शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ओलितासाठी शेतकऱ्यांच्या जीवाचा आटापिटा

By admin | Updated: December 28, 2015 02:21 IST

शेती सिंचनाखाली यावी म्हणून शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात; पण त्या योग्यरित्या राबविल्या जात ..

शेतकऱ्यांना भुर्दंड : सिंचनासाठी असलेल्या योजना ठरताहेत कुचकामीविजय माहुरे सेलूशेती सिंचनाखाली यावी म्हणून शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात; पण त्या योग्यरित्या राबविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना जीवाचा आटापिटा करावा लागतो. हा प्रकार तालुक्यात पाहावयास मिळत आहे. पाटचऱ्या साफ व दुरूस्त केल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना शीतलहरीचा सामना करीत पाटचाऱ्या साफ करीत शेतापर्यंत पाणी न्यावे लागत असल्याचे दिसते.सेलू तालुक्याला हरितक्रांतीचे स्वप्न दाखवित ५० वर्षांपूर्वी बोर प्रकल्प निर्माण करण्यता आला. बहुतांश कृषी क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी वितरिका, पाटचऱ्या, सायपण तयार करण्यात आले. शेतकरी यामुळे खरीप व रबी, अशा दोन्ही हंगामातील पिके घेऊ लागले. प्रारंभी काही वर्षे वितरिकांची साफसफाई नियमित केली जात होती. पाण्याचे नियोजन केले जात होते. सायपणवर दिवसा तसेच रात्रपाळीत कर्मचारी राहत होता. पाण्याचा अपव्यय होऊ नये, याचीही काळजी घेतली जात होती; पण ५० वर्षांपूर्वी असलेल्या वितरिका व पाटचऱ्यांच्या साफसफाई व डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने याची दुरूस्तीच केली जात नाही. बहुतांश ठिकाणी वितरिकेच्या बाजूला असलेल्या शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. पिकाचे ओलित करण्यासाठी शेतापर्यंत पाणी नेताना शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागतो. पाटचऱ्यांतून पाणी घेण्यासाठी कंबरभर खोल नालीत उतरून प्लास्टिक पिशव्या व दगडांची पाळ लावण्यासाठी आजही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. साफसफाई नसलेल्या वितरिकेत काटे, सरपटणारे प्राणी यांच्या वास्तव्याची भीती असली तरी शेतात पेरलेल्या पिकाला पाणी देऊन उत्पन्न घेण्याची आस असलेल्या शेतकऱ्याला शासकीय अनास्थेचा सामना करावा लागत आहे. बोर प्रकल्पाला निधीचा अभाव व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले जाते. शासनाकडून सिंचन व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचे सांगण्यात येत असताना साध्या पाटचऱ्यांची दुरूस्ती होत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. कोरडवाहू शेती सिंचनाखाली आली; पण सध्या या व्यवस्थेला अखेरची घरघर लागली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना ओलित करणे कठीण झाले आहे. हा त्रास दूर करण्यासाठी शासन लक्ष देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.