शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
4
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
5
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
6
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
7
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
8
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
9
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
10
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
11
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
12
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
13
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
14
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
15
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
16
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
17
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
18
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
19
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
20
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला; तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:52 IST

नुकसान भरपाईची मागणी : कारंजा तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घाडगे) : सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सोयाबीन, कपाशीसोबतच आता संत्रा व मोसंबीच्या बागाही धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली. तसेच तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कारंजा तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने संत्रा व मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. आंबिया बहराची ७५ टक्के फळगळ झाली आहे. कीड व बुरशीनाशक औषधींच्या चार ते पाच फवारण्या करूनही गळती कमी होत नाही. अशातच संत्री व मोसंबीची झाडे पिवळी पडून मरत आहेत. २० ते २५ वर्षे मेहनतीने जगविलेली झाडे अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगांमुळे डोळ्यादेखत मरताना पहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अनेक भागातील जमीन ओली असल्याने आंतरमशागत करता येत नाही.

परिणामी तूर, कापूस, सोयाबीन व ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाच्या नियंत्रणावर शेतकऱ्यांना प्रचंड खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. सर्वच शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी करणे शक्य होत नाही. तेव्हा शासनानेच पुढाकार घेऊन स्वतः ई- पीक पाहणी करून तातडीने भरपाई द्यावी, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला होता. या मागणीचे तहसीलदार टिपरे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रदीप शेटे, नितीन भांगे, प्रा. सुभाष अंधारे, केशव भक्ते, मनोज भांगे, युवराज देशमुख, संदीप भिसे, विभाकर ढोले, हरिभाऊ धोटे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :wardha-acवर्धा