शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

मृग कोरडा, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 21:02 IST

Wardha News हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वर्धा: मृग नक्षत्र अक्षरशः कोरडे गेले. थोडासा पाऊस आल्याने पुढे पाऊस येईलच, या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी, लागवड केली. पवनार परिसरात जवळपास ९० टक्के कपाशीची व साठ टक्के सोयाबीनची लागवड पूर्ण झालेली असून, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, ते ठिबक किंवा स्प्रिंग क्लारच्या साहाय्याने पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारनियमन असल्याने रोज फक्त आठ तास वीज मिळते. त्यातही तीन दिवस रात्री बारानंतर वीजपुरवठा सुरू होतो. जास्तीत जास्त एका पंपाद्वारे दोन एकरांतील पीक वाचविले जाऊ शकते. परिसरातील पूर्ण पेरणी वाया गेली असून, ज्याचे अंकुरण झाले, तेसुद्धा उन्हामुळे मेल्याचे दिसून येते. हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कृषी विभागाकडून शेतकऱ्याला मार्गदर्शन करून धीर देण्याची गरज आहे. अनुदानावर असलेले बियाणे न दिल्याने आधीच शेतकरी कृषी विभागावर नाराज आहेत. गाजावाजा करून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले; परंतु महाबीजकडे बियाणे शिल्लक नसल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना बियाणे देण्यास असमर्थता दर्शविली. महाबीजकडे बियाणे नसतील तर बाजारात विक्रीसाठी आलेले बियाणे कोठून आले, असा सवाल शेतकरी विचारीत आहेत.

बारा एकरांत कपाशीची लागवड केली होती. पैकी दोन एकरांत ओलित करून कशीबशी वाचवली. दहा एकरांत दुबार पेरणीेला सुरुवात केलेली आहे. पाऊस आला तर दुबार पेरणी यशस्वी होईल. नाही तर शेत खाली ठेवण्याची नामुष्की ओढवेल.

- कुशाबा घुगरे

शेतकरी

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस