शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

१० वर्षांपूर्वी दिले होते फिल्टर

By admin | Updated: March 26, 2016 02:04 IST

जिल्ह्यातील बऱ्याच अंगणवाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या चिमुकल्यांना घरूनच पाणी आणावे लागत आहे.

शुद्ध पाण्याअभावी चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यातवर्धा : जिल्ह्यातील बऱ्याच अंगणवाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. येथे येणाऱ्या चिमुकल्यांना घरूनच पाणी आणावे लागत आहे. १० वर्षांपूर्वी काही निवडक अंगणवाड्यांना वॉटर फिल्टर देण्यात आले होते; मात्र ते कुठल्या अंगणवाड्यांना वाटप केल्या गेले याची माहिती जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाकडे नाही. यामुळे हे फिल्टर खरच अंगणवाड्यांना की ते कागदावरच होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. अंगणवाडीला पाणी पुरविण्याची जबादारी ग्रामपंचायतीकडे आहे. यावर ग्रामपंचायतीला १० टक्के निधी खर्च करावा लागतो. मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी असून १७६ मिनी अंगणवाडी आहे. १,२८१ पैकी ३८ अंगणवाडी भाडेतत्वावर आहेत. यातील काही अंगणवाडी जि.प. शाळेच्या इमारतीमध्ये भरवल्या जात आहेत. अंगणवाडी इमारतीचा प्रश्न असताना विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळत नाही. यामुळे अंगणवाड्यांतील चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंगणवाडीतील मुलांना पुरविण्यात येत असलेले पाणी शुद्ध करण्याकरिता गतवर्षीपासून ‘जीवन ड्रॉप’ आणण्यात येत आहे; मात्र त्या ड्रॉपवरही वैधता दिनांक नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणीच पिण्याकरिता देण्यात येत असल्याची चर्चा जोरात आहे. काही अंगणवाडीतील ग्राम पंचायतीने नळ दिले आहे. कुठे हातपंप तर काही ठिकाणी विहिरीचे पाणी आहे. यामुळे या समस्येकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.अंगणवाडीच्या ३८ इमारती भाडेतत्त्वावर अंगणवाडीच्या इमारतीचीही दुरवस्था झाली आहे. एकूण ३८ अंगणवाड्या अद्यापही भाडे तत्वावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या १५ अंगणवाड्यांचे काम तांत्रिक अडचणीमुळे अर्धवट रखडले आहे. अंगणवाडी बांधकाम निधी राज्य शासनामार्फत येत असून ग्राम पंचायतीला जमा होतो. यामुळे कामाला पाहिजे तशी गती मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी येथे सुविधांची आणवा असल्याचे दिसून येत आहे.