शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

महामार्गासाठी शेतजमीन जाणार असल्याच्या चर्चेने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: July 24, 2016 00:21 IST

नागपूर ते मुंबई हा जलदगती महामार्ग सेलू-वर्धा- आर्वी ते अमरावती जिल्ह्यातून धामणगाव मार्गे जाणार आहे.

योग्य मोबदला गरजेचा : शेती गेल्यास रोजगाराचा प्रश्न विरूळ (आकाजी) : नागपूर ते मुंबई हा जलदगती महामार्ग सेलू-वर्धा- आर्वी ते अमरावती जिल्ह्यातून धामणगाव मार्गे जाणार आहे. या महामार्गकरिता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची धडकी भरली आहे. परिणामी, शेतकरी आतापासूनच चिंतेत दिसताहेत. धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचे शासनाने हाल केले आहेत. ही बाब आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मग, महामार्गासाठी आपल्या जमिनी गेल्या व योग्य मोबदला मिळाला नाही तर धरणग्रस्त शेतकऱ्यांसारखे आपले हाल होतील, अशी भावना शेतकरी व्यक्त करतात. ‘नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील महामार्ग’ अशी नव्याने तयार होणाऱ्या मार्गाची ओळख असल्याची चर्चा आहे. नागपूर ते मुंबई ८ तासांत या महामार्गाने पोहोचता येणार आहे. हा मार्ग सहा पदरी राहणार आहे. जाण्यासाठी ३ लेंथ, येण्यासाठी ३ लेंथ महामार्गात राहणार आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूला तारांचे कुंपण असून ४० किमीच्या अंतरात कोणताही थांबा राहणार नाही. नागपूरातून निघणारा हा मार्ग सेलू, वर्धा, आर्वी व पूढे धामणगाव रेल्वे तालुक्यातून पूढे जाणार असल्याची माहिती आहे. या मार्गासाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असल्याची चर्चा आहे. जमिनी गेल्या तर काय होईल, या चिंतेने शेतकरी धास्तावले आहे. या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला तर ठिक, नाही तर धरणग्रस्तांप्रमाणे हाल होतील, अशी चर्चा आहे. शासनाने खरेदी केलेल्या जमिनीला चांगला मोबदला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे; पण शासनाचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.(वार्ताहर) याबाबत शासनातर्फे सध्या तरी कोणतीही परिपत्रक आले नाही. केवळ आर्वी तहसील अंतर्गत रस्ते विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या शेताचे सर्व्हे क्रमांक गोळा करण्यास सांगितले आहे. - मनोहर मानकर, तलाठी, ग्रा.पं. विरूळ, सोरटा.