शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मृग कोरडा, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 21:02 IST

Wardha News हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वर्धा: मृग नक्षत्र अक्षरशः कोरडे गेले. थोडासा पाऊस आल्याने पुढे पाऊस येईलच, या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी, लागवड केली. पवनार परिसरात जवळपास ९० टक्के कपाशीची व साठ टक्के सोयाबीनची लागवड पूर्ण झालेली असून, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, ते ठिबक किंवा स्प्रिंग क्लारच्या साहाय्याने पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारनियमन असल्याने रोज फक्त आठ तास वीज मिळते. त्यातही तीन दिवस रात्री बारानंतर वीजपुरवठा सुरू होतो. जास्तीत जास्त एका पंपाद्वारे दोन एकरांतील पीक वाचविले जाऊ शकते. परिसरातील पूर्ण पेरणी वाया गेली असून, ज्याचे अंकुरण झाले, तेसुद्धा उन्हामुळे मेल्याचे दिसून येते. हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कृषी विभागाकडून शेतकऱ्याला मार्गदर्शन करून धीर देण्याची गरज आहे. अनुदानावर असलेले बियाणे न दिल्याने आधीच शेतकरी कृषी विभागावर नाराज आहेत. गाजावाजा करून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले; परंतु महाबीजकडे बियाणे शिल्लक नसल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना बियाणे देण्यास असमर्थता दर्शविली. महाबीजकडे बियाणे नसतील तर बाजारात विक्रीसाठी आलेले बियाणे कोठून आले, असा सवाल शेतकरी विचारीत आहेत.

बारा एकरांत कपाशीची लागवड केली होती. पैकी दोन एकरांत ओलित करून कशीबशी वाचवली. दहा एकरांत दुबार पेरणीेला सुरुवात केलेली आहे. पाऊस आला तर दुबार पेरणी यशस्वी होईल. नाही तर शेत खाली ठेवण्याची नामुष्की ओढवेल.

- कुशाबा घुगरे

शेतकरी

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस