शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात आठ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवरील संकट गडदच। शासकीय योजनांचा लाभही कुचकामी

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकारने कर्जमाफी जाहीर केली. हमीभाव देत असल्याचा दावाही केला जात आहे. बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.मोदी सरकारने निवडणुकांपूर्वी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. यासाठी विविध आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अस्मानी आणि सुल्तानी संकटांना तोंड देत बळीराजा जे काही पिकवतो, त्याला कवडीमोल भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य कधीही मिळत नाही. गारपीट, रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, पाणीटंचाई अशा विविध संकटांना तोंड देत पिकविलेला भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जात असेल, तर ते शेतकऱ्यांसाठी संतापजनक ठरणे स्वाभाविक आहे. सरकारने शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी योजना आदी विविध योजना आणल्या. आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटात शेतकरी सापडला असताना सध्या शेतकरी विविध योजनांच्या सभोवताल घिरट्या घालताना दिसून येतो. मागीलवर्षी कोरडा दुष्काळ आणि आता ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. ओल्या दुष्काळाने शेतकºयांनी दुबार, तिबार पेरणी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली. यात शेतकरी मेटाकुटीला आला. शेतीच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांना संसाराचा गाडा कसा हाकावा, याची चिंता पडली आहे. यातच बँकांचे कर्ज कसे फेडावे, याच विवंचनेत ते राहतात. सरकारने जरी शेतकºयांच्या हिताच्या योजना आणल्या पण, याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांची फरपट होतानाच दिसत आहे.जानेवारी महिन्यात गिरड येथील शेतकरी प्रमोद नासुराम मेश्रे (३५), अनिल प्रल्हाद गावंडे (३५) रा. वायगाव, कैलास पंडितसिंह चव्हाण (४२) रा. मोई, चिरकुट रामराव कोटकारे (५५) रा. उमरी ता. कारंजा, अनिल पंजाबराव ईवनाते (३२) रा. बेलगाव, मारोती ज्ञानेश्वर सोनटक्के (३२) रा. पानवाडी, देवराव चंपतराव मेंढे (६६) रा. लोणी या आठ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली.

टॅग्स :Farmerशेतकरी