शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

चण्यासाठी शेतजमीन ओके; पण खुर्चीतून गुरगुरताहेत कृषीचे बोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 21:51 IST

यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : चण्यासाठी जमीन ओके असल्याचे कृषि तज्ज्ञांकडून बोलले जात असले तरी खुर्चीत बसून कृषी विभागाचे बोके सध्या गुरगुरत  असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८ टक्के रब्बी पिकांची लागवड झाली. पण अनेक शेतकऱ्यांना चणा की गव्हाची लागवड करावी, असा प्रश्न सतावत आहेच. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळीच योग्य माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे. पण कृषी विभागाचे निगरगठ्ठ अधिकारी खुर्चीत बसूनच कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांमधील पीक लागवडीबाबतच्या समस्या कायम आहेत. विशेष म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे हे चार महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर या सांभाळत आहेत. पण त्यांनाही या दोन्ही पदाची जबाबदारी सांभाळताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वर्धा येथे कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देण्याची गरज आहे.

चणा पिकालाच दिली जातेय पसंती- जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८० टक्केच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. आतापर्यंत ज्वारीची २९१ हेक्टरवर, ७१९ हेक्टरवर गहू, ६३ हेक्टरवर मका तर ८ हजार ८० हेक्टरवर चण्याची लागवड झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत झालेल्या पेरणीच्या आकडेवारीवरून शेतकरीही यंदा चणा पिकाला पसंती देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मातीत बऱ्यापैकी ओलावा आहे. यंदा रब्बीतील चणा पिकासाठी उत्तम आहे. चणा पीक विना मशागत घेता येते. पण शेतातील गवत काढणे गरजेचे आहे. चणा पिकाला दोन किंवा तीन वेळा सिंचनाची गरज असते. तर गहू पिकाला किमान चार वेळा सिंचनाची गरज असते. शिवाय जमिनीची मशागतही करणे क्रमप्राप्त असते.- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती