शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला; तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:52 IST

नुकसान भरपाईची मागणी : कारंजा तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घाडगे) : सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सोयाबीन, कपाशीसोबतच आता संत्रा व मोसंबीच्या बागाही धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली. तसेच तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कारंजा तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने संत्रा व मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. आंबिया बहराची ७५ टक्के फळगळ झाली आहे. कीड व बुरशीनाशक औषधींच्या चार ते पाच फवारण्या करूनही गळती कमी होत नाही. अशातच संत्री व मोसंबीची झाडे पिवळी पडून मरत आहेत. २० ते २५ वर्षे मेहनतीने जगविलेली झाडे अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगांमुळे डोळ्यादेखत मरताना पहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अनेक भागातील जमीन ओली असल्याने आंतरमशागत करता येत नाही.

परिणामी तूर, कापूस, सोयाबीन व ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाच्या नियंत्रणावर शेतकऱ्यांना प्रचंड खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. सर्वच शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी करणे शक्य होत नाही. तेव्हा शासनानेच पुढाकार घेऊन स्वतः ई- पीक पाहणी करून तातडीने भरपाई द्यावी, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला होता. या मागणीचे तहसीलदार टिपरे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रदीप शेटे, नितीन भांगे, प्रा. सुभाष अंधारे, केशव भक्ते, मनोज भांगे, युवराज देशमुख, संदीप भिसे, विभाकर ढोले, हरिभाऊ धोटे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :wardha-acवर्धा