शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

आलोडी येथे सेंद्रीय खतातून फुलविली भाजीपाल्याची शेती

By admin | Updated: September 3, 2016 00:13 IST

कीटकनाशकांचा वारेमाप वापर केल्यास जमिनीचा पोत बिघडतो. शिवाय उत्पादन आणि चवीतही फरक पडतो.

महिलांचा पुढाकार : आरोग्याला पोषकवर्धा : कीटकनाशकांचा वारेमाप वापर केल्यास जमिनीचा पोत बिघडतो. शिवाय उत्पादन आणि चवीतही फरक पडतो. मानवी आरोग्याला घातक ठरणारी ही पीकपद्धती नाकारुन आलोडी येथील सुनीता उमाकांत डुकरे यांनी केवळ सेंद्रीय खत वापरून भाजीपाला शेती केली. त्यामुळे आरोग्याला पोषक ठरणारा भाजीपाला खरेदी करण्यास शहरासोबतच आता ग्रामीण भागातील नागरिक पसंती देत आहेत. आलोडी हे गाव वर्धा शहराला लागून असल्याने आता दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे. एका अर्थाने या परिसराला शहराचेच स्वरुप आल्याचे दिसून येते. मात्र घराच्या मोकळ्या जागेत भाजीपाल्याची शेती करण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. या पार्श्वभूमिवर सुनीता डुकरे यांनी ३ हजार ४०० चौरस फुटाच्या जागेत भाजीपाल्याची सेंद्रीय शेती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. महादेव डुकरे यांच्या मालकीचे पांढऱ्या मातीचे एक जुने घर आलोडी परिसरात होते. काही वर्षापूवी त्यांचे निधन झाले. पांढऱ्या मातीत भाजीपाला पिकविणे म्हणजे अग्निदिव्यच आहे, परंतु सुनीता डुकरे यांनी याच जागेवर सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सेंद्रीय शेतीची शास्त्रीय माहिती घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. त्यांच्या शेतीत आता कारले, वांगी, मिरची, टमाटर, चवळी, वालाच्या शेंगा, दोडके, गवार, भेंडी, पालक, कोथिंबीर, तूर आदी पिके घेतली जात आहेत. रासायनिक खतांचा अजिबात वापर होत नाही. त्यामुळे अनेकांनी डुकरे यांच्या शेतातूनच भाजीपाला विकत घेण्यास प्राधान्य दिले आहे. यातून आर्थिक मिळकत होऊ लागली. ग्राहकांनी मागणी केल्यास कोणत्याही वेळी थेट शेतातूनच भाजीपाला उपलब्ध करुन दिला जातो. त्यामुळे ग्राहकांतून याला मागणी वाढत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)