शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शेतकऱ्यांनी खताची बॅग आणि देयकावरील किंमत तपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:15 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. यात काही कंपन्यांचा जुनाच साठा बाजारात आहे. तर नवा साठा येण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही खतांच्या किमतीत तफावत असण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन : रासायनिक खताच्या किंमतीत तफावतीचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. यात काही कंपन्यांचा जुनाच साठा बाजारात आहे. तर नवा साठा येण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही खतांच्या किमतीत तफावत असण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना देयकावरील किंमत व खताच्या बॅगवरील किंमती तपासून घ्याव्या, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.यंदा राज्यात वेळेवर मान्सून येणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून खत आणि बियाणे खरेदी सुरू झालाी आहे. गत हंगामात आलेल्या अनुभावावरून यंदा बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. तसाच प्रकार रासायनिक खतांच्या खरेदीत होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात असलेल्या कृषी केंद्रात रब्बी हंगामातील खताचा साठा आहे. यात नवा साठा येणार आहे. या काळात शासनाच्यावतीने लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे खतांचे दर निश्चित करण्यात आले आहे. यामुळे या दरात तफावत राहणार असल्याचा संशय कृषी विभागाच्यावतीने वर्तविला आहे.यामुळे खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकांकडून मिळाणाऱ्या देयकात आणि मिळालेल्या खताच्या बॅगवरील किमती सारख्या असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करण्याच्या सूचना कृषी विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.जिल्ह्याला २२,५२० मेट्रीक टन खताची गरजयंदाच्या खरीप हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. याकरिता शेतकºयांकडून नित्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर होणार आहे. जिल्ह्याला २२ हजार ५२० मेट्रीक टन खताची गरज असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. यात युरिया ३६ हजार ५००, डिएपी ६ हजार ८६०, एमओपी ३ हजार आणि एसएसपी ६ हजार ९१५ मेट्रीक टन खताची गरज आहे. या व्यतिरिक्त इतर खतांची मागणी शेतकºयांकडून होणार आहे.खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून बी-बियाणे आणि खतांचा साठा करण्यात येत आहे. यात कृषी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांना खतांच्या किमतीत गंडा बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.- आर.पी. धर्माधिकारी, कृषी विकास अधिकारी, जि.प. वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरी