शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये

By admin | Updated: November 11, 2016 01:55 IST

कृषी उत्पादनासाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार नाही,

शैलेश नवाल : जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांची बैठक वर्धा : कृषी उत्पादनासाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार नाही, यासाठी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची बैठक जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी घेतली. सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याची ओरड होत आहे. त्यामुळे याबाबत यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून अडत घेण्यास शासनाने बंदी केली आहे. अडत व्यापाऱ्यांकडूनच घेण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिलेत. कृषी उत्पन्नाचे वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी. वैद्यमापन शास्त्र निरिक्षकांनी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील वजनांची तपासणी करावी अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. शेतकऱ्यांना सर्व कृषीमालाचे रोजचे दर माहित व्हावेत यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये डिजीटल बोर्ड लावावेत व त्यावर रोजचे दर प्रदर्शीत करावेत. सेंद्रिय पध्दतीने उत्पादित कापसासाठी जास्त दर मिळेल यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सेंद्रीय कापसाचा वेगळा ढीग लावण्याची व्यवस्था करावी. सध्या २८ हजार शेतकरी सेंद्रिय पध्दीने कापूस उत्पादन करीत आहेत. आर्वी, सिंदी आणि हिंगणघाट येथे बीसीआय विक्री केंद्र सुरू करणार आहेत. आहे. याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. कृषी समन्वीत विकास प्रकल्प, महाराष्ट्र शासन आणि बजाज फांऊडेशन हे सेंद्रीय कापूस असल्याचे प्रमाणित करून देतील, अशी माहिती प्रणव पाटील यांनी दिली. या बैठकीला सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव, जिल्हा उपनिबंधक जयंत तलमले, वैद्यमापन शास्त्र निरीक्षक उपस्थित होते.(प्रतिनिधी)