शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

शेतकऱ्याच्या मस्तकी बँकेने मारले कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांची सुकळी (बाई) येथे ०.५३ हेक्टर शेती आहे. ही शेती वडिलोपार्जित असून हे क्षेत्र सद्यस्थितीत सामायिक वारसदार म्हणून धनराज गौळकर, ज्ञानेश्वर भाऊराव गौळकर, लिला भाऊराव गौळकर, बेबी विनोद वडतकर यांची नावे आहेत. त्यांच्या शेतीवर सुकळी (बाई) येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून २६ ऑगस्ट २०१५ ला शेती गहाणद्वारे दीड लाखाच्या कर्जाची उचल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदीड लाखांची फसवणूक : पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : सातबाराचा वापर करून चक्क दीड लाखांच्या कर्जाची उचल करून बळीराजासह शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुकळी (बाई) येथील शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांनी केली आहे.शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांची सुकळी (बाई) येथे ०.५३ हेक्टर शेती आहे. ही शेती वडिलोपार्जित असून हे क्षेत्र सद्यस्थितीत सामायिक वारसदार म्हणून धनराज गौळकर, ज्ञानेश्वर भाऊराव गौळकर, लिला भाऊराव गौळकर, बेबी विनोद वडतकर यांची नावे आहेत. त्यांच्या शेतीवर सुकळी (बाई) येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून २६ ऑगस्ट २०१५ ला शेती गहाणद्वारे दीड लाखाच्या कर्जाची उचल करण्यात आली आहे. जमिनीचे क्षेत्रफळ ०.५३ हेक्टर असताना फेरफार नोंदवहीवर बँकेने जमिनीचे क्षेत्रफळ हे १.७० हेक्टरआर असे दाखविण्यात आले आहे. बँकेनेच माझ्या शेतावर १ लाख ५० हजार रुपये उचल करीत फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याने २०१५ मध्ये कर्जाच्या मागणीसाठी अर्ज केला नाही. तसेच आतापर्यंत कुठलेही कर्ज घेतलेले नाही. परंतु, कर्जाची उचल केल्याचे कागदपत्रांवर दाखविले जात असल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांनी केली आहे.बँकेने कर्ज परत केल्याचे दिले पत्रया शेतकऱ्याच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने शेतीवर कर्ज घेतले नाही. मात्र, हे पिक कर्ज बँकेला परत केल्याचे पत्र २० एप्रिल २०२० ला तलाठी कार्यालयाकडे तसेच शेतकऱ्याला दिले. शेतकऱ्याने ते कर्ज घेतलेच नाही तर बँकेने त्यांना कर्ज परत केल्या संदर्भातील पत्र कसे दिले हा सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे.शेतकऱ्यांना शेती वरील आणि गहाण संदर्भातली केसेस रजिस्टर दस्तऐवज बँकेकडून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागण्यात येते. परंतु, दस्तऐवज क्रमांक शुन्य राहतच नाही.- एन. एन. रामटेके, दुय्यम निबंधक, सेलू.महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढविला आहे. शेतकऱ्याने पैशाची उचल केलीच नाही. बँकेकडून शेतकऱ्याला २०१५ मध्ये दीड लाख रुपये कर्ज स्वरूपात रक्कम उचल केल्याची तसेच २०२० मध्ये कर्ज भरणा केल्या संदर्भातील ते पत्र चुकीने देण्यात आले आहे. त्यामुळे आमच्या बँकेची या प्रकरणात काहीही चूक नाही.- अविनाश कानेकर, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, सुकळी (बाई).माझ्या भावाला कर्करोगाने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी पैसे मिळावे म्हणून मी शेतीवर किती कर्ज मिळते हे विचारण्यासाठी गेलो असता हा प्रकार उजेडात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.- ज्ञानेश्वर गौळकर, शेतकरी, सुकळी (बाई).

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBank of Indiaबँक ऑफ इंडिया