शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

महामार्गासाठी शेतजमीन जाणार असल्याच्या चर्चेने शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: July 24, 2016 00:21 IST

नागपूर ते मुंबई हा जलदगती महामार्ग सेलू-वर्धा- आर्वी ते अमरावती जिल्ह्यातून धामणगाव मार्गे जाणार आहे.

योग्य मोबदला गरजेचा : शेती गेल्यास रोजगाराचा प्रश्न विरूळ (आकाजी) : नागपूर ते मुंबई हा जलदगती महामार्ग सेलू-वर्धा- आर्वी ते अमरावती जिल्ह्यातून धामणगाव मार्गे जाणार आहे. या महामार्गकरिता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची धडकी भरली आहे. परिणामी, शेतकरी आतापासूनच चिंतेत दिसताहेत. धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचे शासनाने हाल केले आहेत. ही बाब आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलीच माहिती आहे. मग, महामार्गासाठी आपल्या जमिनी गेल्या व योग्य मोबदला मिळाला नाही तर धरणग्रस्त शेतकऱ्यांसारखे आपले हाल होतील, अशी भावना शेतकरी व्यक्त करतात. ‘नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील महामार्ग’ अशी नव्याने तयार होणाऱ्या मार्गाची ओळख असल्याची चर्चा आहे. नागपूर ते मुंबई ८ तासांत या महामार्गाने पोहोचता येणार आहे. हा मार्ग सहा पदरी राहणार आहे. जाण्यासाठी ३ लेंथ, येण्यासाठी ३ लेंथ महामार्गात राहणार आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूला तारांचे कुंपण असून ४० किमीच्या अंतरात कोणताही थांबा राहणार नाही. नागपूरातून निघणारा हा मार्ग सेलू, वर्धा, आर्वी व पूढे धामणगाव रेल्वे तालुक्यातून पूढे जाणार असल्याची माहिती आहे. या मार्गासाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असल्याची चर्चा आहे. जमिनी गेल्या तर काय होईल, या चिंतेने शेतकरी धास्तावले आहे. या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला तर ठिक, नाही तर धरणग्रस्तांप्रमाणे हाल होतील, अशी चर्चा आहे. शासनाने खरेदी केलेल्या जमिनीला चांगला मोबदला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे; पण शासनाचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.(वार्ताहर) याबाबत शासनातर्फे सध्या तरी कोणतीही परिपत्रक आले नाही. केवळ आर्वी तहसील अंतर्गत रस्ते विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या शेताचे सर्व्हे क्रमांक गोळा करण्यास सांगितले आहे. - मनोहर मानकर, तलाठी, ग्रा.पं. विरूळ, सोरटा.