शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये

By admin | Updated: November 11, 2016 01:55 IST

कृषी उत्पादनासाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार नाही,

शैलेश नवाल : जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांची बैठक वर्धा : कृषी उत्पादनासाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार नाही, यासाठी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची बैठक जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी घेतली. सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे याबाबत यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून अडत घेण्यास शासनाने बंदी केली आहे. अडत व्यापाऱ्यांकडूनच घेण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिलेत. कृषी उत्पन्नाचे वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी. वैद्यमापन शास्त्र निरिक्षकांनी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील वजनांची तपासणी करावी अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. शेतकऱ्यांना सर्व कृषीमालाचे रोजचे दर माहित व्हावेत यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये डिजीटल बोर्ड लावावेत व त्यावर रोजचे दर प्रदर्शीत करावेत. सेंद्रिय पध्दतीने उत्पादित कापसासाठी जास्त दर मिळेल यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सेंद्रीय कापसाचा वेगळा ढीग लावण्याची व्यवस्था करावी. सध्या २८ हजार शेतकरी सेंद्रिय पध्दीने कापूस उत्पादन करीत आहेत. आर्वी, सिंदी आणि हिंगणघाट येथे बीसीआय विक्री केंद्र सुरू करणार आहेत. आहे. याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. कृषी समन्वीत विकास प्रकल्प, महाराष्ट्र शासन आणि बजाज फांऊडेशन हे सेंद्रीय कापूस असल्याचे प्रमाणित करून देतील, अशी माहिती प्रणव पाटील यांनी दिली. या बैठकीला सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव, जिल्हा उपनिबंधक जयंत तलमले, वैद्यमापन शास्त्र निरीक्षक उपस्थित होते.(प्रतिनिधी)