शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

शेतकऱ्यांचा शेतमाल राहतो उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून परतीचा पाऊस सलामी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेत ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी घरूनच ताडपत्री न्यावी लागत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असून अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा श्रमाचा मोबदलाही देणे शिल्लक आहे.

ठळक मुद्देलिलाव शेड ‘फुल्ल’ : नुकसान झाल्यास जबाबदारी कुणाची?

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सोयाबीनची मळणी सुरू असल्याने बहुतांश शेतकरी शेतातूनच सोयाबीनची पोती थेट बाजार समितीत नेत आहेत. सेलूच्या बाजार समितीत आवक वाढली असून सध्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल उघड्यावरच ठेवावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अचानक पाऊस पडल्यास त्याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागू शकतो. अशावेळी होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कुणाची असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांकडून विचारला जात असून बाजार समिती प्रशासनानेही तातडीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. शिवाय तशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मंगळवारी बाजारपेठ बंद असतानाही शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळच्या लिलावात आपला शेतमाल विकला जावा या आशेने मोठ्या प्रमाणात शेतमाल आणला. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांवर दिवाळी हा सण असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या बाजारपेठेत शेतमालाची आवक वाढली आहे. असे असले तरी मोठ्या विस्तीर्ण जागेत असलेले लिलाव शेड हाऊस फुल्ल असल्याने सध्या शेतकऱ्यांनाच त्यांचा शेतमाल उघड्यावर ठेवावा लागत आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून परतीचा पाऊस सलामी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेत ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी घरूनच ताडपत्री न्यावी लागत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असून अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा श्रमाचा मोबदलाही देणे शिल्लक आहे. विशेष म्हणजे लिलाव शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड