शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

चण्यासाठी शेतजमीन ओके; पण खुर्चीतून गुरगुरताहेत कृषीचे बोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 21:51 IST

यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : चण्यासाठी जमीन ओके असल्याचे कृषि तज्ज्ञांकडून बोलले जात असले तरी खुर्चीत बसून कृषी विभागाचे बोके सध्या गुरगुरत  असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८ टक्के रब्बी पिकांची लागवड झाली. पण अनेक शेतकऱ्यांना चणा की गव्हाची लागवड करावी, असा प्रश्न सतावत आहेच. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वेळीच योग्य माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात जात पिकांच्या लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे. पण कृषी विभागाचे निगरगठ्ठ अधिकारी खुर्चीत बसूनच कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांमधील पीक लागवडीबाबतच्या समस्या कायम आहेत. विशेष म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे हे चार महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर या सांभाळत आहेत. पण त्यांनाही या दोन्ही पदाची जबाबदारी सांभाळताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वर्धा येथे कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देण्याची गरज आहे.

चणा पिकालाच दिली जातेय पसंती- जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १२.८० टक्केच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. आतापर्यंत ज्वारीची २९१ हेक्टरवर, ७१९ हेक्टरवर गहू, ६३ हेक्टरवर मका तर ८ हजार ८० हेक्टरवर चण्याची लागवड झाल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत झालेल्या पेरणीच्या आकडेवारीवरून शेतकरीही यंदा चणा पिकाला पसंती देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मातीत बऱ्यापैकी ओलावा आहे. यंदा रब्बीतील चणा पिकासाठी उत्तम आहे. चणा पीक विना मशागत घेता येते. पण शेतातील गवत काढणे गरजेचे आहे. चणा पिकाला दोन किंवा तीन वेळा सिंचनाची गरज असते. तर गहू पिकाला किमान चार वेळा सिंचनाची गरज असते. शिवाय जमिनीची मशागतही करणे क्रमप्राप्त असते.- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती