शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:58 IST

राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले.

ठळक मुद्देअधिकारी मोर्चास्थळी पोहोचले : सातही दिवस सकाळी शेतीला वीज द्या

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले. व मोर्चातील शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.यावेळी शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, निलेश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नयनसुख लढ्ढा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर विविध वक्तयांनी मनोगत व्यक्त केले. आणि मोर्चाचा समारोप झाला. शेतातील ओलिताकरिता आठवड्यातील सात दिवस आठ तास वीजपुरवठा दिवसा करावा, बोंडअळीच्या मदतीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावे, तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकरिता राज्य शासनाच्या १४ जून २०१८ च्या जीआर नुसार जाहीर केलेले. १००० रुपये प्रतिक्विंटल बोनस तत्काळ द्यावे, २०१८-१९ या हंगामातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंद करुन शासनाने हमीभावाने खरेदी त्वरित सुरू करावी, कृषीपंप वीजजोडणीकरिता सहा महिन्यांआधी ज्या शेतकऱ्यांनी डिमांडनोटनुसार रकमेचा भरणा वीजवितरणकडे केला. त्या शेतकऱ्यांना विनाविलंब वीजजोडणी द्यावी. तळेगाव, चिस्तुर, आनंदवाडी, भारसवाडा, टेकोडा, बेलोरा आणि खडका या गावांची कृषीपंप व गावठाण वीज जोडणी एकाच लाईनवर असल्याने ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले आहे. या गावांची कृषीपंप व गावठाण लाईन वेगळी करण्यात यावी, आदी मागण्याकरिता शेतकऱ्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. या आक्रोश मोर्चा दरम्यान शेतकरी महामार्गावर चक्काजाम करू शकतात या भितीमुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी मोर्चाच्या ठिकाणी येत शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यामध्ये ज्या ज्या विभागाशी निगडित शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या- त्या विभागाचे सर्व अधिकारी, सिंचन विभाग, महावितरण, सहकार विभाग, वनविभागाशी निगडित असलेले सर्व अधिकारी हे यावेळी निवेदन स्वीकारण्यास मोर्चा स्थळी हजर होते.या आंदोलनात कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता तरीही मोठ्या प्रमाणात शेतकरी यात सहभागी झाले होते. या मोर्चाला निलेश देशमुख, शैलेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी यावेळी मांडल्या.

टॅग्स :Morchaमोर्चाFarmerशेतकरी