शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

गावात पाचशेऐवजी आता पन्नासच बैलजोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून या गावी वास्तव्यास आला.

ठळक मुद्देराहिल्यात केवळ आठवणी : निम्न वर्धामुळे वाठोडाचे विभाजन

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाठोडा (खोंडे) या गावी ४ हजार लोकांची वस्ती होती. या गावामध्ये ५०० बैलजोड्या असल्याने त्यांचा मोठा पोळा भरायचा. हा पोळा तालुक्यामध्ये प्रसिद्ध होता. बैलजोड्यांची आकर्षक सजावट करणाऱ्यांवर बक्षिसांची लयलूट व्हायची.पण, हे गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे पुनर्वसन झाल्याने विभाजन करण्यात आले. परिणामी पोळ्याची मजाही गेली आणि पाचशे बैलजोड्यांच्या गावात आता यांत्रिकीकरणामुळे ५० बैलजोड्याच शिल्लक राहिल्या आहेत.वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून या गावी वास्तव्यास आला. कालांतराने विविध जातीधर्मांचे लोकही या गावात वास्तव्यास आले. खोंडे परिवाराकडे या गावाची पाटीलकी असल्यामुळे या गावाला वाठोडा (खोंडे ) असे नामानिधान झाले. आजुबाजुचा प्रसन्न परिसर, सुपीक जमीन, आमराई तसेच या गावातील वाड्यांवरुन गावाची संपन्नता लक्षात यायची. ब्रिटिशांच्या काळात या गावाची मालगुजारी खोंडे परीवाराकडे होती. कालांतराने ही मालगुजारी डागा परिवाराकडे आली.चोहनदीच्या पात्रातील हनुमंताचे भव्य मंदिर तत्कालीन मालगुजार किसनदास डागा यांनी बांधले आहे. आजही हे मंदिर निम्न वर्धा धरणाच्या पाण्यात मजबूत स्थितीत डौलाने उभे आहे. एकोप्याने नांदणारे हे गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे हैबतपूर, अंबिकापूर व भाईपूर या तीन ठिकाणी पूनर्वसन झाले आहे.त्यामुळे पोळ्यासह इतरही सामूहिक कार्यक्रमांचा आनंद हिरावला आहे.तसेच यांत्रिकिरणालाही चालना मिळाल्याने आता सण, उत्सवावरही त्याचा परिणाम झाला आहे.वाठोड्यातून मिळाले तीनआर्वी तालुक्याच्या इतिहासात वाठोडा (खोंडे) या गावाला अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. या गावाने शैक्षणिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रामध्ये आपली वेगळीच छाप सोडली आहे. या गावाने तीन आमदार दिले असून त्यामध्ये स्व.नारायणराव काळे, स्व.शरदराव काळे व माजी आमदार अमर काळे यांचा समावेश आहे. या गावातील अनेक व्यक्ती मोठ्या पदावर कार्यरत आहे. या गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भेट दिली आहे.महाप्रसादातही खंडयेथील वाळवंटातल्या महाप्रसादाचं सर्वांना महत्त्व होतं. अख्खं गाव या महाप्रसादाला उपस्थित रहायचं. भाकर, कन्या व डाळभाजीच्या जेवणाची मजा काही औरच होती. येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरायचा. तेथेच खेळाचे मैदान होते. क्रिकेट,व्हॉलीबॉल, विटी दांडू, सुरकांडी, आपडाफ, कंचे, कबड्डी, खुप्पस असे नानाविध खेळ खेळले जात. दरवर्षी आषाढीपासून सणांना सुरुवात व्हायची. या सणांना गावातील सर्व मंडळी गुण्यागोविंदाने साजरे करायचे.

टॅग्स :Socialसामाजिक