शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्तीकरिता काँग्रेसची कचेरीवर धडक

By admin | Updated: July 11, 2015 02:45 IST

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन असमर्थ ठरत आहे. दिलेली आश्वासने हवेतच विरत आहेत.

वर्धा : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन असमर्थ ठरत आहे. दिलेली आश्वासने हवेतच विरत आहेत. शेतकरी अनेक समस्यांनी ग्रासला असताना त्याच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून धडक देण्यात आली. यावेळी एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. कृषीकर्जाचे पुनर्गठण करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, एकाही बँकेत पूर्णत: कर्जाचे गठण झाले नाही. पेरणीच्या वेळी उसणवारी आणत काम निभावण्यात आले. अशात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची चिंता वाढत आहे. तरीही राज्य शासनाकडून शेतकऱ्यांकरिता विशेष सहकार्य होत नाही. निवडणुकीच्या काळात कृषी मालाचे दर वाढविण्याचे आश्वासन मोदी शासनाने दिले होते. ते हवेतच विरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गोहत्या बंदी कायदा लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यात शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांचे काय, याचा विचार कायदा करणाऱ्यांकडून झाला नाही. ही जनावरे शेतकऱ्यांनी कुठे न्यावी, दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचे पोषण शेतकऱ्यांनी कसे करावे याचा विचार करून कायदा अंमलात आणावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. साई मंगल कार्यालयातून निघालेल्या मोर्चात आ. रणजित कांबळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रवीण हिवरे, जि.प. माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, विजय जयस्वाल, जि.प. सदस्य उषाकिरण थुटे, मनोज चांदूरकर, मोरेश्वर खोडके, सभापती मनोहर खडसे, उपसभापती गुलाब डखरे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रकाशचंद्र डफ, पुलगाव नगराध्यक्ष मनीष साहू, शहराध्यक्ष राजेंद्र शर्मा, उपाध्यक्ष इक्राम हुसेन, रमेश सावरकर, अशद उल्ला खान अहमद खान, विवेक इंगाले, नगरसेवक शरद आडेंसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी) तर भाकड जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात आणूशासनाने गोहत्या बंदी कायदा अंमलात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात भाकड जनावरांची समस्या येत्या दिवसात डोके वर काढणार आहे. या जनावरांचे काय करावे या बाबत शासनाने विचार करून कायदा अंमलात आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास ही भाकड जनावरे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणू, असा इशारा यावेळी आ. रणजित कांबळे यांनी दिला. पोलिसांशी तू.. तू.. मै.. मै.. मोर्चा आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याकरिता निघाला असता न्यायालयाच्या द्वाराजवळ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. पोलिसांना न जुमानता मोर्चेकर पुढे निघाले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वाराजवळ पुन्हा पोलिसांशी वाद झाला. यावेळी आ. कांबळे व ठाणेदार बुराडे यांच्या शाब्दिक चकमक झाली. वाद चिघळण्याचे संकेत दिसताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी मध्यस्ती केल्याने वाद निवळला.