शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: October 1, 2014 23:28 IST

आंजी-बोरखेडी धरणाचे काम कधीच पूर्ण झाले. मात्र याभागात आवागमनाकरिता रस्ता बनविण्याचा विसर पाटबंधारे विभागाला पडला आहे. गत २५ वर्षांपासून या भागात राहणारे ग्रामस्थ

वर्धा : आंजी-बोरखेडी धरणाचे काम कधीच पूर्ण झाले. मात्र याभागात आवागमनाकरिता रस्ता बनविण्याचा विसर पाटबंधारे विभागाला पडला आहे. गत २५ वर्षांपासून या भागात राहणारे ग्रामस्थ या अडचणीला तोंड देत आहे. ये-जा करायला रस्ता नसल्याने शेतकरी सर्वाधिक प्रभावित होत असून शेतकऱ्यांना लांबच्या रस्त्याने शेतात जावे लागते. प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे कच्च्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. अखेर त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी पाटंबधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन समस्येकडे लक्ष वेधले आहे.गत २५ वर्र्षांपासून बोरखेडी प्रकल्पाचे काम सुरु होते. हे काम पूर्णत्वास आले, परंतु त्या धरणाकडे जाण्याकरिता अजून साधा रस्ताही पाटबंधारे विभागाने तयार केला नाही. याच मार्गाने गावातील शेतकरी शेतात जातात. धरणातील बॅकवॉटरमुळे परिसरातील शेतकऱ्यांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. शेतात ये-जा करणे शक्य नसल्यामुळे श्वापदे पिकांची नासाडी करतात. शेतकऱ्यांना बराच फेरा मारुन जातात. सात वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने गावातील रस्त्याचा सर्वे केला. मात्र त्यानंतर कार्यवाही शून्य आहे. गावकऱ्यांनी २००७ ला वर्धा पाटबंधारे विभागाला पत्र दिले. परंतु अद्याप रस्ता तयार करण्यात आला नाही. हे धरण सोसायटीकडे हस्तांतरीत करण्यात आले. यानंतर समस्यांत वाढ झाली आहे. याची संबंधित विभागाकडून चौकशी करण्याची मागणी आहे. सोसायटीचे पदाधिकारी कोणत्याच समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे दोन्ही गावतील शेतकरी पदाधिकारी यांच्या नावाने बोंब मारतात. धरणाच्या कालवा दुरुस्तीत भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार आहे. याची चौकशी केली जावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासह अनियममित पाणी सोडले जाते. गेट क्र. ३ चे पाणी गेट उंच करुन कमी केले. तसेच क्रमांक ९ च्या गेट मधून अधिक उपसा केला जातो. याचा ठराविक लोकांना लाभ होतो. कालवा मार्गावरील काट्या तोडण्याचे कंत्राट दिले होते. त्यातही आर्थिक अपहार केला आहे. नानाप्रकारे बिले काढल्याची चर्चा आहे. या मार्गावरील बोरीचे झाड तसेच आहे. यामुळे या मार्गाने जाणे शक्य नाही. हीे बोरीचे झाडे हटविण्याकरिता जास्त खर्च येत नाही. मात्र यातही अधिकचे बिले लावण्यात येतात. या सोसायटीची वर्षभरात एकही सभा झाली नाही. यामुळे गावातील लोकांना कामकाजाची कोणतीच माहिती नसते. पाटबंधारे विभाग निवडणूक न घेता पदावरील अध्यक्षाला कायम ठेवतात. तातडीने येथे निवडणूक नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याची मागणी आहे. दोन्ही गावातील नागरिकांना सोयीस्कर ठरेल असा धरणापर्यंत रस्ता तयार करावा. किमान रस्त्याचे खडीकरण करुन पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. याची कोणतीच कार्यवाही झाली नाही तर ग्रामस्थ याविरोधात आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)