शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सणोत्सव; ड्रायफूडचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:51 IST

नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. दिवाळीदरम्यान ही दरवाढ अधिक गतिमान होईल, असे चित्र आहे.सणावाराला आनंद साजरा करण्यासाठी परस्परांना भेटवस्तू देण्यापेक्षा सुक्यामेव्याची पाकिटे भेट देण्याची प्रथा अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. परंतु, यंदा या परंपरेला काहीशी खीळ बसण्याची शक्यता आहे. काजू, बदाम, खारीक, अक्रोड या जिन्नसांचे वाढलेले दर पाहता बाजारपेठेत सुक्यामेव्याची विक्री घटण्याची शक्यता आहे. श्रावण महिन्यापासून विविध प्रकारचे सण साजरे करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरीपूजन, दिवाळी आदींचा समावेश आहे. मागील काही वर्षांमध्ये दिवाळीच्या फराळात सुक्यामेव्याचा वापर वाढला आहे. पण, यासोबतच सुकामेवा भेट म्हणून देण्यालाही विशेष महत्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या हंगामात घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांसह, ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी उसळते. परंतु, दरवाढीमुळे यंदा हे चित्र बदललेले दिसू शकते. आपल्याकडे येणारा सुकामेवा हा अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमार्गे येतो. भारताने पाकिस्तानशी व्यापार थांबविल्यामुळे अफगाणिस्तानातून येणारी सुकामेव्याची आवक प्रभावित होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.यामध्ये प्रामुख्याने खजूर, खारीक, अक्रोड, बदाम यांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकामेव्याच्या दरांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत दर अधिक वाढल्यास त्याचा परिणाम विक्रीवर होणार आहे.किसमिस आवाक्यातसुकामेव्यातील किसमिस हा पदार्थ बाहेर देशातून तसेच नाशिक येथून मोठ्या प्रमाणात येतो. आपल्याकडे नाशिक येथून येणाऱ्या स्थानिक किसमिसला चांगली मागणी असते. त्यामुळे किसमिसचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. तर खारिकचे दर दुप्पट झाले आहेत. १७५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी खारिक आता ३५० रुपयांना विकली जात आहे.