शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्याची पायपीट

By admin | Updated: June 14, 2014 23:47 IST

नजिकच्या कानगाव येथील रहिवासी भाऊराव महादेव भरडे (६५) यांची मौजा कानगाव येथे ५ एकर शेती आहे. दि.२० मे रोजी अचानक वादळ व विजेच्या कडकडाट झाला. वादळात शेतातील गोठ्यावर वीज पडली.

वायगाव (नि.) : नजिकच्या कानगाव येथील रहिवासी भाऊराव महादेव भरडे (६५) यांची मौजा कानगाव येथे ५ एकर शेती आहे. दि.२० मे रोजी अचानक वादळ व विजेच्या कडकडाट झाला. वादळात शेतातील गोठ्यावर वीज पडली. विद्युत स्पार्किंग गोठ्याला आग लागल्याने सदर शेतकऱ्याचे दीड लाखांच्या घरात नुकसान झाले. एकाएकी आलेल्या या संकटामुळे सदर शेतकरी हतबल झाला आहे.या आगीत १ गाय, १ बैल, १० कोंबड्या या मृत पावल्या. त्या गोठ्यातील पिव्हीसी पाईप ६०० फूट, जनावरांचा कडबा - कुटार व शेतात टाकण्यासाठी ठेवलेले बि-बियाणे व शेती उपयोगी साहित्य भस्म झाले. मात्र १ बैलाला गावकऱ्यांनी वाचवले. तो बैल सुद्धा गंभीर जखमी आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. शेती गावाच्या बाहेर असल्याने व कोणालाही दिसली नाही. मात्र आगीने उग्ररूप धारण केल्यामुळे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यात शेतकऱ्यासह ग्रामस्थ घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत उशिर झाला होता.भाऊराव भरडे हा अल्प भूदारक शेतकरी आहे. गेल्या दोन वर्षापासून नापिकीला तोंड देत आहे. गेल्या वर्षी तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. अशातच भाऊराव भरडे या शेतकऱ्यावर बँक आॅफ इंडिया बँकेचे १ लाख रूपये कर्ज असून खाजगी कर्ज अंदाजे २ लाखांच्या जवळपास आहे. मात्र नापिकीने त्याचे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. त्यात पुन्हा नवीन संकट आल्याने शेतकरी भाऊराव भरडे हा हवालदील झाला आहे. आता नव्याने उभे होण्यासाठी शेती करण्यासाठी बैल जोडी, बि-बियाणे, खत कसे घ्यावे व शेती कशी करायची हा प्रश्नच उभा झाला आहे. सदर शेतकऱ्याने पालकमंत्री, खासदार व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिली. मात्र काहीही उपयोग झाला नाही. न्याय मिळावा यासाठी सतत येरझारा मारत असून अजूनही अजूनही यावर अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)