शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: March 24, 2017 01:53 IST

दोन वर्षांपूर्वी सेलूच्या श्रीकृष्ण जिनिंगने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापसाचे ८ कोटी रुपये अद्याप संचालक सुनील टालाटुले याने दिले नाही.

आठ कोटींचे प्रकरण : बाजार समिती कुलूपबंदचसेलू (वर्धा) : दोन वर्षांपूर्वी सेलूच्या श्रीकृष्ण जिनिंगने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापसाचे ८ कोटी रुपये अद्याप संचालक सुनील टालाटुले याने दिले नाही. याच्या निषेधार्थ बुधवारी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले. गुरूवारीही हे आंदोलन सुरूच होत. बाजार समितीच्या व्यापारी व अडत्यांनीही आंदोलनाला समर्थन दिल्याने आजही बाजार समिती कुलूपबंदच होते. सभापती व उपसभापतींनीही शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करीत न्याय मिळेपर्यंत कृउबास बंद ठेवण्याचे आंदोलन मंडपाला भेट देत जाहीर केले. यामुळे आंदोलनाला आता धार आली आहे. उपबाजारपेठ सेलूतील व्यवहार मात्र ठप्प झाले आहेत. २०१३ पासून खरेदी केलेल्या कापसाची रक्कम शेतकऱ्यांना जिनिंग मालक सुनील टालाटूले याने दिली नाही. फसवणूक झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी २०१५ मध्ये बाजार समिती व पोलीस ठाण्यात केली. यावरून पोलिसांनी टालाटुले विरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्या कालावधीत बाजार समितीवर प्रशासक असल्याने प्रशासक आणि बाजार समितीच्या सचिवावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता; पण यानंतरही राजकीय वरदहस्ताचा फायदा घेत टालाटुले याने थकित रक्कम देण्यासाठी हात वर केले. परिणामी, शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे.(तालुका प्रतिनिधी)मुंबईत शेतकरी प्रतिनिधींना अपमानास्पद वागणुकीचा आरोपशेतकऱ्यांच्यावतीने रामनारायण पाठक व मनोज शिंदे हे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी मुंबईत पोहोचले. आ.डॉ. पंकज भोयर यांच्यासह मुनगंटीवार यांना भेटले. त्यांनी प्रकाशित वृत्ताचे कात्रण दाखवित न्यायाची मागणी केली. याच कात्रणावर मुनगंटीवार यांनी वित्त सचिवांना कारवाई करण्याबाबत शेरा दिला. ते घेऊन शेतकऱ्यांनी वित्त विभागाचे सचिव दिनेश जैन यांची भेट घेतली असता ते शेतकऱ्यांवर खेकसून धावले. माझ्याकडे फाईल आली नाही, असे म्हणत त्यांना हुसकावून लावल्याचे मुंबईवरुन पाठक व शिंदे यांनी सांगितले. या प्रकारामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले असून निकाल लागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल, अशी भूमिका घेतली आहे.