शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला; तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:52 IST

नुकसान भरपाईची मागणी : कारंजा तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घाडगे) : सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सोयाबीन, कपाशीसोबतच आता संत्रा व मोसंबीच्या बागाही धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली. तसेच तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कारंजा तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने संत्रा व मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. आंबिया बहराची ७५ टक्के फळगळ झाली आहे. कीड व बुरशीनाशक औषधींच्या चार ते पाच फवारण्या करूनही गळती कमी होत नाही. अशातच संत्री व मोसंबीची झाडे पिवळी पडून मरत आहेत. २० ते २५ वर्षे मेहनतीने जगविलेली झाडे अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगांमुळे डोळ्यादेखत मरताना पहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अनेक भागातील जमीन ओली असल्याने आंतरमशागत करता येत नाही.

परिणामी तूर, कापूस, सोयाबीन व ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे. त्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाच्या नियंत्रणावर शेतकऱ्यांना प्रचंड खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. सर्वच शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी करणे शक्य होत नाही. तेव्हा शासनानेच पुढाकार घेऊन स्वतः ई- पीक पाहणी करून तातडीने भरपाई द्यावी, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला होता. या मागणीचे तहसीलदार टिपरे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रदीप शेटे, नितीन भांगे, प्रा. सुभाष अंधारे, केशव भक्ते, मनोज भांगे, युवराज देशमुख, संदीप भिसे, विभाकर ढोले, हरिभाऊ धोटे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :wardha-acवर्धा