शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: January 28, 2015 23:39 IST

मानवाप्रमाणे इतर पशुपक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याला कायद्याचे संरक्षण मिळाले अहे.

उपाययोजना करण्याबाबत वन विभाग उदासीननारायणपूर : मानवाप्रमाणे इतर पशुपक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याला कायद्याचे संरक्षण मिळाले अहे. परंतु हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याने चित्र नारायणपूर परिसरात पहावयास मिलत आहे. वन्य प्राण्यामुळे सध्या नारायणपूर परिसरातील शेतकरी असुरक्षित झाले आहे. स्वत:चे शेतातील पिकाचे संरक्षण करणेही अवघड झाले आहे. पेरणीपासून तर पीक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी पिकाचे लेकरासारखे पालन पोषण करतो. त्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. पण पीक एक उत्पादनावर आल्यावर वन्यप्राण्यांचा उप्रदव सुरू होत असून त्याला रोखण्यात शेतकरी असमर्थ ठरत आहे. रानडुक्कर, रोही, माकड, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचा नारायणपूर परिसरात मुक्तसंचार पाहावयास मिळतो. सुरुवातीला हे प्राणी फटाक्याच्या आवाजाने घाबरून पळून जायचे. पण आता हा आवाज त्यांच्या परिचयाचा झाला आहे. मौजा गणेशपूर येथे वन विभागाने १५ वर्षापूर्वी नर्सरी तयार केली. आज त्याचे रुपांतर जंगलात झाले असल्याने वन्य प्राण्याचा हैदोस वाढला आहे. जंगल शेजारची शेकडो हेक्टर शेती पडिक होण्याच्या स्थितीत आहे. या जंगली प्राण्यापासून शेतातील पीके तर सोडा, स्वत:चा जीव वाचविणे सुद्धा कठीण झाले आहे. वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहे तर दुसरीकडे जंगलात दबा धरून बसलेले हिंस्र प्राणी दुधाळ जनावरे फस्त करीत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा असल्यामुळे शेतकरी मात्र काही करू शकत माही. मदतीसाठी केवळ वनाधिकाऱ्याची मनधरणी करनेच त्यांच्या हाती आहे. वन्यप्राण्यांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वन्य प्राण्यांना मारू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे रक्षण व्हावे, शेतशिवारात सदर प्राणी भटकू नये यासाठी उपाययोजना आखणे अत्यावश्यक आहे. तसेच जंगलाच्या अगदी शेजारीच असलेल्या शेताना वनविभागाने तारेचे कुंपण १०० टक्के अनुदानावर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.परंतु वन विभाग देत असलेल्या तुटपूंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या घातक कायद्यात बदल करून शेतकऱ्यानाही संरक्षण देण्यात यावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे आणि वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)