शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

चण्यासाठी शेतजमीन ओके; पण खुर्चीतून गुरगुरताहेत कृषीचे बोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 21:51 IST

यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : चण्यासाठी जमीन ओके असल्याचे कृषि तज्ज्ञांकडून बोलले जात असले तरी खुर्चीत बसून कृषी विभागाचे बोके सध्या गुरगुरत  असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८ टक्के रब्बी पिकांची लागवड झाली. पण अनेक शेतकऱ्यांना चणा की गव्हाची लागवड करावी, असा प्रश्न सतावत आहेच. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळीच योग्य माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे. पण कृषी विभागाचे निगरगठ्ठ अधिकारी खुर्चीत बसूनच कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांमधील पीक लागवडीबाबतच्या समस्या कायम आहेत. विशेष म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे हे चार महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर या सांभाळत आहेत. पण त्यांनाही या दोन्ही पदाची जबाबदारी सांभाळताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वर्धा येथे कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देण्याची गरज आहे.

चणा पिकालाच दिली जातेय पसंती- जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८० टक्केच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. आतापर्यंत ज्वारीची २९१ हेक्टरवर, ७१९ हेक्टरवर गहू, ६३ हेक्टरवर मका तर ८ हजार ८० हेक्टरवर चण्याची लागवड झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत झालेल्या पेरणीच्या आकडेवारीवरून शेतकरीही यंदा चणा पिकाला पसंती देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मातीत बऱ्यापैकी ओलावा आहे. यंदा रब्बीतील चणा पिकासाठी उत्तम आहे. चणा पीक विना मशागत घेता येते. पण शेतातील गवत काढणे गरजेचे आहे. चणा पिकाला दोन किंवा तीन वेळा सिंचनाची गरज असते. तर गहू पिकाला किमान चार वेळा सिंचनाची गरज असते. शिवाय जमिनीची मशागतही करणे क्रमप्राप्त असते.- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती