शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

कोरोनामुळे वाया गेलेला हा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचा व लग्न सराईचा असतो. या काळात शेतकऱ्यांचे शेतीमाल तयार करुन विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन करणे हे असते. परंतु या परिस्थितीत शेतकरी बिकट प्रसंगामध्ये अडकला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस, तुर अजूनही घरातच आहे.

ठळक मुद्देबाजारात माल नेण्याऐवजी दुचाकीवर विकण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे ऐन सुगी व लग्न सराईचा जवळपास एक महिना वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. विवाहाचे मुहूर्त काढलेल्या वधुपित्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. यापुढील व्यवहार कधी सुरळीत होतील हे सांगणे कठीण आहे. जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय, छोटे, मोठे व्यापारी, दुकानदार यांच्यावर कोरोनाचा विपरीत परिणाम झालेला आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक अडचण होत आहे.कोरोनामुळे वाया गेलेला हा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचा व लग्न सराईचा असतो. या काळात शेतकऱ्यांचे शेतीमाल तयार करुन विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन करणे हे असते. परंतु या परिस्थितीत शेतकरी बिकट प्रसंगामध्ये अडकला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस, तुर अजूनही घरातच आहे. तो कुठे कसा विकायचा याचे नियोजन नाही. त्यातच ही परिस्थिती कधी बदलेल हे सांगणेही अवघड असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत. तर कापूस व तुर घरातच किडे लागून खराब होते की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच बिघडले आहे.वधूपित्यांचा जीव टांगणीलाशेतकरी डिसेंबरपासूनच मुलींसाठी ईच्छित स्थळ शोधून तारीख पक्की करतात, सुगी संपल्यानंतर एप्रिल, मे दरम्यान लग्नाच्या तारखांना प्राधान्य असते. यावर्षीही अनेकांनी या दरम्यानच्या तारखा काढून मंगल कार्यालये,बॅडवाले, मंडपवाले सांगून ठेवले होते. परंतु आता कोरोनात ते होईनासे झाले आहे. तर लग्नसराईच संकटात असल्याने जनजीवनच विस्कळीत झाले आहे. लग्नसराई ही अनेकांना रोजगार देणारी असते.यामध्ये मंडपवाले, वाहनधारक, स्वयंपाकी यांनाही लग्न नसल्याने घरीच थांबावे लागत आहे.टरबूज, खरबूज, टोमॅटो कवडीमोल भावातअनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात ठिबक सिंचनाला खर्च करीत टरबुज,खरबुज,टोमॅटो,काकडी अशी पिके घेतली असून त्यासाठी अमाप खर्च केला आहे. ती पिके निघण्याच्या काळातच हा विषाणू आल्याने पिके विकण्याची पंचाईत झाली आहे.काही शेतातच तोडणीअभावी खराब होत आहे, तर तोडलेला मालही कवडीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी