शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपात पडली फूट; संघटना बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 14:49 IST

गतवर्षी राज्यात झालेल्या शेतकरी संपाला देशव्यापी करण्याचा निर्णय राष्ट्रीय किसान महासंघाने घेतला होता. मात्र १ जूनपासून सुरू होणाऱ्या या संपातून शेतकरी संघटना बाहेर पडली असून या संपाशी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नसल्याचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल धनवट यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्दे१ जून पासून आंदोलनाला सुरूवातमहाराष्ट्रात संप अडचणीत येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी राज्यात झालेल्या शेतकरी संपाला देशव्यापी करण्याचा निर्णय राष्ट्रीय किसान महासंघाने घेतला होता. मात्र १ जूनपासून सुरू होणाऱ्या या संपातून शेतकरी संघटना बाहेर पडली असून या संपाशी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नसल्याचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल धनवट यांनी म्हटले आहे.२२ राज्यातील शेतकरी १ ते १० जून या कालावधीत संपावर जाणार असून १२८ शहरात भाजीपाला अन्नधान्य, दुध व इतर शेतमालाचा पुरवठा बंद करण्याचा निर्धार ९ मे रोजी सेवाग्राम येथे झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला होता. देशभरातील ११० शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय किसान महासंघाची स्थापन केली होती. मात्र या संपातील मागण्या शेतकरी हिताच्या नसून शेतकऱ्याच्या नुकसान करणाऱ्या व शेतकऱ्याला कायमस्वरूपी सरकार अवलंबून ठेवणाऱ्या असल्यामुळे शेतकरी संघटना या संपात सहभागी होणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी सांगितले.सध्या शासन देत असलेल्या आधारभूत किमती, प्रत्यक्ष उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के कमी आहेत. तरी नोंदणी केलेला शेतीमाल सुद्धा शासनाला खरेदी करता येत नाही. त्यासाठी आवश्यक संरचना सरकारकडे नाही. गोदामे, काटे, बारदाना, सुतळी, मनुष्यबळ व पैसेही नाहीत. खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांचे प्राण जात आहेत, अशा परिस्थितीत शासनाकडून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमी भावाची अपेक्षा करणे हास्यास्पद आहे, असेही शेतकरी संघटनेने म्हटले आहे.स्वामिनाथन आयोगातील अनेक शिफारशी शेतकरी विरोधी आहेत तसेच या संपातील अनेक मागण्या अव्यवहार्य व शेतकऱ्याला स्वावलंबी करण्यापेक्षा सरकारच्या दारातील याचक बनविणाऱ्या आहेत. भारतातील शेतकऱ्यांना संरक्षणाची नव्हे तर स्वातंत्र्याची गरज असून व्यापार स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य, आवश्यक संरचना, प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास व घटनेत घुसडलेले परिशिष्ट ९ मधील शेतकरी विरोधी, शेती विरोधी कायदे रद्द केल्यास भारतातील शेतकरी जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा करू शकतो व कर्जमुक्त होऊ शकतो, असा दावा शेतकरी संघटनेने केला आहे.ज्या सरकारला आता नोकरांचे पगार करणे सुद्धा मुष्किल झाले आहे. लाखो कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजा खाली दबलेले आहे त्या सरकारकडून संरक्षणाची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या संपात सहभागी होणार नाहीत मात्र कोणाला सहभागी होण्यापासून रोखणार नाहीत. या संपात काही हिंसक प्रकार घडल्यास त्याला शेतकरी संघटना जवाबदार राहणार नाही, असे शेतकरी संघटनेच्या माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी म्हटले आहे.शेतकरी संघटना राज्यात संपात बाहेर पडल्याने या संपावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरामध्ये हे आंदोलन होणार होते. तेथेही शेतकरी संघटनेच्या माघारीमुळे आंदोलनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी