शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

लढवय्ये मैदानात, आता प्रचार तोफांचा मारा सुरू

By admin | Updated: October 3, 2014 02:03 IST

छानणीत नामांकन रद्द आणि नामांकन परत घेण्याचे सोपस्कार बुधवारी पार पडल्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात ६९ लढवय्ये एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत.

राजेश भोजेकर वर्धाछानणीत नामांकन रद्द आणि नामांकन परत घेण्याचे सोपस्कार बुधवारी पार पडल्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात ६९ लढवय्ये एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. या महासंग्रामाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असून प्रचारतोफांचा माराही सुरू झाला आहे. एकेकाळचे मित्रही मैदानात असल्याने कोण कोणाला पटकणी देतो. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अपक्षांचेही बारीकसारीक हल्ले आलेच. यामुळे दिग्गजांचा चांगलाच कस लागणार आहे. कार्यकर्ते प्रचार साहित्य घेऊन सज्ज झाले आहेत. प्रचार वाहनेही क्षेत्रात फिरायला लागली असून निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झालेली आहे. प्रचारात कोण आघाडी घेतो, यावरही बरेच काही अवलंबून असल्यामुळे प्रत्येक उमेदवार त्या दृष्टीने धडपडताना दिसून येत आहे.वर्धेत बहुरंगी चित्रनागरिकांचे लक्ष लागून असलेल्या वर्धा मतदार संघात सर्वाधिक २१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १४ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे असून सात अपक्ष उमेदवारांचा समावेश आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी दिग्गजांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. युती तुटल्यामुळे या मतदार संघात भाजप पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे. यामुळे मतांचे गणित मांडणे कठिण झाले असले तरी सर्वच राजकीय पक्षांच्या मतांची ताकत बघता कोण बाजी मारणार हे सांगणे अवघड आहेत. देवळीत मतांचे विभाजन दिग्गजांची डोकेदुखीदेवळी मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या मतदार संघात १९ उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने मनसे बाद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे काँग्रेस आणि भाजपपुढे कडवे आव्हान आहे. सर्वाधिक नऊ अपक्ष रिंगणात असल्यामुळे मतांचे विभाजन दिग्गजांचे गणित बिघडवणार, असे सध्याचे चित्र आहे.शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचे आव्हानशिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणघाट मतदार संघात शिवसेनेपुढे मनसेच्या रुपाने कडवे आव्हान आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा झाल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. त्यातच भाजपा पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे जात असून गेल्या निवडणुकीत अपक्ष असलेल्या उमेदवाराला तिकीट दिली. अपक्ष असताना चोहोबाजूने सदर उमेदवाराला मते मिळाली होती. आता भाजपचे नाव सदर उमेदवारापुढे लागल्यामुळे अनेक मतदार संभ्रमात पडले आहेत. हा मतदार संघ २००९ मध्ये राष्ट्रवादीने सेनेकडून हिरावून घेतला होता. राष्ट्रवादीही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जात आहे. आघाडीनंतर काँग्रेस पहिल्यांदाच ही निवडणूक लढत असल्यामुळे येथे निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. पाच अपक्ष उमेदवारही रिंगणात असून ते कोणाचे गणित बिघडवते, याकडे लक्ष लागले आहे.काँग्रेस-भाजपातील सरळ लढतीला अपक्ष व राकाँमुळे नवा रंगआर्वी मतदार संघात काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढतीचा इतिहास आहे. यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतांचे विभाजन आलेच. यात आठ अपक्ष उमेदवारांनी भर घातली आहे. पंचायत समित्यांमध्ये भाजपची राष्ट्रवादीसोबत गट्टी असल्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत प्रहार संघटना भाजपसोबत होती. या निवडणुकीत प्रहारने अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील पारंपरिक सरळ लढतीला नवा रंग चढणार आहे.