शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

६,६९९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:22 IST

जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्य पदासाठी एकूण ६ हजार ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत सुमारे ७० टक्के ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

ठळक मुद्दे२९४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक : ७० टक्के मतदान, तालुकास्थळी आज मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रा.पं. सदस्य पदासाठी एकूण ६ हजार ६९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत सुमारे ७० टक्के ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रविवारी एकूण ६ हजार ६९९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून कुणाला बहुमताचा कौल मिळाला हे सोमवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील चार ग्रा. पं. तील सरपंचासह ग्रा. पं. सदस्यांची अविरोध निवड झाल्यानंतर २९४ ग्रा. पं. तील सरपंच आणि ग्रा. पं. सदस्यांच्या निवडीसाठी रविवारी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सकाळी ठिक ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सुरूवातीला काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये क्षुल्लक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांसह मतदारांची तारांबळ उडाली होती. परंतु त्यानंतर तज्ज्ञांनी वेळीत मतदान केंद्र गाठून तांत्रिक दोष दूर केले.सकाळी ९.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ६.५१ टक्के, देवळी ५.४० टक्के, सेलू १०.७० टक्के, आर्वी ११.१४ टक्के, आष्टी १०.३७ टक्के, कारंजा १२.१४ टक्के, हिंगणघाट ९.७० टक्के तर समुद्रपूर तालुक्यात १२.०६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर जसजसा सूर्य डोक्यावर चढत मावळतीला गेला, तसतसे मतदार घराबाहेर पडल्याने मतदानाचा टक्काही वाढत गेला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात १९.२३ टक्के, देवळी १९.३५ टक्के, सेलू २६.७४ टक्के, आर्वी २७.३४ टक्के, आष्टी २७.४९ टक्के, कारंजा २८.४६ टक्के, हिंगणघाट ३७.९२ टक्के तर समुद्रपूर तालुक्यात ३०.७३ टक्के मतदान झाले होते.तर दुपारी १.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ४१.२१ टक्के, देवळी ४३.५२ टक्के, सेलू ४८.७२ टक्के, आर्वी ४८.६० टक्के, आष्टी ४९.३९ टक्के, कारंजा ४७.६२ टक्के, हिंगणघाट ४०.१९ टक्के तर समुद्रपूर तालुक्यात ५२.५४ टक्के मतदान झाले होते. तसेच दुपारी ३.३० वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात ५०.३३ टक्के, देवळी ५९.२३ टक्के, सेलू ६४.३६ टक्के, आर्वी ६७.०६ टक्के, आष्टी ६७.७४ टक्के, कारंजा ७२.८७ टक्के, हिंगणघाट ५७.४७ टक्के तर समुद्रपूर तालुक्यात ६८.७४ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले याची जुळवाजुळव वृत्तलिहिस्तोवर सुरू होती. परंतु, मतदानाचा यंदाचा टक्का ७० च्यावर जाईल असा अंदाज निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात होता.जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांची केली पाहणीरविवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना याचा आढावा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी यांनी सेलू तालुक्यातील केळझर येथील मतदान केंद्र गाठून जाणला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील अधिकाºयांशीही चर्चा केली. उल्लेखनीय म्हणजे, याच गावात प्रचाराची मुदत संपल्यानंतर सरपंचपदासाठी निवडणूक लढत असलेल्या एका उमेदवाराची जाहीर सभा झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी भिमनवार यांनी मतदान केंद्र गाठून तेथील येथील सोई-सुविधांची पाहणी केली आहे.काही ठिकाणी आला होता ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडजिल्ह्यातील १,०३३ मतदार केंद्रांवरून रविवारी मतदान घेण्यात आले. प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मध्ये क्षुल्लक तांत्रिक बिघाड आला होता. ज्या ठिकाणी बिघाड आला, त्याची माहिती मिळताच तज्ज्ञांच्या चमूने सदर मतदान केंद्र गाठून तांत्रिक दोष दूर केले. देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथे ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघड आल्याने तेथील मतदान प्रक्रिया सुमारे दीड तासासाठी खोळंबली होती. मशीन बदलविण्यात आल्यानंतर सुरळीत मतदान सुरू झाले. शिवाय देवळी तालुक्यातीलच सुरगाव येथील मतदान केंद्रावरील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने मशीन बदलविण्यात आली. तसेच सेलू तालुक्यातील सूरगाव येथेही तांत्रिक बिघाड आला होता. तो तज्ज्ञांनी तातडीने मतदान केंद्र गाठून दूर केला. वर्धा तालुक्यातील काही मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक दोष आला होता. तो वेळीच तज्ज्ञांनी दूर करून मतदान प्रक्रिया सुरळीत केल्याचे सांगण्यात आले.बोरगावात ६.३० पर्यंत सुरू होते मतदानबोरगाव (मेघे) येथील जि.प. शाळेत सायंकाळी ५.३० च्या पूर्वी मतदानासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. शाळेचे मुख्यद्वार ५.३० वाजता बंद झाल्यानंतर आत असलेल्या नागरिकांकडून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान करणे सुरू होते. हिच परिस्थिती समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (ह.) येथेही होती. तेथेही उशीरापर्यंत मतदान सुरू होते.आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत ७० टक्के मतदानपवनार : शहरानजीकच्या मोठ्या ग्रा.पं.पैकी एक असलेल्या पवनार येथे रविवारी ७० टक्के नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. येथे ६ हजार ९०१ मतदारांपैकी ४ हजार ८३१ मतदारांनी मतदान केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक