शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

शेतकऱ्याच्या मस्तकी बँकेने मारले कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांची सुकळी (बाई) येथे ०.५३ हेक्टर शेती आहे. ही शेती वडिलोपार्जित असून हे क्षेत्र सद्यस्थितीत सामायिक वारसदार म्हणून धनराज गौळकर, ज्ञानेश्वर भाऊराव गौळकर, लिला भाऊराव गौळकर, बेबी विनोद वडतकर यांची नावे आहेत. त्यांच्या शेतीवर सुकळी (बाई) येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून २६ ऑगस्ट २०१५ ला शेती गहाणद्वारे दीड लाखाच्या कर्जाची उचल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदीड लाखांची फसवणूक : पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : सातबाराचा वापर करून चक्क दीड लाखांच्या कर्जाची उचल करून बळीराजासह शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुकळी (बाई) येथील शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांनी केली आहे.शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांची सुकळी (बाई) येथे ०.५३ हेक्टर शेती आहे. ही शेती वडिलोपार्जित असून हे क्षेत्र सद्यस्थितीत सामायिक वारसदार म्हणून धनराज गौळकर, ज्ञानेश्वर भाऊराव गौळकर, लिला भाऊराव गौळकर, बेबी विनोद वडतकर यांची नावे आहेत. त्यांच्या शेतीवर सुकळी (बाई) येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून २६ ऑगस्ट २०१५ ला शेती गहाणद्वारे दीड लाखाच्या कर्जाची उचल करण्यात आली आहे. जमिनीचे क्षेत्रफळ ०.५३ हेक्टर असताना फेरफार नोंदवहीवर बँकेने जमिनीचे क्षेत्रफळ हे १.७० हेक्टरआर असे दाखविण्यात आले आहे. बँकेनेच माझ्या शेतावर १ लाख ५० हजार रुपये उचल करीत फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याने २०१५ मध्ये कर्जाच्या मागणीसाठी अर्ज केला नाही. तसेच आतापर्यंत कुठलेही कर्ज घेतलेले नाही. परंतु, कर्जाची उचल केल्याचे कागदपत्रांवर दाखविले जात असल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांनी केली आहे.बँकेने कर्ज परत केल्याचे दिले पत्रया शेतकऱ्याच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने शेतीवर कर्ज घेतले नाही. मात्र, हे पिक कर्ज बँकेला परत केल्याचे पत्र २० एप्रिल २०२० ला तलाठी कार्यालयाकडे तसेच शेतकऱ्याला दिले. शेतकऱ्याने ते कर्ज घेतलेच नाही तर बँकेने त्यांना कर्ज परत केल्या संदर्भातील पत्र कसे दिले हा सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे.शेतकऱ्यांना शेती वरील आणि गहाण संदर्भातली केसेस रजिस्टर दस्तऐवज बँकेकडून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागण्यात येते. परंतु, दस्तऐवज क्रमांक शुन्य राहतच नाही.- एन. एन. रामटेके, दुय्यम निबंधक, सेलू.महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढविला आहे. शेतकऱ्याने पैशाची उचल केलीच नाही. बँकेकडून शेतकऱ्याला २०१५ मध्ये दीड लाख रुपये कर्ज स्वरूपात रक्कम उचल केल्याची तसेच २०२० मध्ये कर्ज भरणा केल्या संदर्भातील ते पत्र चुकीने देण्यात आले आहे. त्यामुळे आमच्या बँकेची या प्रकरणात काहीही चूक नाही.- अविनाश कानेकर, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, सुकळी (बाई).माझ्या भावाला कर्करोगाने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी पैसे मिळावे म्हणून मी शेतीवर किती कर्ज मिळते हे विचारण्यासाठी गेलो असता हा प्रकार उजेडात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.- ज्ञानेश्वर गौळकर, शेतकरी, सुकळी (बाई).

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBank of Indiaबँक ऑफ इंडिया