शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

खतसाठा पावसाने भिजला

By admin | Updated: August 8, 2015 02:27 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू असल्यामुळे बळीराजा सुखावला. शेतकऱ्यांना रासायनिक खातांची कमतरता भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

वर्धा : दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू असल्यामुळे बळीराजा सुखावला. शेतकऱ्यांना रासायनिक खातांची कमतरता भासू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परंतु रेल्वेच्या माध्यमातून सोमवार वर्धा रेल्वेस्थानकावर आलेला खतसाठा सततच्या पावसामुळे भिजला. याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला व कृषी विभागाला बसला आहे.शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी शासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहेत. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. काही वर्षापासून गोधन कमी झाल्यामुळे शेणखताचे प्रमाण कमी झाले आहे. उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी साहजीकच बळीराजादेखील रासातनिक खतांना प्राधान्य देत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उणीव भासू नये याकरिता मोठ्या प्रमाणात खतसाठा आणला जातो. खतासाठा जिल्ह्यात आणण्यासाठी रेल्वेचे माध्यम अत्यंत सुरक्षित असल्याचे समजले जाते. सोमवार’ वर्धा रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर मालधक्क्यावर हा रासायनिक खताचा साठा उतरविण्यात आला. सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात या खतसाठ्याला पावसापासून बचावार्थ त्यावर ताडपत्री टाकण्यात आल्या. पण खतसाठा जास्त असल्यामुळे सर्व खतासाठा झाकण्यात येवू शकला नाही. त्यातच टाकण्यात आलेल्या ताडपत्र्या हवेमुळे उडाल्या. परिणामी खतसाठा मोठ्या प्रमाणात भिजला. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. या खतसाठ्यामध्ये डीएपी, १५.१५.१० तसेच यरिया खतांचा समावेश होता. शेतकऱ्यांना रासायनिक खतांसाठी करावी लागणारी धावपळ पाहता खतांचा पावसापासून कसा बचाव करता येईल, याकरिता रेल्वे प्रशासनाने सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.(शहर प्रतिनिधी)