शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गावात पाचशेऐवजी आता पन्नासच बैलजोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून या गावी वास्तव्यास आला.

ठळक मुद्देराहिल्यात केवळ आठवणी : निम्न वर्धामुळे वाठोडाचे विभाजन

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाठोडा (खोंडे) या गावी ४ हजार लोकांची वस्ती होती. या गावामध्ये ५०० बैलजोड्या असल्याने त्यांचा मोठा पोळा भरायचा. हा पोळा तालुक्यामध्ये प्रसिद्ध होता. बैलजोड्यांची आकर्षक सजावट करणाऱ्यांवर बक्षिसांची लयलूट व्हायची.पण, हे गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे पुनर्वसन झाल्याने विभाजन करण्यात आले. परिणामी पोळ्याची मजाही गेली आणि पाचशे बैलजोड्यांच्या गावात आता यांत्रिकीकरणामुळे ५० बैलजोड्याच शिल्लक राहिल्या आहेत.वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून या गावी वास्तव्यास आला. कालांतराने विविध जातीधर्मांचे लोकही या गावात वास्तव्यास आले. खोंडे परिवाराकडे या गावाची पाटीलकी असल्यामुळे या गावाला वाठोडा (खोंडे ) असे नामानिधान झाले. आजुबाजुचा प्रसन्न परिसर, सुपीक जमीन, आमराई तसेच या गावातील वाड्यांवरुन गावाची संपन्नता लक्षात यायची. ब्रिटिशांच्या काळात या गावाची मालगुजारी खोंडे परीवाराकडे होती. कालांतराने ही मालगुजारी डागा परिवाराकडे आली.चोहनदीच्या पात्रातील हनुमंताचे भव्य मंदिर तत्कालीन मालगुजार किसनदास डागा यांनी बांधले आहे. आजही हे मंदिर निम्न वर्धा धरणाच्या पाण्यात मजबूत स्थितीत डौलाने उभे आहे. एकोप्याने नांदणारे हे गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे हैबतपूर, अंबिकापूर व भाईपूर या तीन ठिकाणी पूनर्वसन झाले आहे.त्यामुळे पोळ्यासह इतरही सामूहिक कार्यक्रमांचा आनंद हिरावला आहे.तसेच यांत्रिकिरणालाही चालना मिळाल्याने आता सण, उत्सवावरही त्याचा परिणाम झाला आहे.वाठोड्यातून मिळाले तीनआर्वी तालुक्याच्या इतिहासात वाठोडा (खोंडे) या गावाला अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. या गावाने शैक्षणिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रामध्ये आपली वेगळीच छाप सोडली आहे. या गावाने तीन आमदार दिले असून त्यामध्ये स्व.नारायणराव काळे, स्व.शरदराव काळे व माजी आमदार अमर काळे यांचा समावेश आहे. या गावातील अनेक व्यक्ती मोठ्या पदावर कार्यरत आहे. या गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भेट दिली आहे.महाप्रसादातही खंडयेथील वाळवंटातल्या महाप्रसादाचं सर्वांना महत्त्व होतं. अख्खं गाव या महाप्रसादाला उपस्थित रहायचं. भाकर, कन्या व डाळभाजीच्या जेवणाची मजा काही औरच होती. येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरायचा. तेथेच खेळाचे मैदान होते. क्रिकेट,व्हॉलीबॉल, विटी दांडू, सुरकांडी, आपडाफ, कंचे, कबड्डी, खुप्पस असे नानाविध खेळ खेळले जात. दरवर्षी आषाढीपासून सणांना सुरुवात व्हायची. या सणांना गावातील सर्व मंडळी गुण्यागोविंदाने साजरे करायचे.

टॅग्स :Socialसामाजिक