शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

पशुगणनेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:02 IST

प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त असून रखडलेली २० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या पशुगणना प्रक्रियेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात ६२.६१ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमार्च अखेरपर्यंत करावा लागेल अहवाल सादर । टॅबद्वारे नोंद घेण्याचे ६२.६१ टक्के झाले काम

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त असून रखडलेली २० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या पशुगणना प्रक्रियेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात ६२.६१ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.पशुगणना पूर्ण करण्याची अखेरची मुदत ३१ डिसेंबर होती. परंतु, विविध कारणांमुळे पशुगणनेचे काम पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने पशुगणनेच्या कामाला गती देण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील पशुंची गणना करण्यासाठी ११४ टॅब, पॉवर बँक व सिम उपलब्ध करून देण्यात आले आहे.इतकेच नव्हे तर टॅबमध्ये असलेले पूर्वीचे २.० अ‍ॅप वर्जन प्रत्यक्ष काम करण्यासाठी त्रासदायक असल्याने ३.० हे वर्जन टाकून पशुच्या गणनेच्या कामाला गती देण्यात आली. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९ हजार ८४६ ठिकाणी भेटी देऊन टॅबद्वारे पशुची नोंद घेण्यात आली आहे. तर राज्यात प्रथम क्रमांवर गोंदिया, द्वितीय स्थानी अकोला, तृतीय स्थानी हिंगोली तर चतुर्थ स्थानी बुलढाणा जिल्हा असल्याचे सांगण्यात आले. सदर पशुगणना पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.मुंबई शेवटच्या स्थानी२० व्या पशुगणनेचे गोंदिया जिल्ह्याने ८७.८१ टक्के काम पूर्ण केले आहे. शिवाय हा जिल्हा सध्या प्रथम क्रमांकावर आहे. तर वर्धा जिल्ह्यात पशुच्या गणनेचे काम ग्रामीण भागात ७१.४२ तर शहरी भागात ४३.३७ टक्के झाले आहे. वर्धा जिल्ह्यात एकूण ६२.६१ टक्के काम झाल्याने वर्धा जिल्हा हा सध्या पशुगणनेच्या कामात राज्यात पाचव्या स्थानी आहे. तर २.३० टक्केच काम झाल्याने मुंबई शेवटून पहिल्या स्थानी असल्याचे सांगण्यात आले.