शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त आता आर्द्रावर; पावसाने फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:17 AM

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके चांगली व वाढ होण्यासाठी आर्द्रा नक्षत्रातील पावसाची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मृग नक्षत्रात आलेल्या पेरणी योग्य पावसामुळे बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या. पण मृग नक्षत्राचे शेवटचे दिवस व आर्द्रा नक्षत्रात सुरूवातीचे दिवसात वरूणराजा रुसल्याचे पाहायला मिळत आहे. त्या मुळे शेतकऱ्यांची भिस्त आता आर्द्रा नक्षत्रावर अवलंबून आहे.सेलू तालुक्यातील बागायती शेतीत प्रथमच सोयाबीन च पेरा वाढला आहे तर मागील वर्षीच्या तुलनेत कपाशी चा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे या वर्षीच्या खरीप हंगामात तुरीचा पेराही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहेमृग सरी कोसळल्या आणि शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली. अवघ्या एका आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली खरी. पाऊस येईल अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. गत सहा दिवसापासून पाऊस पडेना त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली काहींनी तुषार सिंचनाचा वापर सुरू केला असला तरी वीज भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहेपाऊस दोन ते तीन दिवस आला नाही तर कपाशीची दोबन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीशेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके चांगली व वाढ होण्यासाठी आर्द्रा नक्षत्रातील पावसाची मात्र गरज आहे.भारनियमनाच्या वेळेत बदल गरजेचारात्र पाळीत असणारा थ्री फेज विद्युत पुरवठा हा सकाळी ८ पर्यंत राहत असून ही वेळ १० वाजेपर्यंत करणे व दिवसा दिला जाणारा विद्युत पुरवठा हा सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत केल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे. वावर आहे तर पॉवर आहे म्हणायचं असेल तर वीज वितरण कंपनीने ह्या वेळेत वीज दिल्यास शेतकरी ओलित करू शकतील.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस