शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी खताची बॅग आणि देयकावरील किंमत तपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:15 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. यात काही कंपन्यांचा जुनाच साठा बाजारात आहे. तर नवा साठा येण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही खतांच्या किमतीत तफावत असण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन : रासायनिक खताच्या किंमतीत तफावतीचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. यात काही कंपन्यांचा जुनाच साठा बाजारात आहे. तर नवा साठा येण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही खतांच्या किमतीत तफावत असण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना देयकावरील किंमत व खताच्या बॅगवरील किंमती तपासून घ्याव्या, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.यंदा राज्यात वेळेवर मान्सून येणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून खत आणि बियाणे खरेदी सुरू झालाी आहे. गत हंगामात आलेल्या अनुभावावरून यंदा बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. तसाच प्रकार रासायनिक खतांच्या खरेदीत होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात असलेल्या कृषी केंद्रात रब्बी हंगामातील खताचा साठा आहे. यात नवा साठा येणार आहे. या काळात शासनाच्यावतीने लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे खतांचे दर निश्चित करण्यात आले आहे. यामुळे या दरात तफावत राहणार असल्याचा संशय कृषी विभागाच्यावतीने वर्तविला आहे.यामुळे खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकांकडून मिळाणाऱ्या देयकात आणि मिळालेल्या खताच्या बॅगवरील किमती सारख्या असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करण्याच्या सूचना कृषी विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.जिल्ह्याला २२,५२० मेट्रीक टन खताची गरजयंदाच्या खरीप हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. याकरिता शेतकºयांकडून नित्याप्रमाणे रासायनिक खतांचा वापर होणार आहे. जिल्ह्याला २२ हजार ५२० मेट्रीक टन खताची गरज असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. यात युरिया ३६ हजार ५००, डिएपी ६ हजार ८६०, एमओपी ३ हजार आणि एसएसपी ६ हजार ९१५ मेट्रीक टन खताची गरज आहे. या व्यतिरिक्त इतर खतांची मागणी शेतकºयांकडून होणार आहे.खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून बी-बियाणे आणि खतांचा साठा करण्यात येत आहे. यात कृषी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांना खतांच्या किमतीत गंडा बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.- आर.पी. धर्माधिकारी, कृषी विकास अधिकारी, जि.प. वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरी