शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या डबक्यातून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:01 IST

शहरातील विकास कामांकरिता रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमृत योजनेचा कांमाचा समावेश आहे. या खोदकामामुळे शहराच्या गल्लीबोळातील रस्ते पावसाने चिखलमय झाले असून नागरिकांना वाहने चालविण्यासह पायदळ चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअमृत योजनेने वाढविली डोकेदुखी : शहराच्या गल्लीबोळातील रस्ते चिखलाने माखले

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील विकास कामांकरिता रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमृत योजनेचा कांमाचा समावेश आहे. या खोदकामामुळे शहराच्या गल्लीबोळातील रस्ते पावसाने चिखलमय झाले असून नागरिकांना वाहने चालविण्यासह पायदळ चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शहरात सध्या भूमिअंतर्गत पाईपलाईनक रिता खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पक्क्या रस्त्यांची आधीच वाट लागली आहे. त्यातच रस्त्याचे बांधकामही हाती घेण्यात आल्यामुळे या पावसाळ्यात रस्त्यावर जिकडेतिकडे पाण्याचे डबके साचलेले आहे. परिणामी या डबक्यातून वाहने चालवितांना नागरिकांना चागलीच कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे खोदकाम आणि बांधकामात नगरपालिकेकडून कोणतेही नियोजन केले नसल्याने या नियोजना अभावी खड्डेमय रस्त्यावरुन नागरिकांना वाटचाल करावी लागत आहे. मागील आठवड्यापासून येथे पावसाची सुरूवात झाली. या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहºयावर आंनद दिसून येतो परंतु, शहरवासीयांची चांगलीच फजिती होत असल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे २० दिवस उशिरा आगमन झाले. पावसाळ्यापूर्वी अमृत व मलनिस्सारण योजनेअंतर्गत सुरु असलेले खोदकाम बुजविण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, नियोजनाचे तीनतेरा वाजल्याने आणि नगरपरिषद प्रशासनाचा कंत्राटदारावर वचक नसल्याने खोदकामाची माती रस्त्याच्या बाजुने अस्ताव्यस्त पडलेली आहे. आता पावसामुळे रस्त्याच्या बाजुला असलेली माहिती मोठ्या वाहनामुळे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे डांबरी व सिमेट रस्त्यावर सध्या चिखल निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, गल्लीबोळातील रस्त्यांचीही हिच परिस्थिती आहे.केवळ दोन- चार दिवसाच्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून दमदार पावसाचे दिवस बाकी आहे. जर दमदार पाऊस झाला तर या रस्त्यांची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दिवसात नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.शहरातील सध्याच्या परिस्थितीने पन्नासवर्षापूर्वीच्या स्थितीची नागरिकांना आठवण करुन दिली आहे.सध्या जे चित्र शहरात निर्माण झाले आहे ते पन्नास वर्षापूर्वीची आठवण करुन देणारे ठरत आहे. पूर्वी मुख्य रस्ते मजबूत असायचे आणि गावातील अंतर्गत रस्ते कच्चे असायचे. आता गल्लीबोळातील रस्तेही सिमेंटचे झाले असले तरी पालिकेच्या नियोजनशुन्यतेमुळे चिखलाने माखलेले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाणही बळावले आहे.वर्ध्यातही चिखलवर्धा- शहरातही अमृत योजनेंतर्गत सुरुवातील भूमिगत जलवाहिनी आणि त्यानंतर भूमिगत मलवाहिनी टाकण्याकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे शहरातील मजबूत रस्त्याचे खस्ताहाल झाले. भूमिगत मलवाहिनीकरिता सिमेंटचे रस्ते मधोमध फोडण्यात आल्यानंतर पावसाळ्यापूर्वी बुजविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कंत्राटदाराने सिमेंट काँक्रीट टाकून फोडलेले रस्ते बुजविण्याचे काम सुरु केले. मात्र, या खोदकामातील माती कुठे रस्त्यावर ते कुठे रस्त्याच्या बाजुला कायम असल्याने या पावसाळ्यात प्रतापनगरातील असंख्य रस्ते चिखलमय झाले आहे. या रस्त्यांवरुन वाहने घसरत आहे. दरम्यान काही अपघातही झाले. त्यामुळे या रस्त्यांची स्वच्छता करण्याची गरज व्यक्त होत आहे.वर्धा ते आर्वी मार्गाला आले पांदण रस्त्याचे स्वरूपझडशी- ग्रामीण भागासह शहरी भागातही रस्त्यांच्या विकास कामांचा जोर कायम आहे. परंतु नियोजनाचा अभाव आणि संबंधित यंत्रणेचे असलेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. विकास कामे करताना नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष दिले नसल्याने समस्या आणखीच वाढल्या आहे. येळाकेळी ते आंजी मार्गादरम्यान बांधकामात नियोजन शुन्यता असल्याने नागरिकांसह या मार्गाने प्रवास करणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता वर्धा ते आर्वी मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. परंतु नव्याने निर्माण होत असलेल्या या मार्गाच्या कामाकरिता डांबरी रस्त्याचे खोदकाम करुन त्यामध्ये बाहेरुन आणलेला मुरुम व मातीचा भर टाकल्या जात आहे. परंतु आता पावसामुळे या रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरला असून वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना वाढल्या असून मोठी वाहनेही या चिखलावरुन अनियंत्रित होत असल्याची ओरड होत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी राहत असून येथील चिखलाने अडचणी वाढल्या आहे. येत्या दिवसात पावसाचेही प्रमाण वाढणार असून त्यादृष्टीने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.धुनिवाले मठ ते शिवाजी चौक रस्त्याचे काम करावर्धा- मागील एक वर्षांपासून धुनिवाले चौक ते शिवाजी चौक पर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामाकरिता निधी मंजूर झाला असूनही बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाला तत्काळ सुरुवात करण्याची मागणी होत आहे. या रस्त्याच्या बांधकामाकरिता शासनाकडून ५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. हा अतिरहदारीचा रस्ता असून ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना व वाहन चालकांना रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे सतत अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आरती चौक ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्यावर भूमिगत गटार योजना मंजूर असल्यामुळे या रस्त्याचे काम थांबल्याचे बोलले जात आहे. या मार्गावर दोन विद्यालय, पेट्रोलपंप, रुग्णालय तसेच नागपूरकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याची अवस्था लक्षात घेता भूमिगत गटार योजनेच्या कामाला गती देऊन रस्त्याचेही तत्काळ बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. जेणे करुन दररोज होणाऱ्या अपघातातून व त्रासातून शहरातील विद्यार्थी तसेच नागरिकांची सूटका होईल.

टॅग्स :Rainपाऊस