शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:07 IST

धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमीनीचे व गावांचे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अधिग्रहण करण्यात आले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून शासनालाही कोट्यवधी रुपये द्यावे लागले. पुनर्वसनाच्या प्रक्रि येत अनेक शेतकरी उद्धवस्त झालेत.

ठळक मुद्देसुनील देशमुख : सारवाडी येथे देशातील पहिल्या ब्रीज कम बंधाºयाची पायाभरणी

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमीनीचे व गावांचे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अधिग्रहण करण्यात आले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून शासनालाही कोट्यवधी रुपये द्यावे लागले. पुनर्वसनाच्या प्रक्रि येत अनेक शेतकरी उद्धवस्त झालेत. पण, आता शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण केले जाणार नाही, असे मत विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील देशमुख यांनी व्यक्त केले.तालुक्यातील सारवाडी येथे केंद्र सरकारच्या जलसंधारण नगरविकस आणि गंगा संरक्षण विभागाच्यावतीने देशातील पहिल्या ब्रीज कम बंधाऱ्याची पायाभरणी ना. सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमर काळे, माजी आमदार दादाराव केचे, केंद्रीय भूजल बोर्डाचे अध्यक्ष सुधीर दिवे, के.स.नायक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, कारंजा पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, उपसभापती रंजना टिपले, जलतज्ज्ञ माधव कोेटस्थाने, जिल्हा परिषद सदस्या रेवता धोटे, सुरेश खवशी, सरपंच अर्चना धुर्वे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ना.देशमुख म्हणाले की, वर्धा जिल्ह्यात चार व तिवसा येथे १ असे पाच बंधारे प्रायोगिक तत्वावर देशात प्रथमच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने होत आहे. यासाठी २५ कोटीचा निधी दिला आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार असून उत्पादनातही वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच अमरावती, वाशीम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातही ब्रिज कम बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. खासदार रामदास तडस, सुधीर दिवे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच खडतकर कंस्ट्रक्शन कंपनीने नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याची हमी दिली. यावेळी विद्यमान आमदार अमर काळे व माजी आमदार दादाराव केचे यांच्या भाषणातील जुगलबंदी जनतेच्या मनोरंजनाचा विषय ठरला. या कार्यक्रमाचे संचालन साक्षी नरसिंगकार हिने केले तर आभार समाजसेवक संजय यावले यांनी मानले.माधव कोटस्थाने सन्मानितसारवाडी येथे देशातील पहिल्या ब्रीज कम बंधाऱ्याची पायाभरणी करण्यात आली. या बंधाºयाच्या कामाकरिता जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने यांनी वेळोवेळो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळेच या प्रकल्पाची पायाभरणी झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कोटस्थाने यांच्या योगदानामुळे विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीSunil Deshmukhसुनिल देशमुख