शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्तीकरिता काँग्रेसची कचेरीवर धडक

By admin | Updated: July 11, 2015 02:45 IST

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन असमर्थ ठरत आहे. दिलेली आश्वासने हवेतच विरत आहेत.

वर्धा : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन असमर्थ ठरत आहे. दिलेली आश्वासने हवेतच विरत आहेत. शेतकरी अनेक समस्यांनी ग्रासला असताना त्याच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातून धडक देण्यात आली. यावेळी एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. कृषीकर्जाचे पुनर्गठण करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, एकाही बँकेत पूर्णत: कर्जाचे गठण झाले नाही. पेरणीच्या वेळी उसणवारी आणत काम निभावण्यात आले. अशात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची चिंता वाढत आहे. तरीही राज्य शासनाकडून शेतकऱ्यांकरिता विशेष सहकार्य होत नाही. निवडणुकीच्या काळात कृषी मालाचे दर वाढविण्याचे आश्वासन मोदी शासनाने दिले होते. ते हवेतच विरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गोहत्या बंदी कायदा लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यात शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांचे काय, याचा विचार कायदा करणाऱ्यांकडून झाला नाही. ही जनावरे शेतकऱ्यांनी कुठे न्यावी, दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांचे पोषण शेतकऱ्यांनी कसे करावे याचा विचार करून कायदा अंमलात आणावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. साई मंगल कार्यालयातून निघालेल्या मोर्चात आ. रणजित कांबळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रवीण हिवरे, जि.प. माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, विजय जयस्वाल, जि.प. सदस्य उषाकिरण थुटे, मनोज चांदूरकर, मोरेश्वर खोडके, सभापती मनोहर खडसे, उपसभापती गुलाब डखरे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रकाशचंद्र डफ, पुलगाव नगराध्यक्ष मनीष साहू, शहराध्यक्ष राजेंद्र शर्मा, उपाध्यक्ष इक्राम हुसेन, रमेश सावरकर, अशद उल्ला खान अहमद खान, विवेक इंगाले, नगरसेवक शरद आडेंसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी) तर भाकड जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात आणूशासनाने गोहत्या बंदी कायदा अंमलात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात भाकड जनावरांची समस्या येत्या दिवसात डोके वर काढणार आहे. या जनावरांचे काय करावे या बाबत शासनाने विचार करून कायदा अंमलात आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास ही भाकड जनावरे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणू, असा इशारा यावेळी आ. रणजित कांबळे यांनी दिला. पोलिसांशी तू.. तू.. मै.. मै.. मोर्चा आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याकरिता निघाला असता न्यायालयाच्या द्वाराजवळ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. पोलिसांना न जुमानता मोर्चेकर पुढे निघाले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वाराजवळ पुन्हा पोलिसांशी वाद झाला. यावेळी आ. कांबळे व ठाणेदार बुराडे यांच्या शाब्दिक चकमक झाली. वाद चिघळण्याचे संकेत दिसताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी मध्यस्ती केल्याने वाद निवळला.