शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्याची पायपीट

By admin | Updated: June 14, 2014 23:47 IST

नजिकच्या कानगाव येथील रहिवासी भाऊराव महादेव भरडे (६५) यांची मौजा कानगाव येथे ५ एकर शेती आहे. दि.२० मे रोजी अचानक वादळ व विजेच्या कडकडाट झाला. वादळात शेतातील गोठ्यावर वीज पडली.

वायगाव (नि.) : नजिकच्या कानगाव येथील रहिवासी भाऊराव महादेव भरडे (६५) यांची मौजा कानगाव येथे ५ एकर शेती आहे. दि.२० मे रोजी अचानक वादळ व विजेच्या कडकडाट झाला. वादळात शेतातील गोठ्यावर वीज पडली. विद्युत स्पार्किंग गोठ्याला आग लागल्याने सदर शेतकऱ्याचे दीड लाखांच्या घरात नुकसान झाले. एकाएकी आलेल्या या संकटामुळे सदर शेतकरी हतबल झाला आहे.या आगीत १ गाय, १ बैल, १० कोंबड्या या मृत पावल्या. त्या गोठ्यातील पिव्हीसी पाईप ६०० फूट, जनावरांचा कडबा - कुटार व शेतात टाकण्यासाठी ठेवलेले बि-बियाणे व शेती उपयोगी साहित्य भस्म झाले. मात्र १ बैलाला गावकऱ्यांनी वाचवले. तो बैल सुद्धा गंभीर जखमी आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. शेती गावाच्या बाहेर असल्याने व कोणालाही दिसली नाही. मात्र आगीने उग्ररूप धारण केल्यामुळे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यात शेतकऱ्यासह ग्रामस्थ घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत उशिर झाला होता.भाऊराव भरडे हा अल्प भूदारक शेतकरी आहे. गेल्या दोन वर्षापासून नापिकीला तोंड देत आहे. गेल्या वर्षी तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. अशातच भाऊराव भरडे या शेतकऱ्यावर बँक आॅफ इंडिया बँकेचे १ लाख रूपये कर्ज असून खाजगी कर्ज अंदाजे २ लाखांच्या जवळपास आहे. मात्र नापिकीने त्याचे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. त्यात पुन्हा नवीन संकट आल्याने शेतकरी भाऊराव भरडे हा हवालदील झाला आहे. आता नव्याने उभे होण्यासाठी शेती करण्यासाठी बैल जोडी, बि-बियाणे, खत कसे घ्यावे व शेती कशी करायची हा प्रश्नच उभा झाला आहे. सदर शेतकऱ्याने पालकमंत्री, खासदार व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिली. मात्र काहीही उपयोग झाला नाही. न्याय मिळावा यासाठी सतत येरझारा मारत असून अजूनही अजूनही यावर अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)