शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: January 28, 2015 23:38 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मार्केट यार्डमध्ये सीसीआयने कापसाची खरेदी बंद केली़ यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदारांच्या मध्यस्थीने

हिंगणघाट : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मार्केट यार्डमध्ये सीसीआयने कापसाची खरेदी बंद केली़ यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदारांच्या मध्यस्थीने कापसाची खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली. माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने सोमवारपर्यंत (दि़२६) कापूस खरेदी होणार नसल्याचे पत्र सीसीआयने बाजार समितीला दिले. यानंतर पुन्हा पत्र देऊन २९ जानेवारीपर्यंत कापूस खरेदी होणार नसल्याचे सांगितले; पण ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही़ यामुळे मंगळवारी (दि़२७) सकाळी ८ वाजतापासून कापसाच्या सुमारे ११०० ते १२०० गाड्या, ट्रक, ट्रक्टरची लांब रांग लागली़ यावेळी २९ जानेवारीपर्यंत कापूस खरेदी बंद असल्याचे सीसीआयने सांगताच शेतकरी संतप्त झाले. सीसीआय खरेरी करीत नसल्याने शेतकऱ्यांना ३६००-३७०० रुपये दराने खासगी व्यापाऱ्यास कापूस विकावा लागणार होता़ आवक अधिक असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान अटळ होते़ ७०० ते ८०० संतप्त शेतकऱ्यांनी आ़ समीर कुणावार यांचे घर गाठले़ सीसीआयला कापूस खरेदी करण्याचा आग्रह करण्याची मागणी केली़ कुणावार यांनी दखल घेत आकोट येथे सीसीआयचे अधिकारी मौर्या यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला; पण मौर्या यांनी कापूस ठेवण्यासाठी जागाच नसल्याने खरेदीस असमर्थता दर्शविली़ यावर त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून कपाशीची खरेदी सुरू करण्याचा आग्रह धरला. यानंतर सीसीआयचे विदर्भ प्रमुख सिंग यांच्याशी संपर्क साधला़ ना. मुनगंटीवार, आ. कुणावार व सिंग यांनी कॉल कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्यानंतर सिंग यांनी कापूस खरेदीचे आदेश दिले़ या वाटाघाटीनंतर दुपारी १२ वाजतापासून कापूस खरेदीस प्रारंभ झाल्याने तणाव निवळला़ मंगळवारी तब्बल ३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यामुळे खासगी व्यापाऱ्यांना माल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. अन्यथा लाखो रुपयाचा तोटा सहन करावा लागला असता.(तालुका प्रतिनिधी)