शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
3
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
4
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
5
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
6
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
7
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
8
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
9
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
10
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
11
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
12
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
13
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
14
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
15
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
16
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
17
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
19
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
20
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

ओलितासाठी शेतकऱ्यांच्या जीवाचा आटापिटा

By admin | Updated: December 28, 2015 02:21 IST

शेती सिंचनाखाली यावी म्हणून शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात; पण त्या योग्यरित्या राबविल्या जात ..

शेतकऱ्यांना भुर्दंड : सिंचनासाठी असलेल्या योजना ठरताहेत कुचकामीविजय माहुरे सेलूशेती सिंचनाखाली यावी म्हणून शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात; पण त्या योग्यरित्या राबविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना जीवाचा आटापिटा करावा लागतो. हा प्रकार तालुक्यात पाहावयास मिळत आहे. पाटचऱ्या साफ व दुरूस्त केल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना शीतलहरीचा सामना करीत पाटचाऱ्या साफ करीत शेतापर्यंत पाणी न्यावे लागत असल्याचे दिसते.सेलू तालुक्याला हरितक्रांतीचे स्वप्न दाखवित ५० वर्षांपूर्वी बोर प्रकल्प निर्माण करण्यता आला. बहुतांश कृषी क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी वितरिका, पाटचऱ्या, सायपण तयार करण्यात आले. शेतकरी यामुळे खरीप व रबी, अशा दोन्ही हंगामातील पिके घेऊ लागले. प्रारंभी काही वर्षे वितरिकांची साफसफाई नियमित केली जात होती. पाण्याचे नियोजन केले जात होते. सायपणवर दिवसा तसेच रात्रपाळीत कर्मचारी राहत होता. पाण्याचा अपव्यय होऊ नये, याचीही काळजी घेतली जात होती; पण ५० वर्षांपूर्वी असलेल्या वितरिका व पाटचऱ्यांच्या साफसफाई व डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने याची दुरूस्तीच केली जात नाही. बहुतांश ठिकाणी वितरिकेच्या बाजूला असलेल्या शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. पिकाचे ओलित करण्यासाठी शेतापर्यंत पाणी नेताना शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागतो. पाटचऱ्यांतून पाणी घेण्यासाठी कंबरभर खोल नालीत उतरून प्लास्टिक पिशव्या व दगडांची पाळ लावण्यासाठी आजही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. साफसफाई नसलेल्या वितरिकेत काटे, सरपटणारे प्राणी यांच्या वास्तव्याची भीती असली तरी शेतात पेरलेल्या पिकाला पाणी देऊन उत्पन्न घेण्याची आस असलेल्या शेतकऱ्याला शासकीय अनास्थेचा सामना करावा लागत आहे. बोर प्रकल्पाला निधीचा अभाव व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले जाते. शासनाकडून सिंचन व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचे सांगण्यात येत असताना साध्या पाटचऱ्यांची दुरूस्ती होत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. कोरडवाहू शेती सिंचनाखाली आली; पण सध्या या व्यवस्थेला अखेरची घरघर लागली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना ओलित करणे कठीण झाले आहे. हा त्रास दूर करण्यासाठी शासन लक्ष देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.