शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: January 28, 2015 23:39 IST

मानवाप्रमाणे इतर पशुपक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याला कायद्याचे संरक्षण मिळाले अहे.

उपाययोजना करण्याबाबत वन विभाग उदासीननारायणपूर : मानवाप्रमाणे इतर पशुपक्ष्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राण्याला कायद्याचे संरक्षण मिळाले अहे. परंतु हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याने चित्र नारायणपूर परिसरात पहावयास मिलत आहे. वन्य प्राण्यामुळे सध्या नारायणपूर परिसरातील शेतकरी असुरक्षित झाले आहे. स्वत:चे शेतातील पिकाचे संरक्षण करणेही अवघड झाले आहे. पेरणीपासून तर पीक हातात येईपर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी पिकाचे लेकरासारखे पालन पोषण करतो. त्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. पण पीक एक उत्पादनावर आल्यावर वन्यप्राण्यांचा उप्रदव सुरू होत असून त्याला रोखण्यात शेतकरी असमर्थ ठरत आहे. रानडुक्कर, रोही, माकड, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचा नारायणपूर परिसरात मुक्तसंचार पाहावयास मिळतो. सुरुवातीला हे प्राणी फटाक्याच्या आवाजाने घाबरून पळून जायचे. पण आता हा आवाज त्यांच्या परिचयाचा झाला आहे. मौजा गणेशपूर येथे वन विभागाने १५ वर्षापूर्वी नर्सरी तयार केली. आज त्याचे रुपांतर जंगलात झाले असल्याने वन्य प्राण्याचा हैदोस वाढला आहे. जंगल शेजारची शेकडो हेक्टर शेती पडिक होण्याच्या स्थितीत आहे. या जंगली प्राण्यापासून शेतातील पीके तर सोडा, स्वत:चा जीव वाचविणे सुद्धा कठीण झाले आहे. वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहे तर दुसरीकडे जंगलात दबा धरून बसलेले हिंस्र प्राणी दुधाळ जनावरे फस्त करीत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा असल्यामुळे शेतकरी मात्र काही करू शकत माही. मदतीसाठी केवळ वनाधिकाऱ्याची मनधरणी करनेच त्यांच्या हाती आहे. वन्यप्राण्यांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वन्य प्राण्यांना मारू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे रक्षण व्हावे, शेतशिवारात सदर प्राणी भटकू नये यासाठी उपाययोजना आखणे अत्यावश्यक आहे. तसेच जंगलाच्या अगदी शेजारीच असलेल्या शेताना वनविभागाने तारेचे कुंपण १०० टक्के अनुदानावर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.परंतु वन विभाग देत असलेल्या तुटपूंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या घातक कायद्यात बदल करून शेतकऱ्यानाही संरक्षण देण्यात यावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांचे आणि वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)