शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

महिनाभरात आठ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवरील संकट गडदच। शासकीय योजनांचा लाभही कुचकामी

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकारने कर्जमाफी जाहीर केली. हमीभाव देत असल्याचा दावाही केला जात आहे. बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.मोदी सरकारने निवडणुकांपूर्वी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. यासाठी विविध आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अस्मानी आणि सुल्तानी संकटांना तोंड देत बळीराजा जे काही पिकवतो, त्याला कवडीमोल भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य कधीही मिळत नाही. गारपीट, रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, पाणीटंचाई अशा विविध संकटांना तोंड देत पिकविलेला भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जात असेल, तर ते शेतकऱ्यांसाठी संतापजनक ठरणे स्वाभाविक आहे. सरकारने शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी योजना आदी विविध योजना आणल्या. आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटात शेतकरी सापडला असताना सध्या शेतकरी विविध योजनांच्या सभोवताल घिरट्या घालताना दिसून येतो. मागीलवर्षी कोरडा दुष्काळ आणि आता ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. ओल्या दुष्काळाने शेतकºयांनी दुबार, तिबार पेरणी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली. यात शेतकरी मेटाकुटीला आला. शेतीच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांना संसाराचा गाडा कसा हाकावा, याची चिंता पडली आहे. यातच बँकांचे कर्ज कसे फेडावे, याच विवंचनेत ते राहतात. सरकारने जरी शेतकºयांच्या हिताच्या योजना आणल्या पण, याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांची फरपट होतानाच दिसत आहे.जानेवारी महिन्यात गिरड येथील शेतकरी प्रमोद नासुराम मेश्रे (३५), अनिल प्रल्हाद गावंडे (३५) रा. वायगाव, कैलास पंडितसिंह चव्हाण (४२) रा. मोई, चिरकुट रामराव कोटकारे (५५) रा. उमरी ता. कारंजा, अनिल पंजाबराव ईवनाते (३२) रा. बेलगाव, मारोती ज्ञानेश्वर सोनटक्के (३२) रा. पानवाडी, देवराव चंपतराव मेंढे (६६) रा. लोणी या आठ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली.

टॅग्स :Farmerशेतकरी