शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
4
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
5
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
6
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
7
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
8
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
9
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
10
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
11
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
12
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
13
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
14
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
15
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
16
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
17
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
18
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
19
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
20
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट

दर कपातीला काही कंपन्यांची बगल

By admin | Updated: June 18, 2015 01:45 IST

यावर्षी खरिपाच्या पेरणीला जेमतेम सुरूवात झाली. शेतकऱ्यांच्या कल कपाशीच्या लागवडीकडे आहे. शासनाने ठरवून दिलेल्या

कृषी केंद्र चालकांची कोंडी : बियाण्यांचे दर १०० रुपयांनी कमी करण्याचे आदेशअमोल सोटे ल्ल आष्टी(शहीद)यावर्षी खरिपाच्या पेरणीला जेमतेम सुरूवात झाली. शेतकऱ्यांच्या कल कपाशीच्या लागवडीकडे आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये प्रती बॅग १०० रूपये कपात केली आहे. परंतु काही बियाणे कंपन्यांनी शासनाचा आदेश डावलून अद्याप दर कमी केलेले नाही. त्यामुळे अशा कंपन्यांची बियाणे घेतलेले कृषी सेवा केंद्रचालक संकटात सापडले आहे तर दुसरीकडे शेतकरी तक्रारीवर तक्रारी करीत आहे.राज्य शासनाने ८ जून २०१५ पासून संकरित कपाशी बियाण्याचे दर १०० रू. कमी केले. आधीचे दर बीजी १-८३० रूपये असेल तर आता ७३० आणि बीजी २- ९३० रूपये असेल तर आता ८३० रूपये निर्धारित करून दिले. खरीप बियाणे घेणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकांना तीन कंपन्यांव्यतिरिक्त सर्व कंपन्यांनी शेतकऱ्याचे व दुकानादाराचे हित लक्षात घेऊन सुरूवातीलाच दर कमी केले. परंतु या तीन कंपन्यांनी कायद्याची पळवाट काढून दुकानदारांना ८ जूनपूर्वीच्या जुन्याच दराने बियाणे विका व आमचे पूर्ण बिल द्या, असे बजावून सांगितले.शासनाचे व कायद्याचे बंधन असल्यामुळे कृषी सेवा केंद्रचालक ठरवून दिलेल्या ७३० व ८३० रूपये भावाने बियाणे विकत आहे. परंतु या तीन कंपन्यांची बियाणे विकताना कृषी केंद्रचालकांना १०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यासाठी कृषी अधिकारी केंद्राला भेटी देवून नमुने तपासणीला पाठवत आहे. असे असले तरी कृषी केंद्रचालकांना या बियाणे कंपन्या हुकूमशाही पद्धतीने वागणूक देत आहे. कृषी विभागाने बियाणे कंपन्यांना ठरवून दिलेल्या भावाची अंमलबजावणी प्रत्यक्षात केली नसली तरी कृषी सेवा केंद्रचालक अंमलबजावणी करीत आहे. परंतु आता त्यांच्याकडून वसुलीसाठी कंपन्यांनी तगादा लावला आहे. याप्रकरणी कृषिमंत्र्यांना लेखी तक्रार कृषी केंद्रचालकांनी केली आहे.राज्यातील तीन कंपन्या सोडून बाकी कंपन्यांनी कृषीसेवा केंद्रचालकांना कपाशी बियाण्यांचे दर कमी करून दिले आहेत. त्यामुळे या कंपन्यांनीही बियाण्यांचे दर कमी करणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्यावर शासनस्तरावर कारवाई करणेही गरजेचे आहे.सोनू भार्गव,संचालक कृषी सेवा केंद्र, आष्टी (शहीद.)शेतकऱ्यांना शासन भावानुसार बियाणे विकणे सुरू आहे. बियाणे कंपन्यांनी नवीन भावाप्रमाणे आम्हाला बियाणे दिले नाही. यासाठी कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. शासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. दिनेश बुले,संचालक कृषीसेवा केंद्र, तळेगाव (श्या.पं.)शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच बियाणे विक्री सुरू आहे. कंपन्यांनी भाव कमी करून कृषी सेवा केंद्र संचालकांना दिलासा देणे आवश्यक आहे. विजय मेंढजोगे,तालुका कृषी अधिकारी, आष्टी (शहीद.)