शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:52 IST

शेतकऱ्यांचे राहणीमान व जीवन उंचावेल या दृष्टिकोनातून शासन अनेक योजना राबवित आहे. शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन देवळी-पुलगाव क्षेत्राचे आमदार, माजी मंत्री रणजित कांबळे यांनी केले.

ठळक मुद्देरणजीत कांबळे : खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कभिडी : शेतकऱ्यांचे राहणीमान व जीवन उंचावेल या दृष्टिकोनातून शासन अनेक योजना राबवित आहे. शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन देवळी-पुलगाव क्षेत्राचे आमदार, माजी मंत्री रणजित कांबळे यांनी केले.उपविभागीय कृषी कार्यालयाच्या वतीने आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळी पंचायत समितीच्या सभापती विद्या भुजाडे होत्या. उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय हाडके, मंडळ कृषी अधिकारी अतुल जावळे व कृषितज्ज्ञ आदी प्रामुख्याने उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील यामध्ये अल्पभूधारक, भूमिहिन शेतकरी, शेतमजुरांनी व गरीब भूमिहिनांनी योग्य लाभ घ्यावा व आपले राहणीमान व जीवन उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार कांबळे यांनी केले. शेतकºयांच्या अनेक समस्या आहेत, याची जाणीव आहे. अस्मानी-सुल्तानी संकटांचा तो सातत्याने सामना करतो. खरीप, रबी, अशी पीके शेतकरी लागवडीपासून लहान मुलाप्रमाणे जपतात. पण वन्यप्राणी मात्र थोडक्यातच होत्याचे नव्हते करून शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. शासनाकडून मदत दिली जाते; मात्र ती पुरेशी ठरत नाही. पिकांचे नुकसान होऊच नये याकरिता वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी आमदार कांबळे यांनी केली. सत्य साई सेवा समितीच्या सभागृहात झालेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेत कृषी संसोधक सहाय्यक प्रा. प्रदीप डवणे, फळ संशोधन केंद्र, कृषी अभियांत्रिकी विशाल उंबरहाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉ. गजानन मसाळ व अन्य तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी शेती व विविध पिकांविषयी माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांना पीआरसीच्या बियाण्यांचे आमदार कांबळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राऊत यांनी केले. तर आभार अतुल जावळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता भिडी क्षेत्रातील कृषी सेवकांनी सहकार्य केले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी