शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:40 IST

हरभरा पिकावर येणारी घाटेअळी ही मुख्य किड आहे. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केले.

ठळक मुद्देप्रशांत उंबरकर : हरबरा व तूर उत्पादक शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हरभरा पिकावर येणारी घाटेअळी ही मुख्य किड आहे. किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केले. कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्रॉपसॅप प्रकल्पा अंतर्गत सालोड व सेलसुरा येथे तुर व हरभरा पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.तूर पीक सध्या शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे;पण शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादूर्भाव पिकावर दिसून येत आहे. तूर उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्यावतीने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. रूपेश झाडोदे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी आर. व्ही. चनशेट्टी, किडनियंत्रक विनोद जाधव, नाजुका इरपाते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तूर व हरभरा पिकावर हेलिकोव्हर्पा आणि शेंगमाशी या मुख्य किडांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यांच्याकडून शेतकºयांचे मोठे नुकसान केले जाते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी. हरभरा पिकामध्ये हेक्टरी ५० प्रमाणात इंग्रजी टी आकाराचे पक्षी स्थानके उभारावी. शिवाय शेतातील प्रथम व द्वितीय अवस्थेतीत अळ्यांसाठी प्रती हेक्टरी एच. ए. एन. पी. व्ही. ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा. किडींनी आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास रासायनिक किटकनाशकांचा शेतकऱ्यांना वापर करावा. तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी व हरभºयावरील घाटेअळी नियंत्रणासाठी क्लोरॅट्रेनिलिपोल १८.५ एस. सी. २.५ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एस. जी ३ ग्रॅम यापैकी एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुरीवरील शेंगमाशीसाठी मोनोक्रॉटोफॉस ३६ एस. एल. ११ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ई. सी. २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे यावेळी सांगण्यात आले. यंदा कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने भविष्यातील उद्रेक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेणे कटाक्षाने टाळावे. पीक डिसेंबर, जानेवारी अखेर काढून टाकावे. पराट्या व न उघडलेले बोंड आदीचे शेताबाहेर कंपोस्ट तयार करावे आणि शेत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन जी. आर. कापसे यांनी केले.बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सांगितले उपायसदर उपक्रमादरम्यान तज्ज्ञांनी तूर व हरबरा उत्पादक शेतकºयांना विविध विषयाची माहिती दिली. यावेळी जी. आर. कापसे यांनी भविष्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा कपाशी उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागू नये याविषयी उदाहरणे देत सोप्या शब्दात माहिती दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.