शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आलोडी येथे सेंद्रीय खतातून फुलविली भाजीपाल्याची शेती

By admin | Updated: September 3, 2016 00:13 IST

कीटकनाशकांचा वारेमाप वापर केल्यास जमिनीचा पोत बिघडतो. शिवाय उत्पादन आणि चवीतही फरक पडतो.

महिलांचा पुढाकार : आरोग्याला पोषकवर्धा : कीटकनाशकांचा वारेमाप वापर केल्यास जमिनीचा पोत बिघडतो. शिवाय उत्पादन आणि चवीतही फरक पडतो. मानवी आरोग्याला घातक ठरणारी ही पीकपद्धती नाकारुन आलोडी येथील सुनीता उमाकांत डुकरे यांनी केवळ सेंद्रीय खत वापरून भाजीपाला शेती केली. त्यामुळे आरोग्याला पोषक ठरणारा भाजीपाला खरेदी करण्यास शहरासोबतच आता ग्रामीण भागातील नागरिक पसंती देत आहेत. आलोडी हे गाव वर्धा शहराला लागून असल्याने आता दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे. एका अर्थाने या परिसराला शहराचेच स्वरुप आल्याचे दिसून येते. मात्र घराच्या मोकळ्या जागेत भाजीपाल्याची शेती करण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. या पार्श्वभूमिवर सुनीता डुकरे यांनी ३ हजार ४०० चौरस फुटाच्या जागेत भाजीपाल्याची सेंद्रीय शेती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. महादेव डुकरे यांच्या मालकीचे पांढऱ्या मातीचे एक जुने घर आलोडी परिसरात होते. काही वर्षापूवी त्यांचे निधन झाले. पांढऱ्या मातीत भाजीपाला पिकविणे म्हणजे अग्निदिव्यच आहे, परंतु सुनीता डुकरे यांनी याच जागेवर सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सेंद्रीय शेतीची शास्त्रीय माहिती घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. त्यांच्या शेतीत आता कारले, वांगी, मिरची, टमाटर, चवळी, वालाच्या शेंगा, दोडके, गवार, भेंडी, पालक, कोथिंबीर, तूर आदी पिके घेतली जात आहेत. रासायनिक खतांचा अजिबात वापर होत नाही. त्यामुळे अनेकांनी डुकरे यांच्या शेतातूनच भाजीपाला विकत घेण्यास प्राधान्य दिले आहे. यातून आर्थिक मिळकत होऊ लागली. ग्राहकांनी मागणी केल्यास कोणत्याही वेळी थेट शेतातूनच भाजीपाला उपलब्ध करुन दिला जातो. त्यामुळे ग्राहकांतून याला मागणी वाढत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)