शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मृग कोरडा, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 21:02 IST

Wardha News हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वर्धा: मृग नक्षत्र अक्षरशः कोरडे गेले. थोडासा पाऊस आल्याने पुढे पाऊस येईलच, या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी, लागवड केली. पवनार परिसरात जवळपास ९० टक्के कपाशीची व साठ टक्के सोयाबीनची लागवड पूर्ण झालेली असून, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, ते ठिबक किंवा स्प्रिंग क्लारच्या साहाय्याने पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारनियमन असल्याने रोज फक्त आठ तास वीज मिळते. त्यातही तीन दिवस रात्री बारानंतर वीजपुरवठा सुरू होतो. जास्तीत जास्त एका पंपाद्वारे दोन एकरांतील पीक वाचविले जाऊ शकते. परिसरातील पूर्ण पेरणी वाया गेली असून, ज्याचे अंकुरण झाले, तेसुद्धा उन्हामुळे मेल्याचे दिसून येते. हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कृषी विभागाकडून शेतकऱ्याला मार्गदर्शन करून धीर देण्याची गरज आहे. अनुदानावर असलेले बियाणे न दिल्याने आधीच शेतकरी कृषी विभागावर नाराज आहेत. गाजावाजा करून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले; परंतु महाबीजकडे बियाणे शिल्लक नसल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना बियाणे देण्यास असमर्थता दर्शविली. महाबीजकडे बियाणे नसतील तर बाजारात विक्रीसाठी आलेले बियाणे कोठून आले, असा सवाल शेतकरी विचारीत आहेत.

बारा एकरांत कपाशीची लागवड केली होती. पैकी दोन एकरांत ओलित करून कशीबशी वाचवली. दहा एकरांत दुबार पेरणीेला सुरुवात केलेली आहे. पाऊस आला तर दुबार पेरणी यशस्वी होईल. नाही तर शेत खाली ठेवण्याची नामुष्की ओढवेल.

- कुशाबा घुगरे

शेतकरी

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस