शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांना सुविधाच नाही

By admin | Updated: July 14, 2016 02:06 IST

शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे म्हणून शासनाने भाजीपाला व फळे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बाजारांना नियमनातून मुक्त केले.

व्यापाऱ्यांची लिलावातून माघार : भाजीपाला, फळे बाजार समितीच्या नियमनातून मुक्त प्रशांत हेलोंडे वर्धा शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे म्हणून शासनाने भाजीपाला व फळे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बाजारांना नियमनातून मुक्त केले. यानंतर शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना विकता येणार आहे. यामुळे अडत्यांना द्यावा लागणारा पैसा वाचणार असून व्यापाऱ्यांकडूनही लूट थांबणार आहे; पण शेतकऱ्यांना भाजीपाला, फळांची थेट विक्री झेपणार काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सध्या खरीप हंगामाची कामे असल्याने शेती करायची की, भाजीपाला, फळे विकायची, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. शासनाने व्यापारी, दलाल यांची दंडुकेशाही मोडीत काढण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केले. आता शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. यासाठी बाजार समितीच्या आठवडी बाजारांमध्ये शेतकऱ्यांना जागाही उपलब्ध होऊ शकते. या निर्णयातून शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे विकताना कुणालाही कमीशन द्यावे लागणार आहे. शिवाय व्यापाऱ्यांना भाजीपाला, फळे विकावी लागणार नाही. थेट ग्राहकांपर्यंत हा शेतमाल शेतकरी पोहोचवू शकतील. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असून मोठ्या शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला आहे. असे असले तरी सरसकट सर्वच शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे बाजारात स्वत: विकता येईल काय, हा प्रश्नच आहे. सध्या शेतातील खरीप हंगामातील कामे सुरू आहेत. पिके वर आली असून खते देणे, फवारणीची कामे सुरू आहेत. शिवाय शेतकऱ्यांना शेतात मजुरांवरही देखरेख ठेवावी लागते. या सर्व कामाच्या व्यापातून शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे विक्री करणे परवडणारे आहे काय, शेतमाल विक्रीतून नफा कमविता येईल काय, दिवसभर भाजी विकली तर शेतीकडे दुर्लक्ष होणार नाही काय, दैनंदिन भाजी, फळ विक्री शेतकऱ्यांना शक्य आहे काय आदी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाच्या या निर्णयाविरूद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यापाऱ्यांनी संप पुकारला. वर्धेतही एक दिवस संप झाला. गुरूवारपासून वर्धेतील भाजी, फळ खरेदीदार व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. तत्सम पत्रही बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आले आहे. यामुळे गुरूवारी ग्राहकांना फळे, भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडूनच खरेदी करावा लागणार आहे. शिवाय व्यापारी लिलावामध्ये सहभागी होणार नसल्याने शेतकऱ्यांनाही अडचणीचेच होणार आहे. बाजारात लिलावासाठी आणलेला भाजीपाला, फळे शेतकऱ्यांना दिवसभर विकावा लागणार आहे. या प्रकारामुळे जुनी व्यवस्था कोलमडणार असून बाजारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यातील बहुतांश शेतकरीही शासनाच्या या निर्णयामुळे आम्ही अडचणीत येऊ, अशाच प्रतिक्रीया व्यक्त करताना दिसले. वर्धेच्या बाजारात जिल्ह्याच्या सीमेवरूनही येतो भाजीपाला व फळे वर्धा येथील भाजी बाजारामध्ये जिल्ह्याच्या सिमेलगतच्या गावांतूनही शेतकरी भाजीपाला, फळे विक्रीस आणतात. यात कानगाव, काचनूर, तरोडा, हिंगणघाट जवळील गावे, चितोडा, अमरावतील जिल्ह्यालगत असलेल्या गावांतूनही वर्धेत भाजीपाला आणला जातो. आता व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने या शेकडो शेतकऱ्यांना आपला भाजीपाला, फळे स्वत: विकावा लागणार आहे. लिलावावरही प्रश्नचिन्ह वर्धेच्या भाजी बाजारात सुमारे १३२ व्यापारी व ६० ते ७० अडते शेतकऱ्यांच्या भाजीपाला, फळे या मालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत होते. यातील चुकारा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून अंशत: रोखीने दिला जात होता. यातूनच शेतकऱ्यांना अडत्यांना ६ टक्के कमिशन द्यावे लागत होते. आता गुरूवारपासून व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने दूरवरून येणाऱ्या शेतमालाचे काय होणार, हा प्रश्नच आहे. अडते लिलाव करण्यास तयार आहे; पण व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्यास असमर्थता दर्शविली आहे. शेतमाल विक्रीची जुनीच पद्धत योग्य आजपर्यंत शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल भाजी मंडईमध्ये दलालांमार्फत व्यापारी खरेदी करीत होते. या पद्धतीने शेतकऱ्याने आणलेल्या भाजीपाला, फळांची विक्री करताना अडते मध्यस्थाची भूमिका निभवित होते. व्यापारी लिलावामध्ये सहभागी होऊन भाजीपाला, फळे खरेदी करीत होते. यानंतर तो बाजारामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत विकला जात होता. यात शेतकऱ्यांना फार वेळ खर्ची घालावा लागत नव्हता. केवळ मध्यस्थी म्हणून अडत्यांना ६ टक्के दलाली द्यावी लागत होती.