शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

कोरोनामुळे वाया गेलेला हा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचा व लग्न सराईचा असतो. या काळात शेतकऱ्यांचे शेतीमाल तयार करुन विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन करणे हे असते. परंतु या परिस्थितीत शेतकरी बिकट प्रसंगामध्ये अडकला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस, तुर अजूनही घरातच आहे.

ठळक मुद्देबाजारात माल नेण्याऐवजी दुचाकीवर विकण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे ऐन सुगी व लग्न सराईचा जवळपास एक महिना वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. विवाहाचे मुहूर्त काढलेल्या वधुपित्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. यापुढील व्यवहार कधी सुरळीत होतील हे सांगणे कठीण आहे. जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय, छोटे, मोठे व्यापारी, दुकानदार यांच्यावर कोरोनाचा विपरीत परिणाम झालेला आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक अडचण होत आहे.कोरोनामुळे वाया गेलेला हा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचा व लग्न सराईचा असतो. या काळात शेतकऱ्यांचे शेतीमाल तयार करुन विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन करणे हे असते. परंतु या परिस्थितीत शेतकरी बिकट प्रसंगामध्ये अडकला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस, तुर अजूनही घरातच आहे. तो कुठे कसा विकायचा याचे नियोजन नाही. त्यातच ही परिस्थिती कधी बदलेल हे सांगणेही अवघड असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत. तर कापूस व तुर घरातच किडे लागून खराब होते की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच बिघडले आहे.वधूपित्यांचा जीव टांगणीलाशेतकरी डिसेंबरपासूनच मुलींसाठी ईच्छित स्थळ शोधून तारीख पक्की करतात, सुगी संपल्यानंतर एप्रिल, मे दरम्यान लग्नाच्या तारखांना प्राधान्य असते. यावर्षीही अनेकांनी या दरम्यानच्या तारखा काढून मंगल कार्यालये,बॅडवाले, मंडपवाले सांगून ठेवले होते. परंतु आता कोरोनात ते होईनासे झाले आहे. तर लग्नसराईच संकटात असल्याने जनजीवनच विस्कळीत झाले आहे. लग्नसराई ही अनेकांना रोजगार देणारी असते.यामध्ये मंडपवाले, वाहनधारक, स्वयंपाकी यांनाही लग्न नसल्याने घरीच थांबावे लागत आहे.टरबूज, खरबूज, टोमॅटो कवडीमोल भावातअनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात ठिबक सिंचनाला खर्च करीत टरबुज,खरबुज,टोमॅटो,काकडी अशी पिके घेतली असून त्यासाठी अमाप खर्च केला आहे. ती पिके निघण्याच्या काळातच हा विषाणू आल्याने पिके विकण्याची पंचाईत झाली आहे.काही शेतातच तोडणीअभावी खराब होत आहे, तर तोडलेला मालही कवडीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी