शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सणोत्सव; ड्रायफूडचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:51 IST

नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. दिवाळीदरम्यान ही दरवाढ अधिक गतिमान होईल, असे चित्र आहे.सणावाराला आनंद साजरा करण्यासाठी परस्परांना भेटवस्तू देण्यापेक्षा सुक्यामेव्याची पाकिटे भेट देण्याची प्रथा अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. परंतु, यंदा या परंपरेला काहीशी खीळ बसण्याची शक्यता आहे. काजू, बदाम, खारीक, अक्रोड या जिन्नसांचे वाढलेले दर पाहता बाजारपेठेत सुक्यामेव्याची विक्री घटण्याची शक्यता आहे. श्रावण महिन्यापासून विविध प्रकारचे सण साजरे करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरीपूजन, दिवाळी आदींचा समावेश आहे. मागील काही वर्षांमध्ये दिवाळीच्या फराळात सुक्यामेव्याचा वापर वाढला आहे. पण, यासोबतच सुकामेवा भेट म्हणून देण्यालाही विशेष महत्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या हंगामात घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांसह, ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी उसळते. परंतु, दरवाढीमुळे यंदा हे चित्र बदललेले दिसू शकते. आपल्याकडे येणारा सुकामेवा हा अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमार्गे येतो. भारताने पाकिस्तानशी व्यापार थांबविल्यामुळे अफगाणिस्तानातून येणारी सुकामेव्याची आवक प्रभावित होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.यामध्ये प्रामुख्याने खजूर, खारीक, अक्रोड, बदाम यांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकामेव्याच्या दरांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत दर अधिक वाढल्यास त्याचा परिणाम विक्रीवर होणार आहे.किसमिस आवाक्यातसुकामेव्यातील किसमिस हा पदार्थ बाहेर देशातून तसेच नाशिक येथून मोठ्या प्रमाणात येतो. आपल्याकडे नाशिक येथून येणाऱ्या स्थानिक किसमिसला चांगली मागणी असते. त्यामुळे किसमिसचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. तर खारिकचे दर दुप्पट झाले आहेत. १७५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी खारिक आता ३५० रुपयांना विकली जात आहे.