. अशातच या विद्यार्थ्यांना यावर्षी दाखले देऊन शाळाबाह्य करण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांसह प्रकल्प संचालिका मून यांनी जिल्हा परिषदेपुढे आंदोलन करुन मुख्याध्यापक व शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या मुलांचे यावर्षी शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता चांगल्या शाळेचा शोध सुरु केला. अखेर मानस मंदिर शाळा आणि वर्धा कन्या शाळेने पुढाकार घेतल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मानस मंदिर शाळेत बालवाडी ते चवथी पर्यंतच्या तर वर्धा कन्या शाळेत पाचवी ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.