शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

कोरोनामुळे वाया गेलेला हा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचा व लग्न सराईचा असतो. या काळात शेतकऱ्यांचे शेतीमाल तयार करुन विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन करणे हे असते. परंतु या परिस्थितीत शेतकरी बिकट प्रसंगामध्ये अडकला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस, तुर अजूनही घरातच आहे.

ठळक मुद्देबाजारात माल नेण्याऐवजी दुचाकीवर विकण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे ऐन सुगी व लग्न सराईचा जवळपास एक महिना वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. विवाहाचे मुहूर्त काढलेल्या वधुपित्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. यापुढील व्यवहार कधी सुरळीत होतील हे सांगणे कठीण आहे. जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय, छोटे, मोठे व्यापारी, दुकानदार यांच्यावर कोरोनाचा विपरीत परिणाम झालेला आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक अडचण होत आहे.कोरोनामुळे वाया गेलेला हा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचा व लग्न सराईचा असतो. या काळात शेतकऱ्यांचे शेतीमाल तयार करुन विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन करणे हे असते. परंतु या परिस्थितीत शेतकरी बिकट प्रसंगामध्ये अडकला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस, तुर अजूनही घरातच आहे. तो कुठे कसा विकायचा याचे नियोजन नाही. त्यातच ही परिस्थिती कधी बदलेल हे सांगणेही अवघड असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत. तर कापूस व तुर घरातच किडे लागून खराब होते की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच बिघडले आहे.वधूपित्यांचा जीव टांगणीलाशेतकरी डिसेंबरपासूनच मुलींसाठी ईच्छित स्थळ शोधून तारीख पक्की करतात, सुगी संपल्यानंतर एप्रिल, मे दरम्यान लग्नाच्या तारखांना प्राधान्य असते. यावर्षीही अनेकांनी या दरम्यानच्या तारखा काढून मंगल कार्यालये,बॅडवाले, मंडपवाले सांगून ठेवले होते. परंतु आता कोरोनात ते होईनासे झाले आहे. तर लग्नसराईच संकटात असल्याने जनजीवनच विस्कळीत झाले आहे. लग्नसराई ही अनेकांना रोजगार देणारी असते.यामध्ये मंडपवाले, वाहनधारक, स्वयंपाकी यांनाही लग्न नसल्याने घरीच थांबावे लागत आहे.टरबूज, खरबूज, टोमॅटो कवडीमोल भावातअनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात ठिबक सिंचनाला खर्च करीत टरबुज,खरबुज,टोमॅटो,काकडी अशी पिके घेतली असून त्यासाठी अमाप खर्च केला आहे. ती पिके निघण्याच्या काळातच हा विषाणू आल्याने पिके विकण्याची पंचाईत झाली आहे.काही शेतातच तोडणीअभावी खराब होत आहे, तर तोडलेला मालही कवडीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी