शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कापसाच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून हा सर्वांत जास्त दर ठरला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आंतरराष्ट्रीय बाजारात रुई आणि सरकीच्या दरात वाढ झाल्याने विदर्भाच्या बाजारात कापसाला नऊ हजारांहून अधिकचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा अडीच हजार रुपयांहून अधिकचा दर क्विंटलमागे मिळत आहे. शेतकऱ्यांना दरवाढ दिलासा देणारी ठरली आहे.आर्वीची बाजारपेठ ही विदर्भात प्रसिद्ध आहे इंग्रजांच्या ब्रिटिश काळात येथील कापूस नेण्यासाठी इंग्रजांनी आर्वी-पुलगाव शकुंतला गाडी १९१७ मध्ये सुरू केली होती. येथून हा कापूस पुलगावला आणि तिथून रेल्वेने हा कापूस कोलकात्याला जायचा आणि कोलकात्यावरून हा कापूस इंग्रज आपल्या देशात घेऊन जायचे. आजही विदर्भातील प्रमुख पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून हा सर्वांत जास्त दर ठरला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीपासूनच अतिवृष्टीने पिकांना जबर फटका बसला होता. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्यामुळे बोंडे सडली होती, जी काही कपाशी बचावली त्यातून उत्पादन सुरू होते. त्यानंतर पुन्हा शेतात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. जिल्ह्यात यंदा कापसाचे उत्पादनात घट झाली आहे व इतर ठिकाणीही कपाशीला पावसाचा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर यावर्षी कापूस उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट झाली आहे, त्यामुळे कापसाला सर्वाधिक दर मिळत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आर्वी विभागात १८ जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत, तर कापूस खरेदी करणारे ३० ते ३५ व्यावसायिक असल्याने कपसाचीही आवक वाढली आहे. 

सध्या तरी कापसाचा मिळणारा भाव समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; पण भाव पुन्हा वाढणार, की कमी होणार, हे सांगणे कठीण आहे.         रामभाऊ केणे,शेतकरी

 

टॅग्स :cottonकापूस